शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

सत्ता मिळालीय, राज्य चांगलं चालवा; राज ठाकरेंच्या आवाहनावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 11:17 IST

राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही सर्वांना सोबत घेऊन राज्य चालवू, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त केलं आहे.

CM Devendra Fadnavis: "राज्य चांगलंच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्य चालवत असताना सर्वांची मदत घेऊन आणि सर्वांना विश्वासात घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी काल राज ठाकरेंचं भाषण संपूर्ण ऐकू शकलो नाही. मात्र मी जेवढं भाषण ऐकलं त्यामध्ये त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. या मुद्द्यांवर आम्ही निश्चितपणे विचार करू," असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावर आपली भूमिका मांडली आहे. ते नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते.

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना काल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केलं होतं. "राज्यात सध्या जुने मुद्दे उकरून काढून लोकांना भरकटवलं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांना मोठ्या बहुमताने या सुसंस्कृत राज्याची सत्ता मिळाली आहे. त्यांनी राज्य चांगलं चालवावं. आम्हाला विश्वासात घेऊन राज्य चालवल्यास आमचा त्यांना पाठिंबा असेल," अशी भूमिका त्यांनी मांडली होती. राज यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही सर्वांना सोबत घेऊन राज्य चालवू, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त केलं आहे.

राज ठाकरे यांनी काल धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांचाही मुद्दा उपस्थित केला होता. "मशि‍दीवरील भोंग्यांच्या आंदोलनानंतर मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले गेले. उत्तर प्रदेश सरकारने भोंगे हटवण्याचा निर्णय घेतला, पण महाराष्ट्रात अजूनही भोंगे आहेत," अशा शब्दांत राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "नियमांच्या बाहेर जे भोंगे आहेत त्यांच्यावर १०० टक्के कारवाई केली जाईल आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचं तंतोतंत पालन महाराष्ट्र सरकारकडून केलं जाईल."

"एएसआयची प्रोटेक्टेड कबर आहे. आम्हाला औरंगजेब आवडो ना आवडो, पण कायद्याने त्या कबरीला ५०-६० वर्षांपासून संरक्षण देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आम्ही त्या कबरीचं संरक्षण करत आहोत. पण कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही," असं मतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

मोदींचा उत्तराधिकारी कोण?

देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.  याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर आपण या स्पर्धेत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही. आम्ही त्यांच्याच नेतृत्वात लढणार आहोत. २०२९मध्येही आम्ही पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडेच बघतो आहोत. त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य नाही. भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार केला जात नाही, करायचाही नसतो. असा विचार करणं ही मुघली संस्कृती आहे. त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी निवडण्याची अजून वेळ आलेली नाही आणि जोपर्यंत माझा विषय आहे, माझा याच्याशी काही संबंधही नाही," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाgudhi padwaगुढीपाडवा