शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

मुख्यमंत्र्यांनी कोणत्या मुहुर्तावर शपथ घेतली - उद्धव ठाकरेंचा चिमटा

By admin | Updated: July 3, 2015 13:05 IST

फडणवीस सरकारच्या बाबतीत जे घडत आहे त्यावर अनेकांच्या भूवया उंचावत असून या सरकारने कोणत्या मुहूर्तावर शपथ घेतली हेच तपासून बघायला हवे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३ -  फडणवीस सरकारच्या बाबतीत जे घडत आहे त्यावर अनेकांच्या भूवया उंचावत असून या सरकारने कोणत्या मुहूर्तावर शपथ घेतली हेच तपासून बघायला हवे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. फडणवीस सरकारचे कुठे काय चुकतेय यावर बसून बोलण्याची गरज आहे असेही त्यांनी नमूद केले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या विमान उड्डाणासाठी विलंब केल्याच्या आरोपांवरुन चांगलेच अडचणीत आले आहे. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला फटकारले आहे. फडणवीस सरकारच्या बाबतीत जे घडत आहे त्यावर अनेकांच्या भूवया उंचावत असून या सरकारने कोणत्या मुहूर्तावर शपथ घेतली हेच तपासून बघायला हवे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

शिवसेेनेशिवाय राज्य चालवू शकू अशी भाजपाची धारणा होती, पण शिवरायांना ते मान्य नसावे, आज मुख्यमंत्र्यांसह भाजपाने अन्य मंत्रीही वादाच्या भोव-यात अडकले आहेत याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्री व त्यांच्या ७ ते ८ लोकांचे उत्सव मंडळ राज्यात व्यापार आणण्यासाठी अमेरिकेत गेले आहे, यासाठी फडणवीस सरकारला शुभेच्छा असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला.गेल्या १५ वर्षात राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या परदेशवारीत झालेल्या करारांपैकी किती डॉलर्स प्रत्यक्षात राज्यात आले याचाही तपास व्हायला हवा असे ठाकरे म्हणतात. डिजिटल इंडियात मुकेश अंबानी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत, त्यापैकी महाराष्ट्रात किती गुंतवणूक करणार, अगोदर सरकारने स्वदेशी उद्योगांचा राज्यातील पाया मजबूत करावा, मग परदेशी गुंतवणूकादारांकडे बघावे असा सल्लाही त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांच्या चमूतील एक वरिष्ठ अधिकारी व्हिसा विसरुन विमानतळावर आले त्याला मुख्यमंत्री काय करणार असा प्रश्नही ठाकरेंनी उपस्थित केला.