शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

मुख्यमंत्री बदलाची चर्चा

By admin | Updated: June 20, 2014 03:36 IST

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महाराष्ट्र, हरियाणा आणि आसाम या तीन काँग्रेसशासित राज्यांमधील मुख्यमंत्री बदलण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वतरुळात आहे.

वाढता दबाव : शरद पवार यांनी घेतली काँग्रेस श्रेष्ठींची भेट
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महाराष्ट्र, हरियाणा आणि आसाम या तीन काँग्रेसशासित राज्यांमधील मुख्यमंत्री बदलण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वतरुळात आहे. त्या दृष्टीने काँग्रेस श्रेष्ठींनी  चाचपणी आणि विचारविनिमय सुरू केला आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी पक्षात या दृष्टीने हालचाली सुरू आहेत, यास दुजोरा दिला. मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पण कदाचित येत्या मंगळवार्पयत या तिन्ही राज्यांचे मुख्यमंत्री बदलण्याबाबत निर्णय होऊ शकेल, असे संकेत सूत्रंनी दिले.
या तीन मुख्यमंत्र्यांखेरीज 1क् राज्यांमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्याही हालचाली सुरू असून, त्यात महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचाही समावेश असल्याचे सूत्रंनी सांगितले. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी माजी संरक्षणमंत्री ए.के. अॅन्टोनी व काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्यासाठी काँग्रेसवरील दबाव वाढला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना लोकसभा निवडणुकीच्या आधीच बदलले असते तर नक्कीच फरक पडला असता. चव्हाण ठोस निर्णय न घेणारे मुख्यमंत्री आहेत व त्यांच्या नेतृत्वाखाली आघाडी विधानसभा निवडणुकांना दमदारपणो सामोरे जाऊ शकत नाही. निदान चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदासाठीची एकमेव व्यक्ती म्हणून तरी पुढे केले जाऊ नये, असे पवार यांनी अॅन्टोनी व पटेल यांना सांगितल्याचे सूत्रंचे म्हणणो आहे. महाराष्ट्रातील धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी बहुजन समाज पक्ष व समाजवादी पार्टी यांसारख्या पक्षांसह महाआघाडी स्थापन करण्यावरही पवार यांनी भर दिल्याचे सूत्रंनी सांगितले. काँग्रेसने आपली कार्यपद्धती बदलली नाही, तर एकत्रित निवडणुका  लढवायच्या की नाही याचाही विचार करावा लागेल, असेही पवार यांनी काँग्रेस श्रेष्ठींच्या कानावर घातल्याचे कळते. सध्या परदेशात असलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी येत्या आठवडय़ात परत आल्यावर चर्चेची आणखी एक फेरी होईल, असे समजते. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश आणखी एखाद्या महत्त्वाच्या पदाधिका:यासह महाराष्ट्रात जाऊन परिस्थितीचा जातीने आढावा घेतील, असेही सांगितले जाते. पटेल पक्ष मुख्यालयात पत्रकारांना भेटले. पण पवार आपल्याला भेटले यास पुष्टी देण्याखेरीज त्यांनी भेटीचा काही तपशील दिला नाही. महाराष्ट्र, झारखंड व हरियाणा या राज्यांतील राजकीय स्थितीचा पक्ष आढावा घेत आहे, असे ते म्हणाले. अॅन्टोनी व पटेल यांनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती नंतर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना दिल्याचेही समजते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
चव्हाणांच्या जागी कोण?
च्पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणूक जिंकली जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना बदलावे लागेल, यावर पवार, अॅन्टोनी व पटेल यांच्यात एकमत झाल्याचेही सूत्रंनी सांगितले. 
च्चव्हाण यांच्या जागी सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावांवर विचार सुरू असला तरी सूत्रंनुसार पवार यांनी काँग्रेस श्रेष्ठींकडे शिंदे यांचे नाव पुढे केले आहे. खरेतर नेतृत्वबदलाचा निर्णय आधीच व्हायला हवा होता, पण आता प्राप्त परिस्थितीत शिंदेच पक्षाला चांगले नेतृत्व देऊ शकतील, असे पवार यांनी सांगितल्याचे कळते.