शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

मुख्यमंत्र्यांचे नियोजन ठरले महत्त्वाचे

By admin | Updated: March 6, 2017 02:13 IST

भारतीय जनता पार्टीचा महापालिकेतील विजय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनाचा, रणनीतीचा विजय आहे.

पुणे : भारतीय जनता पार्टीचा महापालिकेतील विजय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनाचा, रणनीतीचा विजय आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार ज्या ठिकाणी पक्ष कमकुवत आहे, तिथे जास्त लक्ष दिले व तिथूनही पक्षाला जागा मिळाल्या व स्पष्ट बहुमताच्याही पुढे जाता आले, अशा शब्दांत खासदार संजय काकडे यांनी भाजपाच्या महापालिकेतील यशाचे रहस्य उलगडले.काकडे म्हणाले, ‘‘अगदी सुरुवातीपासूनच मुख्यमंत्र्यांनी मला महापालिका निवडणुकीत लक्ष घालण्यास सांगितले होते. त्यांनीच पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह शहरातील आठ आमदार, मी व अनिल शिरोळे हे दोन खासदार अशी दहा जणांची टीम तयार केली. ते स्वत: या टीमचे कॅप्टन होते. ते सूचना द्यायचे व आम्ही त्याचे पालन करायचो. त्याचा परिणाम लगेच दिसायचा. अंतिम परिणाम पक्षाला मिळालेल्या यशातून दिसतोच आहे.’’आम्हाला प्रबळ विरोधकच नव्हता. काँग्रेस, राष्ट्रवादीला काय करावे, भाजपाचा प्रतिकार कसा करावा तेच समजत नव्हते. सगळ्यांच्या टीकेचा केंद्रबिंदू मीच होतो. ‘बिल्डरने केले तिकीट वाटप’ वगैरे टीका केली जात होती. तिकीटवाटप स्वत: मुख्यमंत्र्यांनी केले आहे, हे त्यांना कोण सांगणार? सांगितले ते होते आहे किंवा नाही याचा ते रात्री कितीही उशीर झाला तरीसुद्धा आढावा घ्यायचे. मला त्यांनी सगळ्या कामांवर लक्ष ठेवायला व काही कामे करायलाही सांगितले होते. ती कामे केल्यामुळेच यश मिळाले, असे काकडे म्हणाले. काकडे म्हणाले, ‘‘पक्षाला किती जागा मिळतील, त्यातील खात्रीच्या कोणत्या याची विचारणा त्यांनी केली. तो अहवाल मिळाल्यानंतर त्यांनी कमकुवत जागांची माहिती मागवली. तेथे पक्षाची मते कसे वाढतील याची व्यूहरचना आम्ही तयार केली. त्यानुसार त्या जागेत पक्षाला किती मते मिळतील त्याचा अंदाज घेतला. विरोधकाला किती मते मिळतील, आपल्याला विजयासाठी किती मतांची गरज आहे याचाही शोध घेतला. त्यानंतर त्या भागातील ५० मते असलेली, १०० मते असलेली कुटुंबे, समाज, सार्वजनिक मंडळे शोधून मी स्वत: त्यांची भेट घेतली. पक्षाचा विचार, ध्येय, धोरण त्यांना समजावून दिले. त्याचा परिणाम म्हणून बरोबर त्या प्रभागातील आमच्या मतांमध्ये वाढ झाली.’’महापालिकेत इतकी वर्षे सत्तेत राहूनही त्या दोन्ही पक्षांनी काही कामच केले नाही. प्रचारातही ते करणार आहोत, करत आहोत, सुरुवात केली आहे असेच कोणत्याही प्रकल्पाबाबत म्हणत होते. त्यातील निरर्थकपणा मतदारांच्या लक्षात आला. भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बोलावे हाच मतदारांना मोठा विनोद वाटत होता. भ्रष्टाचाराचे सर्वांत जास्त आरोप गेल्या काही वर्षांत कोणावर झाले हे मतदारांना माहिती होते. तोच प्रकार गुंडांना प्रवेश देण्याचा होता. कोण गुंड आहे व कोणाकडे जास्त गुंड आहेत, हेही मतदारांना माहिती होते. त्यामुळेच त्यांच्या आरोपात काही दमच उरला नाही. तुलनेने इतके आरोप होऊनही आम्ही शांत राहून विकासाच्या मुद्द्यांकडेच लक्ष दिले. मतदारांना ते भावले व त्यांनी भाजपाला मतदान केले, असे काकडे म्हणाले.।माझ्यावर सर्वाधिक टीकेचे कारण भाजपातून मराठा नेतृत्व पुढे येत आहे हे त्यांना पटत नसावे. भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक मराठा समाजाचेच आहेत. मराठा समाज भाजपाच्या विरोधात असा चुकीचा प्रचार केला; मात्र मतदारांनी त्याला थारा दिला नाही. कमकुवत जागांवर लक्ष दिल्याने भाजपाच्या बहुमतापेक्षा जास्त जागा येणार अशी माझी पक्की खात्री झाली होती. त्यामुळेच मी ९२ पेक्षा जास्त जागा आल्या नाहीत तर राजकारण संन्यास घेईल, असे धाडसी वक्तव्य केले होते. अंदाज बरोबर ठरला व तोही शहरात चर्चेचा विषय झाला.