शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

कापसाला बोनस देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By admin | Updated: April 8, 2015 23:03 IST

राज्यात कापूस पणन महासंघ आणि कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या (सीसीआय) माध्यमातून कापूस विक्री केलेल्या शेतकऱ्यांना गाठी आणि सरकीच्या

मुंबई : राज्यात कापूस पणन महासंघ आणि कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या (सीसीआय) माध्यमातून कापूस विक्री केलेल्या शेतकऱ्यांना गाठी आणि सरकीच्या विक्रीतून आलेल्या नफ्याचे वाटप बोनस म्हणून करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिले. राज्य सरकारने कापसाला ६ हजार ६८ रुपये क्विंटल इतका उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा, अशी शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. प्रत्यक्षात ४ हजार रुपये इतकाच भाव केंद्राने दिला. तेव्हा २ हजार रुपये फरकाची रक्कम राज्य सरकारने बोनस म्हणून द्यावी, अशी मागणी बच्चू कडू आणि जयकुमार रावल यांनी केली आणि दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी ती उचलून धरली. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील उत्तर देऊ लागताच अगोदर भाव द्या, भाव द्या अशी जोरदार मागणी सदस्यांनी केली. सभागृहातील वातावरण पाहून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सरकारी यंत्रणांमार्फत खरेदी करण्यात आलेल्या कापसाच्या (गाठी) विक्रीतून आलेला नफा मूळ कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांना मिळावा, या संदर्भात आपण केंद्रीय वस्रोद्योग मंत्र्यांशी चर्चा केली असून ते या बाबत सकारात्मक आहेत. ते उद्या मुंबईत येत असून या बाबत त्यांच्याशी पुन्हा चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. (विशेष प्रतिनिधी)