शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
6
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
7
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
8
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
9
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
10
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
11
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
12
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
13
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
14
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
15
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
16
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
17
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
18
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
19
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
20
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?

सभेतून मुख्यमंत्र्यांना गाशा गुंडाळायला लागणे, हे बदलत्या हवेचे द्योतक- अशोक चव्हाण

By admin | Updated: February 18, 2017 22:38 IST

वारंवार खोटं बोलून जनतेची दिशाभूल करणाऱ्या भाजपकडे मतदारांनी पाठ फिरवल्याचे पुण्यातील सभेतून स्पष्ट झाले अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ -  मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या पुण्यातील सभेकडे मतदारांनी पाठ फिरविल्याने त्यांना  सभा रद्द करावी लागली. वारंवार खोटं बोलून जनतेची दिशाभूल करणाऱ्या भाजपकडे मतदारांनी पाठ फिरवल्याचे यावरून स्पष्ट झाले असून हे भाजपविरूद्धच्या बदलत्या हवेचे द्योतक असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.
 
 पुण्यातील टिळकरोड परिसरात दुपारी दोनच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी मुख्यमंत्री सभेसाठी दाखल झाले. परंतु १५ मिनिटे थांबून देखील मतदार सभेसाठी आलेच नाही. त्यामुळे त्यांना ही सभा रद्द करून पुढील सभेसाठी जावे लागले. चुकीची वेळ आणि विसंवाद, यामुळे सभा रद्द करण्यात आल्याचे तकलादू कारण मुख्यमंत्र्यांनी दिले असले तरी देशातून आणि राज्यातून भाजपची हवा संपल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. असे चव्हाण म्हणाले. खरतर रिकाम्या खुर्च्यांना संबोधित करण्याची नामुष्की मुख्यमंत्र्यांना टाळता आली असती. परंतु,  भाजपची जनेतेशी नाळ तुटल्याने तसेच वारंवार खोटं बोलल्यामुळेच मुख्यमंत्र्यांचे हे हाल झाल्याची टीका चव्हाण यांनी केली.
 
 दरम्यान, नाशिक येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील सभेतही असेच झाले. आज साडेचारच्या सुमारास या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा होणार होती. परंतु सहा वाजेपर्यंत या सभेला गर्दी जमा झाली नाही. केवळ रिकाम्या खुच्यांची गर्दी मैदानावर दिसत होती. या दोन्ही घटनांवरून मोदींची हवा संपली असून भाजपवर आणि मुख्यमंत्र्यांवर लोकांचा विश्वास राहिला नाही हे स्पष्ट झाला आहे त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित झाला आहे असे खा. चव्हाण म्हणाले.