शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी घोषणेचा पुनर्विचार करावा!

By admin | Updated: January 19, 2016 04:03 IST

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबईतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडामार्फतच होईल’, या वक्तव्याचा पुनर्विचार करण्याची मागणी बीडीडी भाडेकरू संघटनांच्या महासंघाने केली आहे.

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबईतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडामार्फतच होईल’, या वक्तव्याचा पुनर्विचार करण्याची मागणी बीडीडी भाडेकरू संघटनांच्या महासंघाने केली आहे. म्हाडामार्फत बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यास भाडेकरू संघटनांचा विरोध असून कोणताही निर्णय घेण्याआधी संघटनांसोबत चर्चा करण्याची मागणी महासंघाने सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.महासंघाचे नेते किरन माने म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात बीडीडी चाळींमधील सुमारे १५ संघटना एकवटल्या आहेत. कारण वर्षभरापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मुद्दा पुढे आणला. पुनर्विकासाचा निर्णय घेण्यासाठी भाडेकरू संघटनांची बैठक घेऊन जनसुनावणी घेण्याचे आश्वासनही दिले होते. त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी म्हाडा प्रशासनाने भाडेकरू संघटनांसोबत घेतलेल्या बैठकीत बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडा करणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांतर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून संघटनांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.महासंघाचे नेते राजु वाघमारे म्हणाले की, म्हाडा किंवा नोडल एजन्सीला संघटनांचा विरोध असून मुख्यमंत्र्यांनी घोषणेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी सरकारने याआधी नेमलेल्या समित्यांनी रहिवाशांना स्वयंविकासाची संधी देण्याचे सुचविले आहे. त्यानुसार रहिवाशांच्या मनाविरोधात जाऊन मुख्यमंत्र्यांनी कोणताही निर्णय घेऊ नये. जर येत्या महिन्याभरात मुख्यमंत्र्यांनी संघटनांसोबत चर्चा न करता कोणताही निर्णय घेतलाच, तर सर्व बीडीडी चाळींतील लाखो रहिवाशी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.