शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

मुख्यमंत्र्यांना पारदर्शकतेपेक्षा खुर्ची प्यारी

By admin | Updated: March 5, 2017 02:19 IST

राज्यातले सरकार आणि स्वत:ची खुर्ची वाचविण्यासाठी पारदर्शकतेचा मुद्दा गुंडाळून ठेवून आणि महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातले सरकार आणि स्वत:ची खुर्ची वाचविण्यासाठी पारदर्शकतेचा मुद्दा गुंडाळून ठेवून आणि महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांचा विश्वासघात केल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.मुंबईत महापौरपदाच्या निवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर अशोक चव्हाण म्हणाले की, ‘मुंबई महापालिका भ्रष्टाचारमुक्त करण्यापेक्षा, राज्यातले सरकार वाचवणे ही प्राथमिकता असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी आपली खुर्ची टिकवण्याला महत्त्व दिले आहे. शिवसेना भाजपा या दोन्ही पक्षांकडून प्रचारात झालेले आरोप-प्रत्यारोप हे फक्त मतदारांचे लक्ष विचलित करण्यासाठी केलेले नाटक आहे, हे आमचे म्हणणे खरे ठरले, शिवाय भाजपा हा जनतेसाठी विश्वासघातकी पक्ष आहे, हेही पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.’‘अच्छे दिन’च्या नावाने देशाची आणि ६५०० कोटी रुपयांच्या नावाने कल्याण-डोंबिवलीकरांची फसवणूक करणाऱ्या भाजपाने, पारदर्शकतेच्या नावावर आता मुंबईकरांची फसवणूक केल्याचे खा. चव्हाण यांनी बोलून दाखवले.मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारात भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. शिवसेना हप्तेखोरांचा पक्ष असून, मुंबई महापालिकेतून मिळणाऱ्या टक्केवारीवर शिवसेना चालते, अशी टीका भाजपा नेत्यांनी केली होती. मग आता निवडणुकीतून माघार घेऊन, या माफिया, हप्तेखोर, भ्रष्टाचारी लोकांच्या हातात मुंबईकरांना का सोपवले? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना द्यावे, असे खा. चव्हाण म्हणाले. गेल्या २२ वर्षांत शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षांनी मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. यापुढेही राज्यात, केंद्रात आणि मुंबई महापालिकेत एकमेकांच्या सहकार्याने हे चालूच राहाणार आहे, असे खा. चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)हा तर राजकीय पळपुटेपणा - विखेभारतीय जनता पार्टीने शिवसेनेविरोधात मुंबईत महापौरासह कोणतीही निवडणूक न लढण्याचा निर्णय म्हणजे, महाराष्ट्राच्या जनतेची पारदर्शक फसवणूक आहे. भाजपाने मांडवली करून शिवसेनेच्या माफियाराजला पारदर्शक संमती दिल्याची घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.विखे पाटील म्हणाले, ‘कोणतीही निवडणूक न लढण्याच्या आणि विरोधी पक्षनेतेपदसुद्धा न स्वीकारण्याच्या भूमिकेतून भाजपाची शिवसेनेला विरोध करण्याची मानसिकता नाही, हे स्पष्ट होते. पालिकेत सेनेचे माफियाराज असल्याचा जाहीर आरोप करणारा भाजपा आता सेनेशी तह करत आहे. विखे पाटील म्हणाले. पराभव होणार याची जाणीव असतानाही, लोकशाहीत अनेकदा केवळ वैचारिक भूमिका स्पष्ट करण्यासाठी निवडणूक लढवायची असते. पराभव जरी झाला असता, तरीही त्यांची अब्रू शिल्लक राहिली असती. आम्हालाही मांडवली करता येते, हे भाजपाने दाखवून दिले आहे.’