शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

मुख्यमंत्री दीक्षांत समारंभाचे मुख्य अतिथी

By admin | Updated: January 21, 2015 00:23 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०१ वा दीक्षांत समारंभ २० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या दीक्षांत समारंभाला मुख्य अतिथी म्हणून कुणाला बोलविण्यात येणार

नागपूर विद्यापीठ : सी.एन.आर.राव, कैलाश सत्यार्थींच्या नावाचा विचार नाहीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०१ वा दीक्षांत समारंभ २० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या दीक्षांत समारंभाला मुख्य अतिथी म्हणून कुणाला बोलविण्यात येणार याबाबत विद्यापीठ वर्तुळात उत्सुकता होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव अंतिम झाले असून त्यांनीदेखील याकरिता होकार दिला आहे. दरम्यान सुप्रसिद्ध वैज्ञानिक व भारतरत्न पुरस्कारप्राप्त सी.एन.आर.राव किंवा नोबेल शांती पुरस्कार विजेते समाजसेवक कैलाश सत्यार्थी यांना अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.नागपूर विद्यापीठाचा १०१ वा दीक्षांत समारंभ २० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्याचे निश्चित झाले व राज्यपाल कार्यालयाकडून या तारखेला मंजुरी देण्यात आली. वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मुख्य अतिथी म्हणून कुणाला आमंत्रित करायचे यासंदर्भात चर्चा झाली. या समारंभाला शैक्षणिक व्यक्तीच मुख्य अतिथी म्हणून बोलविण्यात यावी, असा सदस्यांचा सूर दिसून आला. यावेळी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील निरनिराळ्या व्यक्तींची नावे सदस्यांकडून सुचविण्यात आली. यात भारतरत्न सी.एन.आर.राव तसेच कैलाश सत्यार्थी यांच्या नावांवर भर देण्यात आला.या दोघाही मान्यवरांना संपर्क करून निमंत्रण देण्यासंदर्भात विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. याचदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होकार देण्यात आला. त्यामुळे त्यांच्याच नावावर अधिकाऱ्यांचे एकमत झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुख्यमंत्र्यांना इतका वेळ देणे शक्य होईल की नाही ही बाब लक्षात घेता शिक्षक किंवा सामाजिक क्षेत्रातील नामांकित व्यक्तीला निमंत्रित करण्याचा विचार होता. परंतु आता मुख्यमंत्र्यांनी वेळ देण्याचे मान्य केल्यामुळे इतर नावांचा विचार न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)मुख्यमंत्री देणार अडीच तास साधारणत: दीक्षांत समारंभ हा अडीच ते तीन तास चालतो. मुख्यमंत्र्यांचे व्यस्त वेळापत्रक लक्षात घेता त्यांना इतका वेळ देणे शक्य होईल की नाही हा विद्यापीठातील अधिकाऱ्यांना प्रश्न पडला होता. परंतु मुख्यमंत्री विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला थोडेथोडके नव्हे तर अडीच तास उपस्थित राहणार आहेत.