शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
3
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
4
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
5
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
6
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
7
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
8
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ
9
हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
10
Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 
11
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा
12
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
13
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
14
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
15
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
16
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
17
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
18
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
19
हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते केएफसीमध्ये घुसले, रेस्टॉरंटला ठोकले टाळे; म्हणाले, "श्रावणामध्ये नॉन व्हेज..."
20
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्

गोव्यात मुख्यमंत्री-आमदारांची जुगलबंदी रंगली

By admin | Updated: May 24, 2016 03:03 IST

मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती सगळेच घेतात; पण मुख्यमंत्र्यांनीच आमदारांची जाहीर मुलाखत घेण्याची वेळ कधी येत नाही. ‘लोकमत’ने तसा योग शनिवारी जुळवून आणला आणि मुख्यमंत्री लक्ष्मीकांत

पणजी : मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती सगळेच घेतात; पण मुख्यमंत्र्यांनीच आमदारांची जाहीर मुलाखत घेण्याची वेळ कधी येत नाही. ‘लोकमत’ने तसा योग शनिवारी जुळवून आणला आणि मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी कला अकादमीतील भरगच्च प्रेक्षागृहात तीन आमदारांची मुलाखत घेतली. प्रेक्षकांनी टाळ्यांची दाद देत मुलाखत रंगल्याची पावती दिली.काँग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड, भाजपा आमदार डॉ. प्रमोद सावंत व अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांना मार्मिक प्रश्न विचारून मुख्यमंत्र्यांनी मुलाखत खुलविली. कृषी क्षेत्राची पदवी असताना तिथे काम करायचे सोडून तुम्ही राजकारणात कसे आलात? अशी विचारणा मुख्यमंत्र्यांनी सरदेसाई यांना केली. सरदेसाई म्हणाले, कृषी क्षेत्रात बी पेरल्यानंतर रोप उगवतेच; पण राजकारणात पेरलेले उगवतेच असे नाही. राजकीय क्षेत्रात बदल घडवून गोव्याला पुढे न्यावे, असा हेतू आहे. तुम्ही पूर्वी खूप प्रश्न विचारत होता; पण अलीकडे तुम्ही प्रश्न विचारणे सोडले. तुम्ही माझ्या प्रेमात वगैरे पडला आहात का? असे मुख्यमंत्र्यांनी आलेक्स यांना विचारले. आलेक्स म्हणाले, राजकारणात कुणीच कुणाचे कायम मित्र आणि शत्रू नसतात. मी पूर्वी प्रश्न विचारत होतो हे खरे आहे; पण आता काँग्रेसमध्ये अनेक ज्येष्ठ राजकारणी असून, या निवडणूक वर्षात तरी त्यांनी प्रश्न विचारावेत म्हणून मी थोडा गप्प आहे. तुम्ही संधी दिली तर मी आणखीही प्रश्न विचारेन.वैद्यकीय क्षेत्रात वावरताना तुम्हाला डॉक्टर म्हणून रुग्णांची नाडी जशी समजते तशी तुमच्या मतदारांची समजली आहे का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी आमदार सावंत यांना विचारला. साखळी मतदारसंघातील लोकांची नाडी मला निश्चितच समजली आहे, असे उत्तर सावंत यांनी दिले. मी आणि माझी पत्नी दोघेही राजकारणात असलो तरी मुलांकडे दुर्लक्ष होत नाही. माझे आईवडील मुलांना सांभाळतात. मी राजकारणात येण्यापूर्वी वडीलही राजकारणात होते. तुम्ही संधी दिली तर साखळीसह पूर्ण गोव्याकडेही मी लक्ष देऊ शकेन, असे उत्तर सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या अन्य एका प्रश्नादाखल दिले. तुम्ही अपक्ष आमदार आहात, सरकारला कधीतरी पाठिंबा द्यावा असे तुम्हाला वाटते का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी आमदार सरदेसाई यांना विचारला. मी प्रारंभी पर्यटनाच्या विषयावर सरकारला पाठिंबा दिला होता; पण सरकारच्या वागणुकीत बदल झाला नाही, त्यामुळे माझ्या पाठिंब्याचा लाभ गोव्याच्या जनतेला झाला नाही. जिथे सरकारला पाठिंबा देणे गरजेचे असते तिथे आपण तो दिलेला आहे, असे सरदेसाई म्हणाले. तुमच्या कारकिर्दीतील सर्वांत आनंदातील क्षण कोणता? अशी विचारणा मुख्यमंत्र्यांनी केली असता आलेक्स म्हणाले, पर्रीकर जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांचे काम मी पाहिले होते. परिवर्तनाच्या नावाखाली ते मुख्यमंत्री बनले. पण त्यांनी अपेक्षाभंग केला. (प्रतिनिधी)