शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
3
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
6
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
7
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
8
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
9
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
10
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
11
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
13
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
14
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
15
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
16
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
17
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
18
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
19
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
20
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय

मुख्यमंत्र्यांनी लबाड बोलल्याचे जाहीर करावे

By admin | Updated: May 21, 2015 00:55 IST

हसन मुश्रीफ : कोल्हापुरातील टोलप्रश्नी भाजप सरकारवर टीका

कोल्हापूर : ‘कोल्हापूर टोलमुक्त करू,’ ही घोषणा केवळ सत्तेवर येण्यासाठी केली होती. ते निवडणुकीतील वक्तव्य होते, आपण लबाड बोलल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावे. कोल्हापूरची जनता त्यांना माफ करेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना केली. आमदार मुश्रीफ म्हणाले, काँग्रेस आघाडी सरकारने ‘एम. एच. ०९’ चा प्रस्ताव दिला होता. संपूर्ण टोलमाफीतील अडचणी आम्हाला माहिती होत्या, पण त्यावेळी चंद्रकांतदादा पाटील, राजेश क्षीरसागर व टोलविरोधी कृती समितीने अमान्य केले. त्याचा फटका आम्हाला बसला, जनतेने आम्हाला घरी बसविले. हे सगळे माहिती असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांत कोल्हापूर टोलमुक्त करण्याची घोषणा केली पण प्रत्यक्ष अंमलबजावणी काहीच नाही. मग विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी ही घोषणा केली काय? हे कोल्हापूरच्या जनतेसमोर जाहीर करून माफी मागावी.राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरावेळी आमच्या मंत्र्यांना याच टोलविरोधी कृती समितीने काळे झेंडे दाखवले होते तर शिवसेनेने आमचे श्राद्धही घातले होते. त्यावेळी हेच चंद्रकांतदादा पाटील व राजेश क्षीरसागर पुढे होते. आता त्यांची भाषा कशी बदलली, असा सवालही त्यांनी केला. स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी एका विधानसभा निवडणुकीत शेतीपंपाची वीज बिले माफ करण्याची घोेषणा केली होती. त्यानंतर त्यांनी हे निवडणुकीतील भाषण असल्याचे जाहीर सांगितले होते. जनतेने त्यांना माफ करून पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सत्ता दिल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. टोलविरोधी कृती समिती याबाबत काय भूमिका घेते त्यावर ‘उद्या बोलू’, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, अनिल साळोखे आदी उपस्थित होते.बिंदू चौकात भाषण दाखवूमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या आश्वासनाची आठवण नसेल तर त्यांनी केलेल्या भाषणाची सीडी बिंदू चौकासह कोल्हापूर शहरातील प्रत्येक चौकात लावू, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. ...अन् डोहाळे जेवणसरकारने टोलमुक्तीचे आश्वासन देऊन सात महिने उलटले. त्यामुळे टोलबाबत काय भूमिका घेणार आहे, हे जनतेला सांगा. कारण आता डोहाळे जेवणाची वेळ झाल्याची बोचरी टीकाही आमदार मुश्रीफ यांनी केली.