शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

गृहनिर्माण विभागावर मुख्यमंत्री नाराज

By admin | Updated: December 4, 2015 01:04 IST

परवडणारी घरे बांधण्याचे आश्वासन देऊन वर्ष उलटले अजून एकाही घराची साधी वीटही रचली गेली नाही. नुसती एकमेकांकडे टोलवाटोलवी करून चालणार नाही, कोणत्याही

मुंबई : परवडणारी घरे बांधण्याचे आश्वासन देऊन वर्ष उलटले अजून एकाही घराची साधी वीटही रचली गेली नाही. नुसती एकमेकांकडे टोलवाटोलवी करून चालणार नाही, कोणत्याही परिस्थितीत येत्या वर्षभरात अडीच लाख घरे बांधून पूर्ण झालीच पाहिजेत, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला. गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी मुख्यमंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, एसआरए विभाग आणि पालिकेत याविषयी कोणताही समन्वय नाही. प्रकरणांवर निर्णय होत नाहीत, काही प्रकरणांमध्ये १९० दिवसांत निर्णय घेणे अपेक्षित होते; मात्र तो निर्णय जवळपास ९० प्रकरणांमध्ये घेतला गेला नाही. ही अशी टोलवाटोलवी चालली तर भविष्यात हे कामच काढून घेतले जाईल, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. एसआरए अंतर्गत जे प्रकल्प आहेत त्यांनी रखडलेल्या प्रकल्पाची प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावी, असे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी सांगितले. बैठकीत गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांनी या प्रकल्पासंदर्भात सादरीकरण केले. या वेळी राज्यमंत्री रवींद्र वायकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मिलिंद म्हैसकर, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम गुप्ता आदि उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)प्रक्रिया पूर्ण कराएसआरए अंतर्गत जे प्रकल्प आहेत त्यांनी कालमर्यादा सांभाळून रखडलेल्या प्रकल्पाची प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावी, असे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी सांगितले.