शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

राज्यात मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना राबविणार!

By admin | Updated: May 18, 2017 02:06 IST

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे : शिरपूर-खंडाळा विद्युत उपकेंद्राचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राला मजबुती देण्यासाठी राज्य शासन सर्वंकष प्रयत्न करीत आहे. राज्यात मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना राबविण्यात येणार असून, या योजनेंतर्गत एक हजार कृषीपंपांच्या गटाला पीपीपी तत्त्वार स्वतंत्र्य सौर वाहिनी निर्माण करून सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीत दिवसाची १२ तास वीज उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. बुधवारी मालेगाव तालुक्यातील शिरपूर-खंडाळा येथील ३३/११ के.व्ही. विद्युत उपकेंद्राच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हा परिषद सदस्य शबानाबी मोहम्मद इमदाद, मालेगाव पंचायत समितीच्या सभापती मंगला गवई, शिरपूरच्या सरपंच सुनिता अंभोरे, राजू पाटील राजे, महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, अधीक्षक अभियंता विनोद बेथारीया, अनिल डोये, राकेश जनबंधू आदी उपस्थित होते.ना. बावनकुळे म्हणाले की, गेल्या दोन वर्षात विद्युत यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच राज्यातील ३ लाख १० हजार शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना वीज जोडणी देण्यात आली आहे. याकरिता आतापर्यंत १२०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कृषीपंपांना वीज जोडण्या देण्यासाठी नवीन ३ लाख अर्ज प्राप्त झाले असून याकरिता आणखी १२०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आगामी काळात शेतकऱ्यांना वीज जोडणी बरोबरच वीज बचत करणारे कृषीपंप ५० टक्के अनुदानावर पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे वीज बचतीबरोबरच शेतकऱ्यांचा खर्च कमी होण्यास मदत होईल. तसेच शेतकऱ्यांना सौर कृषीपंपाचा लाभ मिळावा, याकरिता आणखी १० हजार सौर कृषीपंप मंजूर करण्यात आले आहेत. वाशिम जिल्ह्यातील विद्युत यंत्रणा सक्षम करण्यासाठी १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील वीज विषयक बहुतांशी प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली.जिल्ह्यातील अतिभारीत झालेली वीज यंत्रणेची क्षमता वाढ करण्यासाठी विद्युत उपकेंद्र व रोहीत्रांची क्षमता वाढ करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या प्रलंबित वीज जोडण्या देता येणार आहेत. पैनगंगा बॅरेज परिसरातील कृषीपंपांना वीज जोडण्याचा प्रश्न महत्वाचा असून याकरिताही लवकरच निधी उपलब्ध करून देणार असल्याचे ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी सागितले.