शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचे नियोजन ठरले महत्त्वाचे

By admin | Updated: March 6, 2017 02:13 IST

भारतीय जनता पार्टीचा महापालिकेतील विजय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनाचा, रणनीतीचा विजय आहे.

पुणे : भारतीय जनता पार्टीचा महापालिकेतील विजय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनाचा, रणनीतीचा विजय आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार ज्या ठिकाणी पक्ष कमकुवत आहे, तिथे जास्त लक्ष दिले व तिथूनही पक्षाला जागा मिळाल्या व स्पष्ट बहुमताच्याही पुढे जाता आले, अशा शब्दांत खासदार संजय काकडे यांनी भाजपाच्या महापालिकेतील यशाचे रहस्य उलगडले.काकडे म्हणाले, ‘‘अगदी सुरुवातीपासूनच मुख्यमंत्र्यांनी मला महापालिका निवडणुकीत लक्ष घालण्यास सांगितले होते. त्यांनीच पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह शहरातील आठ आमदार, मी व अनिल शिरोळे हे दोन खासदार अशी दहा जणांची टीम तयार केली. ते स्वत: या टीमचे कॅप्टन होते. ते सूचना द्यायचे व आम्ही त्याचे पालन करायचो. त्याचा परिणाम लगेच दिसायचा. अंतिम परिणाम पक्षाला मिळालेल्या यशातून दिसतोच आहे.’’आम्हाला प्रबळ विरोधकच नव्हता. काँग्रेस, राष्ट्रवादीला काय करावे, भाजपाचा प्रतिकार कसा करावा तेच समजत नव्हते. सगळ्यांच्या टीकेचा केंद्रबिंदू मीच होतो. ‘बिल्डरने केले तिकीट वाटप’ वगैरे टीका केली जात होती. तिकीटवाटप स्वत: मुख्यमंत्र्यांनी केले आहे, हे त्यांना कोण सांगणार? सांगितले ते होते आहे किंवा नाही याचा ते रात्री कितीही उशीर झाला तरीसुद्धा आढावा घ्यायचे. मला त्यांनी सगळ्या कामांवर लक्ष ठेवायला व काही कामे करायलाही सांगितले होते. ती कामे केल्यामुळेच यश मिळाले, असे काकडे म्हणाले. काकडे म्हणाले, ‘‘पक्षाला किती जागा मिळतील, त्यातील खात्रीच्या कोणत्या याची विचारणा त्यांनी केली. तो अहवाल मिळाल्यानंतर त्यांनी कमकुवत जागांची माहिती मागवली. तेथे पक्षाची मते कसे वाढतील याची व्यूहरचना आम्ही तयार केली. त्यानुसार त्या जागेत पक्षाला किती मते मिळतील त्याचा अंदाज घेतला. विरोधकाला किती मते मिळतील, आपल्याला विजयासाठी किती मतांची गरज आहे याचाही शोध घेतला. त्यानंतर त्या भागातील ५० मते असलेली, १०० मते असलेली कुटुंबे, समाज, सार्वजनिक मंडळे शोधून मी स्वत: त्यांची भेट घेतली. पक्षाचा विचार, ध्येय, धोरण त्यांना समजावून दिले. त्याचा परिणाम म्हणून बरोबर त्या प्रभागातील आमच्या मतांमध्ये वाढ झाली.’’महापालिकेत इतकी वर्षे सत्तेत राहूनही त्या दोन्ही पक्षांनी काही कामच केले नाही. प्रचारातही ते करणार आहोत, करत आहोत, सुरुवात केली आहे असेच कोणत्याही प्रकल्पाबाबत म्हणत होते. त्यातील निरर्थकपणा मतदारांच्या लक्षात आला. भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बोलावे हाच मतदारांना मोठा विनोद वाटत होता. भ्रष्टाचाराचे सर्वांत जास्त आरोप गेल्या काही वर्षांत कोणावर झाले हे मतदारांना माहिती होते. तोच प्रकार गुंडांना प्रवेश देण्याचा होता. कोण गुंड आहे व कोणाकडे जास्त गुंड आहेत, हेही मतदारांना माहिती होते. त्यामुळेच त्यांच्या आरोपात काही दमच उरला नाही. तुलनेने इतके आरोप होऊनही आम्ही शांत राहून विकासाच्या मुद्द्यांकडेच लक्ष दिले. मतदारांना ते भावले व त्यांनी भाजपाला मतदान केले, असे काकडे म्हणाले.।माझ्यावर सर्वाधिक टीकेचे कारण भाजपातून मराठा नेतृत्व पुढे येत आहे हे त्यांना पटत नसावे. भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक मराठा समाजाचेच आहेत. मराठा समाज भाजपाच्या विरोधात असा चुकीचा प्रचार केला; मात्र मतदारांनी त्याला थारा दिला नाही. कमकुवत जागांवर लक्ष दिल्याने भाजपाच्या बहुमतापेक्षा जास्त जागा येणार अशी माझी पक्की खात्री झाली होती. त्यामुळेच मी ९२ पेक्षा जास्त जागा आल्या नाहीत तर राजकारण संन्यास घेईल, असे धाडसी वक्तव्य केले होते. अंदाज बरोबर ठरला व तोही शहरात चर्चेचा विषय झाला.