शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मुख्यमंत्रिपद शिवसेना सोडणार नाही

By admin | Updated: May 21, 2014 04:08 IST

विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल.

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल. लोकसभा निवडणुकीत आम्ही आघाडीधर्म पाळला आता भाजपाने राज्यात तो पाळावा, असे परखड मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केले. ते पत्रपरिषदेत बोलत होते. लोकसभा निवडणुकीत भाजपा जास्त जागा लढते आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना अधिक जागा लढते. हेच सूत्र या वेळी कायम राहील. विधानसभेच्या जागा कमी करून भाजपाला देण्याचा प्रश्न नाही. इतर मित्रपक्षांना (स्वाभिमानी, रिपाइं आदी) किती जागा द्यायच्या याचा निर्णय सगळे बसून करू, असे उद्धव यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, का होऊ नये, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. मुख्यमंत्री स्वत: बनणार का, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. एनडीएचे संयोजक होण्याची आपली इच्छा नसल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक घेण्याची मागणी भाजपाने केली असली तरी उद्धव यांनी त्यास संपूर्ण सहमती दर्शविली नाही. पावसाळा तोंडावर आहे, शेतीची कामे आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राज्यातील नेतृत्व तीन महिन्यांसाठी बदलून असे काय होणार आहे, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रिपद मिळावे याला आपला पाठिंबा आहे, असे ते एका प्रश्नात म्हणाले. मोदी पंतप्रधानपदी आरूढ होताच महायुतीचे खासदार त्यांना भेटतील. गारपीटग्रस्तांना तातडीने मदत देण्याची आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची तसेच गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याची मागणी करतील, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे लचके तोडू देणार नाही मोदी सरकारमध्ये एक वर्षात स्वतंत्र विदर्भ होईल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला असतानाच उद्धव यांनी, ‘महाराष्ट्राचे लचके कोणालाही तोडू देणार नाही.’ या शब्दांत आज विदर्भ राज्य निर्मितीला जोरदार विरोध केला. (विशेष प्रतिनिधी)