शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

मुख्यमंत्री, माझ्या मैत्रीचे राजकीय भांडवल नको - राधाकृष्ण विखे

By admin | Updated: July 11, 2017 05:34 IST

माझ्या मतदारसंघाचे प्रश्न मुख्यमंत्र्यांपुढे मांडून ते सोडविण्यास प्राधान्य दिले. आमची मैत्री ही केवळ विकास कामांसाठी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्डी : माझ्या मतदारसंघाचे प्रश्न मुख्यमंत्र्यांपुढे मांडून ते सोडविण्यास प्राधान्य दिले. आमची मैत्री ही केवळ विकास कामांसाठी आहे. त्याचे कोणीही राजकीय भांडवल करू नये. सरकारच्या लोकविरोधी धोरणांबाबत विरोधी पक्षनेता म्हणून संघर्षाची भूमिका कायम राहील, असे स्पष्टीकरण विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिले.मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिर्डीत झालेल्या कार्यक्रमात विखे यांनी ‘हे’ सरकार मला घरच्यासारखे वाटते, असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांनीही विखेंसारखा विरोधी पक्षनेता अजून झालेला नाही, अशा शब्दांत त्यांचा गौरव केला होता. त्यानंतर विखे हे भाजपाच्या तर वाटेवर नाही ना, असे विचारले जात होते. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, साई समाधी शताब्दी आराखडा, निळवंडे कालवे आदी प्रश्नांमध्ये सरकारने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबाबत कृतज्ञता व्यक्त केली व रखडलेल्या कामांना गती मिळावी, असा माझा प्रयत्न होता़ त्यानिमित्ताने केलेल्या वक्तव्याचा विपर्यास झाला़ पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहोत.>मुख्यमंत्र्यांशी जुनी मैत्री आहे़ मी मंत्रिमंडळात असताना अनेकदा तेही माझ्याकडे सार्वजनिक हिताची कामे घेऊन येत़ ते सत्तेत असल्याने जनतेची कामे घेऊन मला त्यांच्याकडे जावे लागते. याचा अर्थ आम्ही आमच्या राजकीय भूमिका व विचारांपासून दूर गेलो, असा होत नाही. मैत्रीचा राजकीय विचारधारा व राजकारणातील निर्णयांशी संबंध जोडणे उचित नाही.- राधाकृष्ण विखे, विरोधी पक्षनेते, विधानसभा