शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री फडणवीसांची मोदींकडे 10 हजार कोटींची मागणी

By admin | Updated: May 7, 2016 17:22 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांच्यासमोर महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती मांडली

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 07: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांच्यासमोर महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती मांडली. दुष्काळाबाबत पंतप्रधानांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रानं केंद्राकडे 10 हजार कोटींची मागणी केली आहे. त्यासाठी केंद्र सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मराठवाडा-विदर्भ यासह पश्चिम महाराष्ट्रातील अपुर्ण सिंचन प्रकल्पांसलाठी महाराष्ट्रानं केंद्रकडे 10 हजार कोटींची मागणी केली आहे. त्यासाठी केंद्र सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
 
मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
– दुष्काळासाठी साडे तीन हजार कोटी रुपये आजवर मिळालेत. आजवरची सर्वात मोठी मदत
– राज्य शासनाकडून दुष्काळी परिस्थिती, पावसाची आकडेवारी,धरणांची परिस्थतीवर प्रेझेंटेशनही दिलं.
– 11 हजार अतिरिक्त गावं दुष्काळामध्ये समोर आली आहे..त्यामुळे केंद्र सरकारला सप्लिमेंट्री मेमोरँडम देण्याची मागणी केली.
– येत्या 6 आठवड्यांचा केंद्र आणि राज्यसरकारचा तात्कालिन जॉइंट अँक्शन प्लॅन तयार – मॉन्सूनपूर्व कामांची तयारी
– दीर्घकालीन उपाययोजना – शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठीची तयारी.
– प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत महाराष्ट्राच्या 26 प्रोजेक्ट्सचा सहभाग..त्यासाठीचं लँड एक्विझिशऩसाठी सरकारची मंजुरी.
– विदर्भ आणि मराठवाड्यात 7 हजार कोटींचे प्रकल्प 3 वर्षांत पूर्ण कऱणार. शाश्वत सिंचनाची व्यवस्था.
– अवर्षण प्रवण तालुक्यांतील योजना येत्या 2-3 वर्षांत पूर्ण करण्यासाठी अडीच हजार कोटींच्या पॅकेजची मागणी.
– महाराष्ट्रातील 1 कोटी 36 लाख खातेदार शेतकऱ्यांपैकी 58 लाख शेतकरी कर्ज घेतात.. उर्वरित शेतकरी सावकरी पाशात..अजून 20 लाख शेतकरी क्रेडीट प्लॅनमधे आले पाहिजे.
– 2012 ते 2016 पर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाचं रिशेड्युलिंग केलं जाईल.
– मराठवाड्यात, विदर्भातले अपुरे प्रकल्प ७५०० कोटी रुपये पूर्णपणे केंद्राची मदत मागितली. पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रकल्पांसाठी २५०० कोटी रुपये मागितले आहेत.
– समुद्राचं खारं पाणी पिण्याजोगं करण्याची योजना अद्यापही विचाराधीन आहे..
– मराठवाड्यात पाऊस कमी पडला तरी तो इस्राईल पेक्षा जास्त असतो..त्यामुळे पाण्याचं नियोजन योग्य केल्यास आपण पाणी वर्षभर पुरवू शकतो.
– मराठवाड्यात 2 लाखांपेक्षा जास्त चारा छावण्या सुरू आहेत..ज्यामधे 3 लाखांपेक्षा जास्त जनावरं आहेत..लातूरसाठी पालघरहून चारा नेला होता.