शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

मुख्यमंत्र्यांनी घेतली मग्रारोहयो मजुरांची हजेरी

By admin | Updated: November 30, 2014 01:00 IST

सोनी चिमोटे, शांती बेठेकर, गोपी बेठेकर, सावजी कास्देकर, गणू मावस्कर, अशी एक-एक करीत पंधरा नावांची हजेरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: शनिवारी सकाळी ११ वाजता मेळघाटातील मालूर येथे घेतली.

अधिकाऱ्यांचा खोटारडेपणा : अहवाल सादर करण्याचे आदेशनरेंद्र जावरे - चिखलदरासोनी चिमोटे, शांती बेठेकर, गोपी बेठेकर, सावजी कास्देकर, गणू मावस्कर, अशी एक-एक करीत पंधरा नावांची हजेरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: शनिवारी सकाळी ११ वाजता मेळघाटातील मालूर येथे घेतली. हजेरी घेताना त्या नावाची व्यक्ती तीच का? यासाठी प्रत्यक्ष चेहरा ओळखसुध्दा करुन घेतली. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मग्रारोहयो) कामावरच आदिवासींसोबत संवाद साधला. केवळ आठ दिवसांपूर्वीच हे काम सुरू झाल्याचे उघडकीस आले.मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी एक दिवसीय मेळघाट दौऱ्यावर होते. त्यांनी धारणी तालुक्यातील मालूर, चौराकुंड, हरिसाल, उतावली, राणापीसा आदी गावांना भेटी देऊन तेथील आरोग्य केंद्र, अंगणवाडी केंद्र, शाळांची स्थिती जाणून घेतली. त्यांनी थेट आदिवासींच्या घरात व गोठ्यात जाऊन पाहणी केली. गावकऱ्यांसोबत बसून संवाद साधला आणि त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.अधिकाऱ्यांना खडसावलेमालूर येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) अंतर्गत केवळ आठ दिवसांपूर्वीच काम सुरु करण्यात आल्याचे आदिवासींनी सांगताच फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. माझा दौरा पाहून काम सुरु करण्यात आले हे योग्य नाही. मग्रारोहयो अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरु करावीत आणि आदिवासींचे स्थानांतरण रोखण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. अधिकाऱ्यांनी आपला खोटारडेपणा थांबवावा, अशी ताकीद दिली.अधिकाऱ्यांकडे कामाची जबाबदारीआदिवासी गावांमधील शेतीसाठीसुद्धा जलसंधारणाचा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त असल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना दुबार पीक घेणे शक्य होणार आहे. मेळघाटातील प्रत्येक आदिवासीच्या हाताला काम देण्याची जबाबदारी घेण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात.लाल धुरात हरविला ताफामालूर गावाला मुख्यमंत्री भेट देणार असल्याचे एक दिवसापूर्वी प्रशासनाला सांगण्यात आले. सर्व यंत्रणा रात्रंदिवस कामाला लागली होती. मालूर गावापर्यंत रस्त्यावर लाल माती टाकण्यात आली. गावात निर्मल ग्रामस्वच्छता अभियानातून शौचालय उभारण्यात आले. पिण्याचे पाणी असलेल्या टाकीचे भाग्य रंगरंगोटीने उजळले. वाहनांचा ताफा जाताना लाल मातीच्या धुरामुळे पुढील रस्ताच बेपत्ता झाला होता. पांढऱ्याशुभ्र वाहनांवर लाल मातीचा थर बसला होता. शनिवारी जवळपास पाच तास दौरा करुन मुख्यमंत्र्यांनी आदिवासींना आश्वासित करीत निरोप घेतला.