शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

जैन पर्युषण सिध्दीतप पारणा कार्यक्रमास मुख्यमंत्री उपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2016 12:40 IST

पर्युषण पर्वात उपवास आणि अहिंसेचे महत्व मोठे असून ज्यांनी उपवास केले अशा तपस्वींच्या दर्शनाचा लाभ आणि आशीर्वाद मला मिळाला हे माझे भाग्य असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली

ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. ७ -  पर्युषण पर्वात उपवास आणि अहिंसेचे महत्व मोठे असून ज्यांनी उपवास केले अशा तपस्वींच्या दर्शनाचा लाभ आणि आशीर्वाद मला मिळाला हे माझे भाग्य आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज सकाळी ठाणे येथील सिंघानिया स्कूल येथे मुख्यमंत्र्यांनी जैन पर्युषण सिध्दीतप पारणानिमित्त आयोजित कार्यक्रमात येऊन उपवास ठेवलेल्या जैन बांधवांची भेट घेतली तसेच राजस्थानमधून खास या कार्यक्रमासाठी आलेल्या श्री यशोवर्म सुरीश्वरजी महाराज यांचे आशीर्वादही घेतले. 
 
जैन धर्माने जगाला महान मुल्यांची शिकवण दिली
मुख्यमंत्री यावेळी उपवास ठेवलेल्या जैन बंधू आणि भगिनींना उद्देशून म्हणाले कि, जैन धर्मात ‘मिछामि-दुकडम’ असं म्हणून क्षमा मागितली जाते. या पवित्र अशा पर्वात क्षमेला महत्व असून कळत-नकळत माझ्याकडून कुणाचेही मन दुखावले गेले असेल तर मी आपली सगळ्यांची क्षमा मागतो. आज या ऐतिहासिक अशा उपवास समाप्तीच्या निमित्ताने मला एका चांगल्या कार्यसाठी यायला मिळाले याचा मला आनंद आहे. मनुष्य आपल्या कर्मांसाठी स्वत: जिम्मेदार असतो आणि अशावेळी झालेल्या चुकींसाठी प्रार्थना करणे आवश्यक आहे. आमच्या गुरुंनी कठीण तप करून सिद्धी प्राप्त केली आहे, आणि महान अशा मानवी मुल्यांचा अंगीकार केला आहे, त्याची शिकवण समस्त मानवजातीला दिली आहे. आज याप्रसंगी महान अशा गुरुदेवांचे आशीर्वाद घेण्याचा लाभ मला मिलालात्यांच्या आशीर्वादाने आम्ही आमचे काम आणखी चांगल्या पद्धतीने करूत असेही मुख्यमंत्री म्हणाले.
 
मुख्यमंत्र्यांची प्रशंसा
 आपल्या आशीर्वादपर भाषणात श्री यशोवर्म सुरीश्वरजी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाची प्रशंसा केली. ते म्हणाले कि, महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजींची भूमी असून मुख्यमंत्री चांगले काम करीत आहेत. त्यांनी सर्व प्रजा अहिंसक आणि निर्व्यसनी होण्यासाठी प्रयत्न करावेत. आजच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यातही जैन समाजातील तरुण आपले संस्कार विसरलेले नाहीत ही अतिशय चांगली आणि उत्साहवर्धक बाब आहे. याच पद्धतीने आपल्या पुढच्या पिढीने संस्कारी बनावे. यावेळी महाराजांनी मुख्यमंत्र्यांना एक पुस्तकही भेट म्हणून दिले. यावेळी आयोजक श्री ऋषभदेवजी महाराज जैन धर्म टेम्पल एंड ज्ञाती ट्रस्ट, कोकण क्षेत्र यांच्यातर्फे मुख्यमंत्र्यांचा मंगल तिलक लावून सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक यांची उपस्थिती होती. 
आजच्या कार्यक्रमात २३० जणांनी ४४ दिवस सिद्धी तप उपवास केला होता तसेच ३० जणांनी केवळ पाणी पिऊन उपवास केला होता. श्री पद्मयश सुरीश्वरजी महाराज, श्री वीरयश सुरीश्वरजी महाराज यांनीही यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांना आशीर्वाद दिले. 
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष उत्तम सोलंखी, ललित पारेख, भवरलाल सोलंखी, विश्वस्त नारमल जैन, नगराज जैन, सचिव सुरेश बच्छावत, उदय परमार, सुरेश छाजेड, नरेंद्र जैन, वसंत जैन, रमेश पुनमिया, यांनी परिश्रम घेतले.