शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

शेतकरी आत्महत्येबाबत केंद्राला चुकीची माहिती दिल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची कबुली

By admin | Updated: March 17, 2016 14:55 IST

शेतकरी आत्महत्येबाबत केंद्राला चुकीची माहिती दिली असल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे

ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १७ - शेतकरी आत्महत्येबाबत केंद्राला चुकीची माहिती दिली असल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. 
 
शेतक-यांच्या आत्महत्येवर कर्जमाफी हा उपाय नाही. कर्जमाफीने मतं मिळतील मात्र समस्या सुटणार नाहीत. कर्जमाफी हा रामबाण उपाय नाही, कर्जमाफीनंतरही शेतक-यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. त्यामुळे शेतक-यांच्या विकासावर भर देण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत.
 
शेतक-यांच्या कर्जाचं पुनर्गठन करणार आहोत. यावर्षी सिंचन विहीरींच टार्गेट पुर्ण होईल, वर्षभरात 33 हजार सिंचन विहीरी पुर्ण होतील अशी माहिती मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाराष्ट्राचा विकासदर देशापेक्षा जास्त आहे. शेतक-यांशिवाय मेक इन महाराष्ट्र होणार नाही. मेक इन महाराष्ट्रामध्ये शेतमालाचा विचार केला आहे. तसंच नवी मुंबई विमानतळ आणि अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ट्रस्ट तयार करण्याचं काम सुरु असून ट्रस्टचे प्रमुख उद्धव ठाकरे असतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. 
 
शिवाजी महाराजांचं स्मारक 40 महिन्यात पुर्ण करण्यात येणार आहे. तसंच ठाण्यात लवकरच मेट्रो सुरु करणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाचं काम आमच्या सरकारने केलं असून सरकारची भुमिका स्पष्ट आहे. न्यायालयात निकाल आपल्या बाजून लागेल असा विश्वास आहे. मराठा आरक्षणासाठी विरोधकांची भुमिका सकारात्मक आहे, तर मग त्यांनी राजकारण करु नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.