शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

आता राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना!

By admin | Updated: December 17, 2014 23:51 IST

एकूण बजेटच्या ४५ टक्के बजेट ग्रामविकास खात्याचे असते आणि त्यातला ७५ टक्के निधी केंद्राकडून राज्याच्या नोडल एजन्सीमार्फत थेट जिल्ह्याला जातो.

प्रश्न : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत नेमके काय असेल?उत्तर : या योजनेत राज्य शासनाने निधी द्यावा असे अपेक्षित आहे. शिवाय राज्याच्या विविध योजनांचा आढावा घेऊन एकात्मिक योजना तयार केली जाईल व त्यातून हे काम केले जाईल. मंत्रिमंडळासमोर हा विषय नेला जाणार आहे.प्रश्न : केंद्राचा ग्रामविकास खात्याचा निधी मिळवण्यात आघाडी सरकार यशस्वी ठरले नव्हते. आपण त्यासाठी काय करणार?उत्तर : एकूण बजेटच्या ४५ टक्के बजेट ग्रामविकास खात्याचे असते आणि त्यातला ७५ टक्के निधी केंद्राकडून राज्याच्या नोडल एजन्सीमार्फत थेट जिल्ह्याला जातो. आपण पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा देखील निधी वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहोत. निवडणुकांचा काळ, राजकीय कम्प्लशनपोटी द्यावा लागणारा वेळ वगळता बाकीचे दिवस मी सतत काम करीत राहणार आहे कारण माझे काऊंटडाऊन मी पदभार स्वीकारल्यापासूनच सुरू झाले आहे. प्रश्न : जुन्या सरकारच्या तंटामुक्त गाव, गाडगेबाबा स्वच्छता अभियान या योजना चालू राहतील की बंद होणार?उत्तर : कोणत्याची योजना बंद करणार नाही, मात्र सगळ्या योजनांचा आढावा घेऊ. ज्या योजना निष्फळ आहेत त्यांना पुनरुज्जीवित करू. ज्यातून काहीच निष्पन्न होत नसेल त्या बंद करू. सरकार चांगल्या योजना आणेल पण या सगळ्या योजनांचे यश-अपयश जनतेच्या प्रतिसादावर आणि मानसिकतेवर अवलंबून आहे.प्रश्न : आपला विभाग नेमके कशावर फोकस करणार आहे?उत्तर : मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जलयुक्त शिवार ही योजना जाहीर केली आहे. मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे घेण्यात येतील जेणे करून ग्रामीण भागातील पिण्याचे पाण्याचे संकट कमी होण्यास मदत होईल. शिवाय ग्रामीण भागातील रस्ते चांगले करणे ही देखील महत्त्वाची बाब आपल्यापुढे आहे.प्रश्न : जिल्हा परिषदांच्या शाळांची अवस्था बिकट आहे. त्यासाठी काय करणार?उत्तर : मी स्वत: चौथीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले. त्यावेळीपेक्षा आज त्या शाळांची अवस्था वाईट आहे. मात्र यावर त्या त्या जिल्हा परिषदांचे नियंत्रण असते. या शाळांचे सर्वेक्षण करून त्या जास्तीतजास्त ‘चाईल्ड फ्रेंडली’ कशा होतील याकडे आमचे लक्ष असेल. कागदावरील चित्र आणि वास्तव यात खूप फरक आहे हे मलाही माहिती आहे. पण आम्ही प्रयत्न करणार हे नक्की.प्रश्न : प्रत्येक खासदाराने गाव दत्तक घेण्याची योजना पंतप्रधानांनी मांडली आहे. राज्यात त्याचे रूप काय आहे?उत्तर : खूप चांगला प्रतिसाद आहे. मी स्वत: हिवरेबाजार येथे दिवसभराचा प्रशिक्षण वर्ग घेतला. पाणलोट, वनीकरणाची कामे पाहिली. आदर्श ग्राम योजनेचा कालावधी तीन वर्षाचा आहे. या काळात राज्यातली जवळपास ५० ते ६० गावे एकदम बदलेली दिसतील यासाठी आमचे काम चालू आहे.