शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा

By admin | Updated: May 12, 2017 01:30 IST

राजा हरिश्चंद्राने स्वप्नात त्याचे राज्य दान केले होते. महाराष्ट्राचे आधुनिक हरिश्चंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावे

मुरलीधर भवार । लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : राजा हरिश्चंद्राने स्वप्नात त्याचे राज्य दान केले होते. महाराष्ट्राचे आधुनिक हरिश्चंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वगळण्याच्या आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी २७ गावे सर्वपक्षीय संघर्ष समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. कल्याण येथे झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्ता सदस्य मोहिमेच्या वेळी पक्षाचे माजी आमदार मधू चव्हाण यांनी २७ गावांची फसवणूक करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या कानफटात मारा, असे बेताल वक्तव्य केले होते. त्याचा साधा निषेधही भाजपाने केला नाही. मात्र, २७ गावांसंदर्भात मुख्यमंत्र्यांवर काँग्रेसच्या एका आमदारानेकेलेली टीका पाहता त्यात काही गैर नाही, असा सूर सर्वपक्षीय संघर्ष समितीने आळवला आहे. समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर झोड उठवण्याऐवजी त्यांच्या बाजूने प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पाटील यांनी सांगितले की, महापालिका निवडणुकीच्या आधी २७ गावांच्या जाहीर सभेला मुख्यमंत्री उपस्थित होते. गावे वेगळी करून स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचे आश्वासन त्यांनी हजारो ग्रामस्थांसमोर दिले होते. २७ गावांसह महापालिकेची निवडणूक पार पडली. संघर्ष समितीने दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर भाजपाचे नगरसेवक निवडून आले. तेच नगरसेवक आता महापालिकेतून गावे वगळण्यास विरोध करत असतील, तर त्या भाजपाच्या नगरसेवकांनी त्यांच्या नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी त्यांच्या हिमतीवर निवडून यावे. त्यानंतर, २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिकेचा आमचा आग्रहच राहणार नाही, असे खुले आव्हान समितीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या भाजपाच्या नगरसेवकांना पाटील यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला दोन वर्षे उलटली आहेत. न्यायालयातील याचिकेचा निर्णय येण्याआधीच निर्णय घेऊ, असे बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आता निर्णय घेण्यात काय अडचण आहे. त्यांनी निर्णय घ्यावा. गावांसंदर्भातील याचिकेवर ७ जूनला सुनावणी आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.समितीचे उपाध्यक्ष अर्जुन चौधरी म्हणाले की, चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेले वक्तव्य हे त्यांचे व्यक्तिगत आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलेला शब्द पाळला नाही. समितीचा त्यांनी विश्वासघात केला आहे. गावांचे राजकारण होत असताना आमदार गणपत गायकवाड यांनी २७ गावांतील बेकायदा बांधकामांचा प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र, ही बेकायदा बांधकामे होण्यास सरकारचे धोरण कारणीभूत आहे. एमएमआरडीएने बांधकाम परवानगी दिली नाही. सरकारने गावठाण विस्तार केलेला नाही. त्यामुळे ही बेकायदा बांधकामे वाढीस लागली. त्याचा समितीशी काहीच संबंध नाही.