शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

निकषात बसत नसताना मुख्यमंत्र्यांनी दिले आश्‍वासन

By admin | Updated: August 14, 2015 00:13 IST

नवीन पीककर्ज देण्यास बँकेने दर्शविली असर्मथता; आश्‍वासन पुर्ततेसाठी ‘विशेष बाब’ प्रस्ताव.

संग्रामपूर (जि. बुलडाणा): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलडाणा जिल्हा दौर्‍यामध्ये संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयाला २१ मे रोजी भेट देऊन विविध योजनाच्या माध्यमातून मदतीचे आश्‍वासन दिले होते. मात्र खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता निकषांमुळे होत नसल्याचे समोर आले आहे.संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीय नलिनी आनंदा दुधमल रा.लाडणापूर यांच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांत्वनपर भेट दिली होती. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी सदर कुटुंबीयाला शासकीय योजनेमधून सौर कृषी पंप, ठिबक संच तसेच पिक कर्ज योजनेचा लाभ देण्याबाबत निर्देश दिले होते. मात्र दोन महिने उलटूनही मदत मिळत नसल्याने या शेतकरी कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता व्हावी यासाठी सहकुटुंब १0 ऑगस्टपासून उपोषण सुरु केले आहे. तेव्हा खळबळून जागे झालेल्या प्रशासनाने आत्महत्याग्रस्त कुटूंबास दिलेल्या पत्रातुन आश्‍वासनांची पूर्तता करण्यासाठी निकषाची अडचण असल्याचे स्पष्ट केले आहे. सौर कृषी पंप देण्यासंदर्भात पात्रतेचे काही निकषामध्ये लाभार्थ्यांची जमीन ५ एकारापेक्षा कमी असावी, लाभार्थी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील असावा, धडक सिंचन योजनेचा लाभार्थी असावा, लाभार्थी महावितरण कंपनीचा सद्यास्थितीत ग्राहक नसावा असे आहेत. परंतु सदर कुटुंबाकडे मौजे लाडणापूर येथील गट नं.३0१ मध्ये पुर्वीपासून कृषीपंपाची वीज जोडणी असून महावितरणचा ग्राहक आहे. त्यामुळे त्यांना सौर कृषीपंपाचा लाभ अस्तित्वात असणार्‍या नियमानुसार दिल्या जावू शकत नाही.या आत्महत्याग्रस्त कुटुंबास पीककर्ज देण्यासंदर्भात एसबीआय सोनाळा यांचा अहवाल मागविण्यात आला असता कै.आनंदा सोनाजी दुधमल यांनी १३ सप्टेंबर १२ रोजी रूपये १ लाख रूपये पिककर्ज व २ मार्च १0 रोजी रूपये ६0 हजार रू. मुदती कर्ज घेतलेले असून सदर कर्ज थकीत आहे. वरील दोन्ही कर्ज थकीत असल्यामुळे नवीन पीककर्ज देण्यास बँकेने सुध्दा असर्मथता दर्शविली आहे. या प्रकारावरून प्रशानाची हतबलताच समोर आली आहे.