शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मुख्यमंत्र्यांनी फेटाळला २५ टक्क्यांचा फॉर्म्युला

By admin | Updated: June 28, 2017 02:09 IST

दीड लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी वरची रक्कम फेडली तर त्यांना संपूर्ण दीड लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

यदु जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दीड लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी वरची रक्कम फेडली तर त्यांना संपूर्ण दीड लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. एकूण थकबाकीच्या २५ टक्के कर्जमाफी द्यावी, हा प्रस्ताव त्यांनी फेटाळला. राज्यात दीड लाखावर थकबाकी असलेले ८ लाख शेतकरी आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.दीड लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण थकबाकीच्या २५ टक्के इतकी कर्जमाफी द्यावी आणि ती दीड लाख रुपयांपेक्षा अधिक नसावी, अशी सूचना सहकार आणि वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली होती, अशी माहिती आहे. तथापि, मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी ती अमान्य केली. ही सूचना स्वीकारली असती तर तीन लाख रुपयांचे कर्ज असलेल्या शेतकऱ्याला तीन लाखाच्या २५ टक्के म्हणजे ७५ हजार रुपये इतकीच कर्जमाफी मिळाली असती आणि त्याने २ लाख २५ हजार रुपये आधी भरल्यानंतरच ती मिळाली असती. आता तीन लाखांची थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्याला दीड लाख रुपये भरले म्हणजे दीड लाखाची कर्जमाफी मिळणार आहे. कर्जमाफीचा शासकीय आदेश काढण्याचे काम मंगळवारी दिवसभर युद्धपातळीवर सुरू होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, वित्त तसेच सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जीआरमधील प्रत्येक बाब मुख्यमंत्र्यांनी बारकाईने तपासली. जीआर बुधवारी प्रसिद्ध केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. नागरी बँका, पतसंस्था नाहीच नागरी बँका आणि पतसंस्थांकडून घेतलेले कर्ज माफ केले जाणार नाही, हे मंगळवारी स्पष्ट झाले. जीआरचा जो ड्राफ्ट तयार करण्यात आला त्यात हे कर्ज माफ करण्याची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. २००९ मध्ये नागरी बँकांकडील कर्जदेखील माफ करण्यात आले होते. तथापि, त्यावेळी शंभरावर नागरी बँकांनी बोगस दावे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. नंतर त्या बँकांकडून रक्कम वसूलदेखील करण्यात आली होती.