शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे मिळाला बुस्ट, आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताची लष्करी रँकिंग वाढली!
2
'बर्बाद अर्थव्यवस्थ' म्हणणारे कुठे गेले...? GDP ग्रोथच्या आकड्यांवरून भाजपचा राहुल गांधींवर निशाणा
3
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
4
एकतर्फी प्रेमातून मुलाचं 'LIVE Suicide', आधी पेट्रोल ओतून पेटून घेतलं, मग रुग्णालयाच्या छतावरून मारली उडी
5
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
6
SMAT 2025 : आयुष म्हात्रेचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
7
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
8
IND vs SA ODI Series : टेस्टमध्ये नापास! इथं पाहा गंभीर 'गुरुजीं'चं वनडेतील 'प्रगतीपुस्तक'
9
एमएमसी झोनच्या ११ जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, ८९ लाखांचं होतं बक्षीस; दरेकसा दलम झाला खिळखिळा
10
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
11
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
12
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
13
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
14
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
15
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
16
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
17
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
18
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
19
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
20
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा

By admin | Updated: May 12, 2017 01:30 IST

राजा हरिश्चंद्राने स्वप्नात त्याचे राज्य दान केले होते. महाराष्ट्राचे आधुनिक हरिश्चंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावे

मुरलीधर भवार । लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : राजा हरिश्चंद्राने स्वप्नात त्याचे राज्य दान केले होते. महाराष्ट्राचे आधुनिक हरिश्चंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वगळण्याच्या आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी २७ गावे सर्वपक्षीय संघर्ष समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. कल्याण येथे झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्ता सदस्य मोहिमेच्या वेळी पक्षाचे माजी आमदार मधू चव्हाण यांनी २७ गावांची फसवणूक करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या कानफटात मारा, असे बेताल वक्तव्य केले होते. त्याचा साधा निषेधही भाजपाने केला नाही. मात्र, २७ गावांसंदर्भात मुख्यमंत्र्यांवर काँग्रेसच्या एका आमदारानेकेलेली टीका पाहता त्यात काही गैर नाही, असा सूर सर्वपक्षीय संघर्ष समितीने आळवला आहे. समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर झोड उठवण्याऐवजी त्यांच्या बाजूने प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पाटील यांनी सांगितले की, महापालिका निवडणुकीच्या आधी २७ गावांच्या जाहीर सभेला मुख्यमंत्री उपस्थित होते. गावे वेगळी करून स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचे आश्वासन त्यांनी हजारो ग्रामस्थांसमोर दिले होते. २७ गावांसह महापालिकेची निवडणूक पार पडली. संघर्ष समितीने दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर भाजपाचे नगरसेवक निवडून आले. तेच नगरसेवक आता महापालिकेतून गावे वगळण्यास विरोध करत असतील, तर त्या भाजपाच्या नगरसेवकांनी त्यांच्या नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी त्यांच्या हिमतीवर निवडून यावे. त्यानंतर, २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिकेचा आमचा आग्रहच राहणार नाही, असे खुले आव्हान समितीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या भाजपाच्या नगरसेवकांना पाटील यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला दोन वर्षे उलटली आहेत. न्यायालयातील याचिकेचा निर्णय येण्याआधीच निर्णय घेऊ, असे बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आता निर्णय घेण्यात काय अडचण आहे. त्यांनी निर्णय घ्यावा. गावांसंदर्भातील याचिकेवर ७ जूनला सुनावणी आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.समितीचे उपाध्यक्ष अर्जुन चौधरी म्हणाले की, चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेले वक्तव्य हे त्यांचे व्यक्तिगत आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलेला शब्द पाळला नाही. समितीचा त्यांनी विश्वासघात केला आहे. गावांचे राजकारण होत असताना आमदार गणपत गायकवाड यांनी २७ गावांतील बेकायदा बांधकामांचा प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र, ही बेकायदा बांधकामे होण्यास सरकारचे धोरण कारणीभूत आहे. एमएमआरडीएने बांधकाम परवानगी दिली नाही. सरकारने गावठाण विस्तार केलेला नाही. त्यामुळे ही बेकायदा बांधकामे वाढीस लागली. त्याचा समितीशी काहीच संबंध नाही.