शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचे नियोजन ठरले महत्त्वाचे

By admin | Updated: March 6, 2017 02:13 IST

भारतीय जनता पार्टीचा महापालिकेतील विजय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनाचा, रणनीतीचा विजय आहे.

पुणे : भारतीय जनता पार्टीचा महापालिकेतील विजय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनाचा, रणनीतीचा विजय आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार ज्या ठिकाणी पक्ष कमकुवत आहे, तिथे जास्त लक्ष दिले व तिथूनही पक्षाला जागा मिळाल्या व स्पष्ट बहुमताच्याही पुढे जाता आले, अशा शब्दांत खासदार संजय काकडे यांनी भाजपाच्या महापालिकेतील यशाचे रहस्य उलगडले.काकडे म्हणाले, ‘‘अगदी सुरुवातीपासूनच मुख्यमंत्र्यांनी मला महापालिका निवडणुकीत लक्ष घालण्यास सांगितले होते. त्यांनीच पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह शहरातील आठ आमदार, मी व अनिल शिरोळे हे दोन खासदार अशी दहा जणांची टीम तयार केली. ते स्वत: या टीमचे कॅप्टन होते. ते सूचना द्यायचे व आम्ही त्याचे पालन करायचो. त्याचा परिणाम लगेच दिसायचा. अंतिम परिणाम पक्षाला मिळालेल्या यशातून दिसतोच आहे.’’आम्हाला प्रबळ विरोधकच नव्हता. काँग्रेस, राष्ट्रवादीला काय करावे, भाजपाचा प्रतिकार कसा करावा तेच समजत नव्हते. सगळ्यांच्या टीकेचा केंद्रबिंदू मीच होतो. ‘बिल्डरने केले तिकीट वाटप’ वगैरे टीका केली जात होती. तिकीटवाटप स्वत: मुख्यमंत्र्यांनी केले आहे, हे त्यांना कोण सांगणार? सांगितले ते होते आहे किंवा नाही याचा ते रात्री कितीही उशीर झाला तरीसुद्धा आढावा घ्यायचे. मला त्यांनी सगळ्या कामांवर लक्ष ठेवायला व काही कामे करायलाही सांगितले होते. ती कामे केल्यामुळेच यश मिळाले, असे काकडे म्हणाले. काकडे म्हणाले, ‘‘पक्षाला किती जागा मिळतील, त्यातील खात्रीच्या कोणत्या याची विचारणा त्यांनी केली. तो अहवाल मिळाल्यानंतर त्यांनी कमकुवत जागांची माहिती मागवली. तेथे पक्षाची मते कसे वाढतील याची व्यूहरचना आम्ही तयार केली. त्यानुसार त्या जागेत पक्षाला किती मते मिळतील त्याचा अंदाज घेतला. विरोधकाला किती मते मिळतील, आपल्याला विजयासाठी किती मतांची गरज आहे याचाही शोध घेतला. त्यानंतर त्या भागातील ५० मते असलेली, १०० मते असलेली कुटुंबे, समाज, सार्वजनिक मंडळे शोधून मी स्वत: त्यांची भेट घेतली. पक्षाचा विचार, ध्येय, धोरण त्यांना समजावून दिले. त्याचा परिणाम म्हणून बरोबर त्या प्रभागातील आमच्या मतांमध्ये वाढ झाली.’’महापालिकेत इतकी वर्षे सत्तेत राहूनही त्या दोन्ही पक्षांनी काही कामच केले नाही. प्रचारातही ते करणार आहोत, करत आहोत, सुरुवात केली आहे असेच कोणत्याही प्रकल्पाबाबत म्हणत होते. त्यातील निरर्थकपणा मतदारांच्या लक्षात आला. भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बोलावे हाच मतदारांना मोठा विनोद वाटत होता. भ्रष्टाचाराचे सर्वांत जास्त आरोप गेल्या काही वर्षांत कोणावर झाले हे मतदारांना माहिती होते. तोच प्रकार गुंडांना प्रवेश देण्याचा होता. कोण गुंड आहे व कोणाकडे जास्त गुंड आहेत, हेही मतदारांना माहिती होते. त्यामुळेच त्यांच्या आरोपात काही दमच उरला नाही. तुलनेने इतके आरोप होऊनही आम्ही शांत राहून विकासाच्या मुद्द्यांकडेच लक्ष दिले. मतदारांना ते भावले व त्यांनी भाजपाला मतदान केले, असे काकडे म्हणाले.।माझ्यावर सर्वाधिक टीकेचे कारण भाजपातून मराठा नेतृत्व पुढे येत आहे हे त्यांना पटत नसावे. भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक मराठा समाजाचेच आहेत. मराठा समाज भाजपाच्या विरोधात असा चुकीचा प्रचार केला; मात्र मतदारांनी त्याला थारा दिला नाही. कमकुवत जागांवर लक्ष दिल्याने भाजपाच्या बहुमतापेक्षा जास्त जागा येणार अशी माझी पक्की खात्री झाली होती. त्यामुळेच मी ९२ पेक्षा जास्त जागा आल्या नाहीत तर राजकारण संन्यास घेईल, असे धाडसी वक्तव्य केले होते. अंदाज बरोबर ठरला व तोही शहरात चर्चेचा विषय झाला.