शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

मुख्यमंत्र्यांनी घेतली मग्रारोहयो मजुरांची हजेरी

By admin | Updated: November 30, 2014 01:00 IST

सोनी चिमोटे, शांती बेठेकर, गोपी बेठेकर, सावजी कास्देकर, गणू मावस्कर, अशी एक-एक करीत पंधरा नावांची हजेरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: शनिवारी सकाळी ११ वाजता मेळघाटातील मालूर येथे घेतली.

अधिकाऱ्यांचा खोटारडेपणा : अहवाल सादर करण्याचे आदेशनरेंद्र जावरे - चिखलदरासोनी चिमोटे, शांती बेठेकर, गोपी बेठेकर, सावजी कास्देकर, गणू मावस्कर, अशी एक-एक करीत पंधरा नावांची हजेरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: शनिवारी सकाळी ११ वाजता मेळघाटातील मालूर येथे घेतली. हजेरी घेताना त्या नावाची व्यक्ती तीच का? यासाठी प्रत्यक्ष चेहरा ओळखसुध्दा करुन घेतली. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मग्रारोहयो) कामावरच आदिवासींसोबत संवाद साधला. केवळ आठ दिवसांपूर्वीच हे काम सुरू झाल्याचे उघडकीस आले.मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी एक दिवसीय मेळघाट दौऱ्यावर होते. त्यांनी धारणी तालुक्यातील मालूर, चौराकुंड, हरिसाल, उतावली, राणापीसा आदी गावांना भेटी देऊन तेथील आरोग्य केंद्र, अंगणवाडी केंद्र, शाळांची स्थिती जाणून घेतली. त्यांनी थेट आदिवासींच्या घरात व गोठ्यात जाऊन पाहणी केली. गावकऱ्यांसोबत बसून संवाद साधला आणि त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.अधिकाऱ्यांना खडसावलेमालूर येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) अंतर्गत केवळ आठ दिवसांपूर्वीच काम सुरु करण्यात आल्याचे आदिवासींनी सांगताच फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. माझा दौरा पाहून काम सुरु करण्यात आले हे योग्य नाही. मग्रारोहयो अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरु करावीत आणि आदिवासींचे स्थानांतरण रोखण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. अधिकाऱ्यांनी आपला खोटारडेपणा थांबवावा, अशी ताकीद दिली.अधिकाऱ्यांकडे कामाची जबाबदारीआदिवासी गावांमधील शेतीसाठीसुद्धा जलसंधारणाचा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त असल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना दुबार पीक घेणे शक्य होणार आहे. मेळघाटातील प्रत्येक आदिवासीच्या हाताला काम देण्याची जबाबदारी घेण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात.लाल धुरात हरविला ताफामालूर गावाला मुख्यमंत्री भेट देणार असल्याचे एक दिवसापूर्वी प्रशासनाला सांगण्यात आले. सर्व यंत्रणा रात्रंदिवस कामाला लागली होती. मालूर गावापर्यंत रस्त्यावर लाल माती टाकण्यात आली. गावात निर्मल ग्रामस्वच्छता अभियानातून शौचालय उभारण्यात आले. पिण्याचे पाणी असलेल्या टाकीचे भाग्य रंगरंगोटीने उजळले. वाहनांचा ताफा जाताना लाल मातीच्या धुरामुळे पुढील रस्ताच बेपत्ता झाला होता. पांढऱ्याशुभ्र वाहनांवर लाल मातीचा थर बसला होता. शनिवारी जवळपास पाच तास दौरा करुन मुख्यमंत्र्यांनी आदिवासींना आश्वासित करीत निरोप घेतला.