शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

वशिलेबाजीला मुख्यमंत्र्यांचा चाप

By admin | Updated: February 2, 2017 00:22 IST

महापलिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील भाजप उमेदवार निश्चित करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेले काही रात्री वर्षा बंगल्यावर बसून केले. हे करताना

- यदु जोशी, मुंबईमहापलिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील भाजप उमेदवार निश्चित करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेले काही रात्री वर्षा बंगल्यावर बसून केले. हे करताना त्यांनी स्वत: राबविलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून इलेक्टिव्ह मेरिट हा एकमेव निकष लावला आणि वशिलेबाजी भारी ठरणार नाही, याची दक्षतादेखील घेतली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष/शहराध्यक्ष, स्थानिक आमदार, खासदार, प्रदेशाध्यक्षांनी नियुक्त केलेले दोन वा तीन जण, महिला आणि दलित आघाडीच्या अध्यक्षांचा समावेश प्रत्येक जिल्ह्याच्या संसदीय मंडळामध्ये होता. या मंडळाने साधारणत: एक महिन्यापूर्वीच प्रदेशाकडे नावे पाठविली. एका जागेसाठी एकापेक्षा अधिक नावे अलीत अशा ठिकाणी उमेदवार निश्चित करताना तर मुख्यमंत्र्यांनी समांतर यंत्रणेचा आधार घेतलाच शिवाय ज्या ठिकाणी एकच उमेदवार दिलेला आहे तिथेही विविध निकष तपासलेले आहेत की नाहीत याची खातरजमा करवून घेतली. मुख्यमंत्र्यांनी सर्व महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये दोन सर्वेक्षण खासगी एजन्सीकडून करवून घेतले. एक सर्वेक्षण हे कोणत्या पक्षाची काय परिस्थिती आहे हे दाखविणारा होता. दुसरे सर्वेक्षण हे भाजपाच्या संभाव्य उमेदवारांबाबतचे होते. उमेदवारांची अंतिम यादी तयार करताना स्थानिक मंत्री, आमदार, खासदारांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली तेव्हा हे दोन्ही सर्वेक्षणांचे अहवाल त्यांच्याजवळ होते. एखाद्या नेत्याने विशिष्ट नावाचा आग्रह धरला तर सर्वेक्षणामध्ये त्याची काय परिस्थिती आहे याची जाणीव मुख्यमंत्र्यांनी तातडीने करून दिली. ‘तुम्ही सुचवता आहात त्यापेक्षा सरस उमेदवार तिथे आहे, तेव्हा त्याचा विचार प्रामुख्याने झाला पाहिजे’, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी गुणवत्तेला प्राधान्य दिले.