शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष ठेवावे- हायकोर्ट

By admin | Updated: March 2, 2017 05:36 IST

कंबाटा प्रकरणी शहराच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी कार्यकक्षेच्या बाहेर जात ‘कारणे-दाखवा’ नोटीस बजावली

मुंबई : कंबाटा प्रकरणी शहराच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी कार्यकक्षेच्या बाहेर जात ‘कारणे-दाखवा’ नोटीस बजावली. त्याशिवाय अश्विनी जोशी यांनी केलेल्या कारवायांबाबत अनेक याचिका दाखल होत असल्याने, उच्च न्यायालयाने बुधवारी मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यास सांगितले, तसेच त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कारवाया सरकारतर्फे केल्या आहेत की, वैयक्तिक पातळीवर केल्या आहेत? याचे स्पष्टीकरण येत्या चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने मुख्य सचिवांना दिले.ईरॉस चित्रपटगृह असलेल्या भूखंडासंबंधी के. सी. कंबाटा ट्रस्ट व राज्य सरकारमध्ये १९३९ मध्ये झालेल्या करारातील काही अटींचे उल्लंघन करून, मुंबईच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी कंबाटाला भाडे करार का रद्द करण्यात येऊ नये? याचे स्पष्टीकरण मागण्यासाठी ‘कारणे-दाखवा’ नोटीस बजावली. बुधवारी साडेबारा वाजता या नोटिशीवर सुनावणी होती. त्याविरुद्ध ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. व्ही. एम. कानडे व न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठाने या नोटिशीला तातडीने स्थगिती देत, सुनावणीदरम्यानच जोशी यांना याची माहिती देण्याचे निर्देश सरकारी वकिलांना दिले. १४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेल्या नोटीसमध्ये ट्रस्टने करारातील दोन अटींचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. ट्रस्टने मोबाइल टॉवर उभारण्यास परवानगी दिली, त्याशिवाय तिसऱ्या पक्षाचे अधिकार निर्माण केले. राज्य सरकारने ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर ट्रस्टला जागा दिली आहे. मात्र, ट्रस्टने अटींचे उल्लंघन केल्याचा दावा करत, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना ‘कारणे-दाखवा’ नोटीस बजावली. ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, ही जागा राज्य सरकारची असल्याने, जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचा अधिकार नाही. नोटीस बजावताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली नाही. नोटीस पाहता, जिल्हाधिकाऱ्यांनी काहीही ऐकण्यापूर्वीच निर्णय काय द्यायचा, याचा विचार केलेला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मनमानी आदेश देण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद ट्रस्टतर्फे ज्येष्ठ वकील मिलिंद साठे यांनी केला. ‘जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्राबाहेर जाऊन नोटीस बजावली आहे. ज्या पद्धतीने ते (जिल्हाधिकारी) पुढे नेले आहे, त्यावरून त्या मनमानी आदेश देण्याची शक्यता नाकारता येत नाही,’ असे न्या. व्ही. एम. कानडे यांनी ट्रस्टच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाशी सहमती दर्शवताना म्हटले.‘अशा प्रकरणांत मुंबईच्या जिल्हाधिकारी ज्या पद्धतीने वागत आहेत, ते पाहून आम्ही अत्यंत नाराज आहोत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील कामकाजावर लक्ष देण्याचे निर्देश देत आहोत,’ असे खंडपीठाने उद्विग्न होत म्हटले.(प्रतिनिधी)>चार आठवड्यांमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश‘जिल्हाधिकारी मनमानी कारभार करत असून, त्या स्वत:च्या मनाने असे वागत आहेत की, राज्य सरकारच्या वतीने किंवा कॅबिनेटच्या वतीने त्या अशा वागत आहेत, हे आम्हाला जाणायचे आहे,’ असे म्हणत, उच्च न्यायालयाने मुख्य सचिवांना आत्तापर्यंत जोशी यांनी केलेली कारवाई सरकारच्या वतीने केली आहे की, त्यांनी स्वत:च केलेली आहे? याबाबत चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिलेत. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना ‘कारणे-दाखवा’ नोटीस बजावली.