शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

दुष्काळी भागात मुख्यमंत्र्यांच्या घोषणांचा पाऊस

By admin | Updated: March 4, 2016 23:08 IST

राज्याच्या दुष्काळी भागाच्या दौ-यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना बसणारी दुष्काळाची झळ कमी व्हावी यासाठी आज अनेक घोषणा केल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. ४ - राज्याच्या दुष्काळी भागाच्या दौ-यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना बसणारी दुष्काळाची झळ कमी व्हावी यासाठी आज अनेक घोषणा केल्या आहेत. दुष्काळ निवारणासाठी सरकाने केलेल्या विविध उपायोजना आणि निर्णयाची घोषणा त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २९ मंत्र्यांनी आज (शुक्रवारी) लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांतील २९ तालुक्यांची दुष्काळ पाहणी केली. ‘एक दिवस, एक मंत्री, एक तालुका’ अशा पद्धतीने पाहणीचे नियोजन करण्यात आले होते. 
 
दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर करण्यात आलेल्या घोषणा - 
 
- लातूरची पाणीसमस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तीन पर्यायांबाबत तत्काळ व्यवहार्यता अहवाल सादर करणार
- दुष्काळी भागात ज्या शेतकऱ्यांचे वीजपंप बंद होते, त्यांना बिल भरावे लागणार नाही
- १ हजार ७९९ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, गरज पडली तर आणखी सुरु करणार, पाणीपुरवठ्यासाठी लातूर मनपाला १५ कोटी
- दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सवलतीच्या योजनेचा आणखी विस्तार करणार: मुख्यमंत्री
- चारा छावणीसाठी आणखी ५० कोटी रुपये देणार
- टंचाईच्या निकषात बदल करणार
- लातूरसाठी भंडारवाडीतून पाण्यासाठी ६४ कोटी मंजूर 
- उद्गीर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी १२ कोटींचा प्रस्ताव मंजूर
- २०१५च्या कर्जाचे पुनर्गठन करणार, त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज उपलब्ध होऊ शकेल
- विंधन विहिरी दुरूस्ती कामासाठी आर्थिक मर्यादा १० लाखांवरून २० लाखांवर, बुडित क्षेत्रात चर घेण्यासाठी २० लाखांची मर्यादा ५० लाखांवर
- मागेल त्याला शेततळे योजनेसाठी भक्कम आर्थिक तरतूद, पूर्ण क्षमतेने योजना राबविणार
- भंडारवाडी धरणातून पाणीपुरवठ्यासाठी ३७ कोटी, मातोळा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी २५ कोटी मंजूर
- दुष्काळी भागात ज्या शेतकऱ्यांचे वीजपंप बंद होते, त्यांना बिल भरावे लागणार नाही
- दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सवलतीच्या योजनेचा आणखी विस्तार करणार
- मराठवाड्यातील वीज सुविधा भक्कम करण्यासाठी ५६१ कोटी
- १७९९ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, गरज पडली तर आणखी सुरु करणार, पाणीपुरवठ्यासाठी लातूर मनपाला १५ कोटी
- २०१५-१६च्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय, त्यामुळे खरीपासाठी कर्ज उपलब्ध होणार