शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

आता राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना!

By admin | Updated: December 17, 2014 23:51 IST

एकूण बजेटच्या ४५ टक्के बजेट ग्रामविकास खात्याचे असते आणि त्यातला ७५ टक्के निधी केंद्राकडून राज्याच्या नोडल एजन्सीमार्फत थेट जिल्ह्याला जातो.

प्रश्न : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत नेमके काय असेल?उत्तर : या योजनेत राज्य शासनाने निधी द्यावा असे अपेक्षित आहे. शिवाय राज्याच्या विविध योजनांचा आढावा घेऊन एकात्मिक योजना तयार केली जाईल व त्यातून हे काम केले जाईल. मंत्रिमंडळासमोर हा विषय नेला जाणार आहे.प्रश्न : केंद्राचा ग्रामविकास खात्याचा निधी मिळवण्यात आघाडी सरकार यशस्वी ठरले नव्हते. आपण त्यासाठी काय करणार?उत्तर : एकूण बजेटच्या ४५ टक्के बजेट ग्रामविकास खात्याचे असते आणि त्यातला ७५ टक्के निधी केंद्राकडून राज्याच्या नोडल एजन्सीमार्फत थेट जिल्ह्याला जातो. आपण पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा देखील निधी वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहोत. निवडणुकांचा काळ, राजकीय कम्प्लशनपोटी द्यावा लागणारा वेळ वगळता बाकीचे दिवस मी सतत काम करीत राहणार आहे कारण माझे काऊंटडाऊन मी पदभार स्वीकारल्यापासूनच सुरू झाले आहे. प्रश्न : जुन्या सरकारच्या तंटामुक्त गाव, गाडगेबाबा स्वच्छता अभियान या योजना चालू राहतील की बंद होणार?उत्तर : कोणत्याची योजना बंद करणार नाही, मात्र सगळ्या योजनांचा आढावा घेऊ. ज्या योजना निष्फळ आहेत त्यांना पुनरुज्जीवित करू. ज्यातून काहीच निष्पन्न होत नसेल त्या बंद करू. सरकार चांगल्या योजना आणेल पण या सगळ्या योजनांचे यश-अपयश जनतेच्या प्रतिसादावर आणि मानसिकतेवर अवलंबून आहे.प्रश्न : आपला विभाग नेमके कशावर फोकस करणार आहे?उत्तर : मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जलयुक्त शिवार ही योजना जाहीर केली आहे. मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे घेण्यात येतील जेणे करून ग्रामीण भागातील पिण्याचे पाण्याचे संकट कमी होण्यास मदत होईल. शिवाय ग्रामीण भागातील रस्ते चांगले करणे ही देखील महत्त्वाची बाब आपल्यापुढे आहे.प्रश्न : जिल्हा परिषदांच्या शाळांची अवस्था बिकट आहे. त्यासाठी काय करणार?उत्तर : मी स्वत: चौथीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले. त्यावेळीपेक्षा आज त्या शाळांची अवस्था वाईट आहे. मात्र यावर त्या त्या जिल्हा परिषदांचे नियंत्रण असते. या शाळांचे सर्वेक्षण करून त्या जास्तीतजास्त ‘चाईल्ड फ्रेंडली’ कशा होतील याकडे आमचे लक्ष असेल. कागदावरील चित्र आणि वास्तव यात खूप फरक आहे हे मलाही माहिती आहे. पण आम्ही प्रयत्न करणार हे नक्की.प्रश्न : प्रत्येक खासदाराने गाव दत्तक घेण्याची योजना पंतप्रधानांनी मांडली आहे. राज्यात त्याचे रूप काय आहे?उत्तर : खूप चांगला प्रतिसाद आहे. मी स्वत: हिवरेबाजार येथे दिवसभराचा प्रशिक्षण वर्ग घेतला. पाणलोट, वनीकरणाची कामे पाहिली. आदर्श ग्राम योजनेचा कालावधी तीन वर्षाचा आहे. या काळात राज्यातली जवळपास ५० ते ६० गावे एकदम बदलेली दिसतील यासाठी आमचे काम चालू आहे.