शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

मुख्यमंत्र्यांनी कोणत्या मुहुर्तावर शपथ घेतली - उद्धव ठाकरेंचा चिमटा

By admin | Updated: July 3, 2015 13:05 IST

फडणवीस सरकारच्या बाबतीत जे घडत आहे त्यावर अनेकांच्या भूवया उंचावत असून या सरकारने कोणत्या मुहूर्तावर शपथ घेतली हेच तपासून बघायला हवे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३ -  फडणवीस सरकारच्या बाबतीत जे घडत आहे त्यावर अनेकांच्या भूवया उंचावत असून या सरकारने कोणत्या मुहूर्तावर शपथ घेतली हेच तपासून बघायला हवे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. फडणवीस सरकारचे कुठे काय चुकतेय यावर बसून बोलण्याची गरज आहे असेही त्यांनी नमूद केले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या विमान उड्डाणासाठी विलंब केल्याच्या आरोपांवरुन चांगलेच अडचणीत आले आहे. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला फटकारले आहे. फडणवीस सरकारच्या बाबतीत जे घडत आहे त्यावर अनेकांच्या भूवया उंचावत असून या सरकारने कोणत्या मुहूर्तावर शपथ घेतली हेच तपासून बघायला हवे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

शिवसेेनेशिवाय राज्य चालवू शकू अशी भाजपाची धारणा होती, पण शिवरायांना ते मान्य नसावे, आज मुख्यमंत्र्यांसह भाजपाने अन्य मंत्रीही वादाच्या भोव-यात अडकले आहेत याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्री व त्यांच्या ७ ते ८ लोकांचे उत्सव मंडळ राज्यात व्यापार आणण्यासाठी अमेरिकेत गेले आहे, यासाठी फडणवीस सरकारला शुभेच्छा असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला.गेल्या १५ वर्षात राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या परदेशवारीत झालेल्या करारांपैकी किती डॉलर्स प्रत्यक्षात राज्यात आले याचाही तपास व्हायला हवा असे ठाकरे म्हणतात. डिजिटल इंडियात मुकेश अंबानी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत, त्यापैकी महाराष्ट्रात किती गुंतवणूक करणार, अगोदर सरकारने स्वदेशी उद्योगांचा राज्यातील पाया मजबूत करावा, मग परदेशी गुंतवणूकादारांकडे बघावे असा सल्लाही त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांच्या चमूतील एक वरिष्ठ अधिकारी व्हिसा विसरुन विमानतळावर आले त्याला मुख्यमंत्री काय करणार असा प्रश्नही ठाकरेंनी उपस्थित केला.