शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जैन पर्युषण सिध्दीतप पारणा कार्यक्रमास मुख्यमंत्री उपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2016 12:40 IST

पर्युषण पर्वात उपवास आणि अहिंसेचे महत्व मोठे असून ज्यांनी उपवास केले अशा तपस्वींच्या दर्शनाचा लाभ आणि आशीर्वाद मला मिळाला हे माझे भाग्य असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली

ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. ७ -  पर्युषण पर्वात उपवास आणि अहिंसेचे महत्व मोठे असून ज्यांनी उपवास केले अशा तपस्वींच्या दर्शनाचा लाभ आणि आशीर्वाद मला मिळाला हे माझे भाग्य आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज सकाळी ठाणे येथील सिंघानिया स्कूल येथे मुख्यमंत्र्यांनी जैन पर्युषण सिध्दीतप पारणानिमित्त आयोजित कार्यक्रमात येऊन उपवास ठेवलेल्या जैन बांधवांची भेट घेतली तसेच राजस्थानमधून खास या कार्यक्रमासाठी आलेल्या श्री यशोवर्म सुरीश्वरजी महाराज यांचे आशीर्वादही घेतले. 
 
जैन धर्माने जगाला महान मुल्यांची शिकवण दिली
मुख्यमंत्री यावेळी उपवास ठेवलेल्या जैन बंधू आणि भगिनींना उद्देशून म्हणाले कि, जैन धर्मात ‘मिछामि-दुकडम’ असं म्हणून क्षमा मागितली जाते. या पवित्र अशा पर्वात क्षमेला महत्व असून कळत-नकळत माझ्याकडून कुणाचेही मन दुखावले गेले असेल तर मी आपली सगळ्यांची क्षमा मागतो. आज या ऐतिहासिक अशा उपवास समाप्तीच्या निमित्ताने मला एका चांगल्या कार्यसाठी यायला मिळाले याचा मला आनंद आहे. मनुष्य आपल्या कर्मांसाठी स्वत: जिम्मेदार असतो आणि अशावेळी झालेल्या चुकींसाठी प्रार्थना करणे आवश्यक आहे. आमच्या गुरुंनी कठीण तप करून सिद्धी प्राप्त केली आहे, आणि महान अशा मानवी मुल्यांचा अंगीकार केला आहे, त्याची शिकवण समस्त मानवजातीला दिली आहे. आज याप्रसंगी महान अशा गुरुदेवांचे आशीर्वाद घेण्याचा लाभ मला मिलालात्यांच्या आशीर्वादाने आम्ही आमचे काम आणखी चांगल्या पद्धतीने करूत असेही मुख्यमंत्री म्हणाले.
 
मुख्यमंत्र्यांची प्रशंसा
 आपल्या आशीर्वादपर भाषणात श्री यशोवर्म सुरीश्वरजी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाची प्रशंसा केली. ते म्हणाले कि, महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजींची भूमी असून मुख्यमंत्री चांगले काम करीत आहेत. त्यांनी सर्व प्रजा अहिंसक आणि निर्व्यसनी होण्यासाठी प्रयत्न करावेत. आजच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यातही जैन समाजातील तरुण आपले संस्कार विसरलेले नाहीत ही अतिशय चांगली आणि उत्साहवर्धक बाब आहे. याच पद्धतीने आपल्या पुढच्या पिढीने संस्कारी बनावे. यावेळी महाराजांनी मुख्यमंत्र्यांना एक पुस्तकही भेट म्हणून दिले. यावेळी आयोजक श्री ऋषभदेवजी महाराज जैन धर्म टेम्पल एंड ज्ञाती ट्रस्ट, कोकण क्षेत्र यांच्यातर्फे मुख्यमंत्र्यांचा मंगल तिलक लावून सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक यांची उपस्थिती होती. 
आजच्या कार्यक्रमात २३० जणांनी ४४ दिवस सिद्धी तप उपवास केला होता तसेच ३० जणांनी केवळ पाणी पिऊन उपवास केला होता. श्री पद्मयश सुरीश्वरजी महाराज, श्री वीरयश सुरीश्वरजी महाराज यांनीही यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांना आशीर्वाद दिले. 
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष उत्तम सोलंखी, ललित पारेख, भवरलाल सोलंखी, विश्वस्त नारमल जैन, नगराज जैन, सचिव सुरेश बच्छावत, उदय परमार, सुरेश छाजेड, नरेंद्र जैन, वसंत जैन, रमेश पुनमिया, यांनी परिश्रम घेतले.