शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र सदनातील वादाकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष ?

By admin | Updated: July 29, 2014 09:49 IST

महाराष्ट्र सदनातील चपाती राडा ५ दिवसांनी प्रसारमाध्यमांमधून कळल्याचा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला असला प्रत्यक्षात घटना घडली त्याच दिवशी त्यांना माहिती देण्यात आली होती.

 

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २९ - दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील चपाती राड्याची माहिती पाच दिवसांनी प्रसारमाध्यमांमधून कळल्याचा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला असला तरी हा वाद ज्या दिवशी घडला त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांना घटनेची माहिती देण्यात आली होती अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री चव्हाण यांनी हे प्रकरण जाणूनबुजून चिघळू दिले की काय यावर चर्चा रंगली आहे. 
दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील जेवणाचा सुमार दर्जा आणि अन्य समस्यांमुळे संतापलेल्या शिवसेना खासदारांनी १७ जुलैरोजी कॅंटिनमधील मुस्लीम तरुणाला चपाती भरवून त्याचा रोजा मोडला होता. पाच दिवसांनी प्रसारमाध्यमांमध्ये हे वृत्त झळकले आणि शिवसेना खासदारांचे प्रताप जगासमोर आले. या घटनेमुळे शिवसेना खासदारांवर सर्वत्र टीकाही झाली. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या वादाची काहीच माहिती नव्हती. प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त आल्यावर या वादाची माहिती घेतली असा दावा केला होता. मात्र चव्हाण यांना ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी माहिती देण्यात आली होती अशी माहिती सरकारी कागदपत्रांवरुन समोर आली आहे. शिवसेना खासदारांनी केलेल्या कृत्यानंतर सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांनी १७ जुलैरोजी संध्याकाळी मुख्यमंत्री कार्यालयाला गोपनीय अहवाल पाठवला होता. यानंतर बिपीन मलिक यांनी कँटिनमधील संबंधीत कर्मचारी आणि आयआरसीटीसी या दोघांचीही माफी मागितली होती. तसेच राज्याचे मुख्य सचिव जे.एस. सहारिया यांनी मलिक यांना योग्य कारवाईचे आदेश दिले. 
२० जुलैरोजी चव्हाण दिल्लीत गेल्यावर त्यांनी महाराष्ट्र सदनात भेट दिली होती. त्यावेळीही त्यांना संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देण्यात आली होती. मात्र रमझानच्या काळात तणावपूर्ण निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त आल्यावर चव्हाण यांनी राज्याचे सचिव सहारिया यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. 'महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यास दिरंगाई केली' अशा शब्दात एका वरिष्ठ सनदी अधिका-याने नाराजी व्यक्त केली. चव्हाण यांनी हा वाद चिघळावा आणि शिवसेनेची कोंडी व्हावी यासाठी या वादाकडे दुर्लक्ष केले का यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.