शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

जैन पर्युषण सिध्दीतप पारणा कार्यक्रमास मुख्यमंत्री उपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2016 12:40 IST

पर्युषण पर्वात उपवास आणि अहिंसेचे महत्व मोठे असून ज्यांनी उपवास केले अशा तपस्वींच्या दर्शनाचा लाभ आणि आशीर्वाद मला मिळाला हे माझे भाग्य असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली

ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. ७ -  पर्युषण पर्वात उपवास आणि अहिंसेचे महत्व मोठे असून ज्यांनी उपवास केले अशा तपस्वींच्या दर्शनाचा लाभ आणि आशीर्वाद मला मिळाला हे माझे भाग्य आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज सकाळी ठाणे येथील सिंघानिया स्कूल येथे मुख्यमंत्र्यांनी जैन पर्युषण सिध्दीतप पारणानिमित्त आयोजित कार्यक्रमात येऊन उपवास ठेवलेल्या जैन बांधवांची भेट घेतली तसेच राजस्थानमधून खास या कार्यक्रमासाठी आलेल्या श्री यशोवर्म सुरीश्वरजी महाराज यांचे आशीर्वादही घेतले. 
 
जैन धर्माने जगाला महान मुल्यांची शिकवण दिली
मुख्यमंत्री यावेळी उपवास ठेवलेल्या जैन बंधू आणि भगिनींना उद्देशून म्हणाले कि, जैन धर्मात ‘मिछामि-दुकडम’ असं म्हणून क्षमा मागितली जाते. या पवित्र अशा पर्वात क्षमेला महत्व असून कळत-नकळत माझ्याकडून कुणाचेही मन दुखावले गेले असेल तर मी आपली सगळ्यांची क्षमा मागतो. आज या ऐतिहासिक अशा उपवास समाप्तीच्या निमित्ताने मला एका चांगल्या कार्यसाठी यायला मिळाले याचा मला आनंद आहे. मनुष्य आपल्या कर्मांसाठी स्वत: जिम्मेदार असतो आणि अशावेळी झालेल्या चुकींसाठी प्रार्थना करणे आवश्यक आहे. आमच्या गुरुंनी कठीण तप करून सिद्धी प्राप्त केली आहे, आणि महान अशा मानवी मुल्यांचा अंगीकार केला आहे, त्याची शिकवण समस्त मानवजातीला दिली आहे. आज याप्रसंगी महान अशा गुरुदेवांचे आशीर्वाद घेण्याचा लाभ मला मिलालात्यांच्या आशीर्वादाने आम्ही आमचे काम आणखी चांगल्या पद्धतीने करूत असेही मुख्यमंत्री म्हणाले.
 
मुख्यमंत्र्यांची प्रशंसा
 आपल्या आशीर्वादपर भाषणात श्री यशोवर्म सुरीश्वरजी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाची प्रशंसा केली. ते म्हणाले कि, महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजींची भूमी असून मुख्यमंत्री चांगले काम करीत आहेत. त्यांनी सर्व प्रजा अहिंसक आणि निर्व्यसनी होण्यासाठी प्रयत्न करावेत. आजच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यातही जैन समाजातील तरुण आपले संस्कार विसरलेले नाहीत ही अतिशय चांगली आणि उत्साहवर्धक बाब आहे. याच पद्धतीने आपल्या पुढच्या पिढीने संस्कारी बनावे. यावेळी महाराजांनी मुख्यमंत्र्यांना एक पुस्तकही भेट म्हणून दिले. यावेळी आयोजक श्री ऋषभदेवजी महाराज जैन धर्म टेम्पल एंड ज्ञाती ट्रस्ट, कोकण क्षेत्र यांच्यातर्फे मुख्यमंत्र्यांचा मंगल तिलक लावून सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक यांची उपस्थिती होती. 
आजच्या कार्यक्रमात २३० जणांनी ४४ दिवस सिद्धी तप उपवास केला होता तसेच ३० जणांनी केवळ पाणी पिऊन उपवास केला होता. श्री पद्मयश सुरीश्वरजी महाराज, श्री वीरयश सुरीश्वरजी महाराज यांनीही यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांना आशीर्वाद दिले. 
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष उत्तम सोलंखी, ललित पारेख, भवरलाल सोलंखी, विश्वस्त नारमल जैन, नगराज जैन, सचिव सुरेश बच्छावत, उदय परमार, सुरेश छाजेड, नरेंद्र जैन, वसंत जैन, रमेश पुनमिया, यांनी परिश्रम घेतले.