शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

मुख्यमंत्री गोगोई यांचा हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा

By admin | Updated: May 7, 2014 23:15 IST

आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी हिंसाचारग्रस्त बक्सा आणि कोक्राझार जिल्ह्याला भेट दिली आणि तेथील जनतेला सरकारकडून सुरक्षा पुरविण्याची हमी दिली.

पुन्हा पाच मृतदेह सापडले : बळींची संख्या ४१, पीडितांची गावाला सशस्त्र करण्याची मागणी

भांगारपार (आसाम) : आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी हिंसाचारग्रस्त बक्सा आणि कोक्राझार जिल्ह्याला भेट दिली आणि तेथील जनतेला सरकारकडून सुरक्षा पुरविण्याची हमी दिली. दरम्यान, बुधवारी पुन्हा पाच मृतदेह सापडले. त्यामुळे बळींची संख्या ४१ वर पोहोचली आहे. गोगोई यांनी बालापारा येथील मदत शिबीर आणि अन्य ठिकाणांच्या शिबिरांना भेटी दिल्या. आत्मसमर्पण केलेल्या बीएलटी अतिरेक्यांनी वनरक्षकांच्या मदतीने आपल्यावर हल्ला केल्याचे स्थानिकांनी त्यांना सांगितले. सरकारने दुहेरी हल्ल्यासाठी प्रतिबंधित एनडीएफबी(एस)ला जबाबदार धरले आहे; परंतु हिंसाचारग्रस्त लोकांनी सत्ताधारी काँग्रेसशी आघाडी असलेला पक्ष बोडोलँड पीपल्स फ्रन्टने हल्ले केल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत बिगर बोडो उमेदवाराला मतदान केल्याचा बदला त्यांनी घेतला, असे हिंसाचारग्रस्ताचे म्हणणे आहे, असे सूत्रांनी सांगितले. भयभीत पीडितांनी आपल्या गावाला सशस्त्र करण्याची मागणी केली, तसेच त्यांनी आपले गाव स्वयंशासित बोडोलँड टेरिटोरिअल आॅटोनॉमस डिस्ट्रिक्ट (बीटीएडी) मधून वेगळे करण्याची मागणी केली. बीटीएडीमध्ये माजी बीएलटी नेत्याचे प्रशासन आहे. या नेत्याने आता बोडोलँड पीपल्स फ्रन्ट नावाने नवीन संघटना स्थापन केली आहे. दरम्यान, बक्सा जिल्ह्यातून वाहत असलेल्या बेकी नदीत पाच मृतदेह आढळून आले आहेत. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. या मृतदेहामध्ये एक १० वर्षांची मुलगी आहे. तिच्या डोक्यावर गोळीची जखम आहे. पाचपैकी तीन मृतदेह बारपेटा जिल्ह्यात आणि दोन मृतदेह शेजारच्या बक्सा जिल्ह्यात आढळून आले. आतापर्यंत नव्याने हिंसाचाराची घटना घडली नसल्याने प्रशासनाने सकाळी ८ पासून आठ तासांकरिता बक्सा जिल्ह्यात आणि कोक्राझार जिल्ह्यात सकाळी ५ वाजेपासून १३ तासांकरिता संचारबंदी शिथिल केली. (वृत्तसंस्था)