शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
6
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
7
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
8
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
9
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
10
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
11
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
12
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
13
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
14
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
15
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
16
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
17
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
18
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
19
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
20
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

मुख्यमंत्रीपदास सुशीलकुमार शिंदेंचा नकार ?

By admin | Updated: June 20, 2014 12:48 IST

सुशीलकुमार शिंदे यांनाही आता सक्रीय राजकारणात राहायची इच्छा नाही. त्यामुळे ते मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्यास इच्छूक नाहीत अशी चर्चा आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. २०-  राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल होण्याची शक्यता असून मुख्यमंत्रीपदावर पृथ्वीराज चव्हाण यांच्याऐवजी माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची वर्णी लागेल अशी चर्चा रंगली आहे. मात्र खुद्द सुशीलकुमार शिंदे यांनाही आता सक्रीय राजकारणात राहायची इच्छा नाही. त्यामुळे ते मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्यास इच्छूक नाहीत अशी चर्चा आहे. तर पक्षनेतृत्व जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. 
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विधानसभेपूर्वी महाराष्ट्रात नेतृत्व बदल करावे यासाठी काँग्रेसवर राष्ट्रवादी काँग्रेसने दबाव वाढवला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्याऐवजी सुशीलकुमार शिंदेना मुख्यमंत्री केले जाईल अशी चर्चा काँग्रेसच्या गोटात रंगली आहे.  मात्र लोकसभा निवडणुकीत सोलापूरमधून पराभूत झाल्यावर सुशीलकुमार शिंदेंना आता सक्रीय राजकारणातून बाहेर पडायचे असे सूत्रांनी सांगितले. २००४ मध्ये शिंदेंच्या नेतृत्वाखाली आघाडीला विजय मिळाला होता. मात्र त्यानंतर शिंदेंऐवजी विलासराव देशमुख यांची मुख्यमंत्रीपदावर वर्णी लागली होती. तेव्हापासून शिंदेंनी पुन्हा राज्यात न परतण्याचा निर्णय घेतला होता असे शिंदेंच्या निकटवर्तींयांचे म्हणणे आहे. शिंदेंनीही पुन्हा मुख्यमंत्रीपदावर परतणार का याप्रश्नावर मौन बाळगणेच पसंत केले आहे. मला याविषयी काहीही माहिती नाही अशी प्रतिक्रिया शिंदेंनी दिली आहे.मात्र सोनिया गांधींनी आदेश दिल्यास सुशीलकुमार शिंदे पक्षहितासाठी मुख्यमंत्रीपदावर बसतील असेही काही जणांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्रीपदासाठी सुशीलकुमार शिंदेंचे नाव शरद पवारांनीच सुचवल्याचे वृत्त आहे. 
पक्षाने दिलेली जबाबदारी स्वीकारणार 
नेतृत्व बदलाच्या चर्चेवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. अद्याप पक्षाकडून नेतृत्वबदलाविषयी कोणताही आदेश आलेला नाही. या फक्त चर्चाच आहे. पण पक्षाने आदेश दिल्यास कोणतीही भूमिका स्वीकारायला तयार आहोत.