शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा

By admin | Updated: May 12, 2017 01:30 IST

राजा हरिश्चंद्राने स्वप्नात त्याचे राज्य दान केले होते. महाराष्ट्राचे आधुनिक हरिश्चंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावे

मुरलीधर भवार । लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : राजा हरिश्चंद्राने स्वप्नात त्याचे राज्य दान केले होते. महाराष्ट्राचे आधुनिक हरिश्चंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वगळण्याच्या आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी २७ गावे सर्वपक्षीय संघर्ष समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. कल्याण येथे झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्ता सदस्य मोहिमेच्या वेळी पक्षाचे माजी आमदार मधू चव्हाण यांनी २७ गावांची फसवणूक करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या कानफटात मारा, असे बेताल वक्तव्य केले होते. त्याचा साधा निषेधही भाजपाने केला नाही. मात्र, २७ गावांसंदर्भात मुख्यमंत्र्यांवर काँग्रेसच्या एका आमदारानेकेलेली टीका पाहता त्यात काही गैर नाही, असा सूर सर्वपक्षीय संघर्ष समितीने आळवला आहे. समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर झोड उठवण्याऐवजी त्यांच्या बाजूने प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पाटील यांनी सांगितले की, महापालिका निवडणुकीच्या आधी २७ गावांच्या जाहीर सभेला मुख्यमंत्री उपस्थित होते. गावे वेगळी करून स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचे आश्वासन त्यांनी हजारो ग्रामस्थांसमोर दिले होते. २७ गावांसह महापालिकेची निवडणूक पार पडली. संघर्ष समितीने दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर भाजपाचे नगरसेवक निवडून आले. तेच नगरसेवक आता महापालिकेतून गावे वगळण्यास विरोध करत असतील, तर त्या भाजपाच्या नगरसेवकांनी त्यांच्या नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी त्यांच्या हिमतीवर निवडून यावे. त्यानंतर, २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिकेचा आमचा आग्रहच राहणार नाही, असे खुले आव्हान समितीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या भाजपाच्या नगरसेवकांना पाटील यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला दोन वर्षे उलटली आहेत. न्यायालयातील याचिकेचा निर्णय येण्याआधीच निर्णय घेऊ, असे बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आता निर्णय घेण्यात काय अडचण आहे. त्यांनी निर्णय घ्यावा. गावांसंदर्भातील याचिकेवर ७ जूनला सुनावणी आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.समितीचे उपाध्यक्ष अर्जुन चौधरी म्हणाले की, चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेले वक्तव्य हे त्यांचे व्यक्तिगत आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलेला शब्द पाळला नाही. समितीचा त्यांनी विश्वासघात केला आहे. गावांचे राजकारण होत असताना आमदार गणपत गायकवाड यांनी २७ गावांतील बेकायदा बांधकामांचा प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र, ही बेकायदा बांधकामे होण्यास सरकारचे धोरण कारणीभूत आहे. एमएमआरडीएने बांधकाम परवानगी दिली नाही. सरकारने गावठाण विस्तार केलेला नाही. त्यामुळे ही बेकायदा बांधकामे वाढीस लागली. त्याचा समितीशी काहीच संबंध नाही.