शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री फडणवीसांची मोदींकडे 10 हजार कोटींची मागणी

By admin | Updated: May 7, 2016 17:22 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांच्यासमोर महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती मांडली

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 07: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांच्यासमोर महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती मांडली. दुष्काळाबाबत पंतप्रधानांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रानं केंद्राकडे 10 हजार कोटींची मागणी केली आहे. त्यासाठी केंद्र सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मराठवाडा-विदर्भ यासह पश्चिम महाराष्ट्रातील अपुर्ण सिंचन प्रकल्पांसलाठी महाराष्ट्रानं केंद्रकडे 10 हजार कोटींची मागणी केली आहे. त्यासाठी केंद्र सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
 
मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
– दुष्काळासाठी साडे तीन हजार कोटी रुपये आजवर मिळालेत. आजवरची सर्वात मोठी मदत
– राज्य शासनाकडून दुष्काळी परिस्थिती, पावसाची आकडेवारी,धरणांची परिस्थतीवर प्रेझेंटेशनही दिलं.
– 11 हजार अतिरिक्त गावं दुष्काळामध्ये समोर आली आहे..त्यामुळे केंद्र सरकारला सप्लिमेंट्री मेमोरँडम देण्याची मागणी केली.
– येत्या 6 आठवड्यांचा केंद्र आणि राज्यसरकारचा तात्कालिन जॉइंट अँक्शन प्लॅन तयार – मॉन्सूनपूर्व कामांची तयारी
– दीर्घकालीन उपाययोजना – शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठीची तयारी.
– प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत महाराष्ट्राच्या 26 प्रोजेक्ट्सचा सहभाग..त्यासाठीचं लँड एक्विझिशऩसाठी सरकारची मंजुरी.
– विदर्भ आणि मराठवाड्यात 7 हजार कोटींचे प्रकल्प 3 वर्षांत पूर्ण कऱणार. शाश्वत सिंचनाची व्यवस्था.
– अवर्षण प्रवण तालुक्यांतील योजना येत्या 2-3 वर्षांत पूर्ण करण्यासाठी अडीच हजार कोटींच्या पॅकेजची मागणी.
– महाराष्ट्रातील 1 कोटी 36 लाख खातेदार शेतकऱ्यांपैकी 58 लाख शेतकरी कर्ज घेतात.. उर्वरित शेतकरी सावकरी पाशात..अजून 20 लाख शेतकरी क्रेडीट प्लॅनमधे आले पाहिजे.
– 2012 ते 2016 पर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाचं रिशेड्युलिंग केलं जाईल.
– मराठवाड्यात, विदर्भातले अपुरे प्रकल्प ७५०० कोटी रुपये पूर्णपणे केंद्राची मदत मागितली. पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रकल्पांसाठी २५०० कोटी रुपये मागितले आहेत.
– समुद्राचं खारं पाणी पिण्याजोगं करण्याची योजना अद्यापही विचाराधीन आहे..
– मराठवाड्यात पाऊस कमी पडला तरी तो इस्राईल पेक्षा जास्त असतो..त्यामुळे पाण्याचं नियोजन योग्य केल्यास आपण पाणी वर्षभर पुरवू शकतो.
– मराठवाड्यात 2 लाखांपेक्षा जास्त चारा छावण्या सुरू आहेत..ज्यामधे 3 लाखांपेक्षा जास्त जनावरं आहेत..लातूरसाठी पालघरहून चारा नेला होता.