शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

निकषात बसत नसताना मुख्यमंत्र्यांनी दिले आश्‍वासन

By admin | Updated: August 14, 2015 00:13 IST

नवीन पीककर्ज देण्यास बँकेने दर्शविली असर्मथता; आश्‍वासन पुर्ततेसाठी ‘विशेष बाब’ प्रस्ताव.

संग्रामपूर (जि. बुलडाणा): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलडाणा जिल्हा दौर्‍यामध्ये संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयाला २१ मे रोजी भेट देऊन विविध योजनाच्या माध्यमातून मदतीचे आश्‍वासन दिले होते. मात्र खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता निकषांमुळे होत नसल्याचे समोर आले आहे.संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीय नलिनी आनंदा दुधमल रा.लाडणापूर यांच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांत्वनपर भेट दिली होती. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी सदर कुटुंबीयाला शासकीय योजनेमधून सौर कृषी पंप, ठिबक संच तसेच पिक कर्ज योजनेचा लाभ देण्याबाबत निर्देश दिले होते. मात्र दोन महिने उलटूनही मदत मिळत नसल्याने या शेतकरी कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता व्हावी यासाठी सहकुटुंब १0 ऑगस्टपासून उपोषण सुरु केले आहे. तेव्हा खळबळून जागे झालेल्या प्रशासनाने आत्महत्याग्रस्त कुटूंबास दिलेल्या पत्रातुन आश्‍वासनांची पूर्तता करण्यासाठी निकषाची अडचण असल्याचे स्पष्ट केले आहे. सौर कृषी पंप देण्यासंदर्भात पात्रतेचे काही निकषामध्ये लाभार्थ्यांची जमीन ५ एकारापेक्षा कमी असावी, लाभार्थी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील असावा, धडक सिंचन योजनेचा लाभार्थी असावा, लाभार्थी महावितरण कंपनीचा सद्यास्थितीत ग्राहक नसावा असे आहेत. परंतु सदर कुटुंबाकडे मौजे लाडणापूर येथील गट नं.३0१ मध्ये पुर्वीपासून कृषीपंपाची वीज जोडणी असून महावितरणचा ग्राहक आहे. त्यामुळे त्यांना सौर कृषीपंपाचा लाभ अस्तित्वात असणार्‍या नियमानुसार दिल्या जावू शकत नाही.या आत्महत्याग्रस्त कुटुंबास पीककर्ज देण्यासंदर्भात एसबीआय सोनाळा यांचा अहवाल मागविण्यात आला असता कै.आनंदा सोनाजी दुधमल यांनी १३ सप्टेंबर १२ रोजी रूपये १ लाख रूपये पिककर्ज व २ मार्च १0 रोजी रूपये ६0 हजार रू. मुदती कर्ज घेतलेले असून सदर कर्ज थकीत आहे. वरील दोन्ही कर्ज थकीत असल्यामुळे नवीन पीककर्ज देण्यास बँकेने सुध्दा असर्मथता दर्शविली आहे. या प्रकारावरून प्रशानाची हतबलताच समोर आली आहे.