शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

मिरज पूर्व भागात दुधात रसायनाची भेसळ

By admin | Updated: September 6, 2015 22:51 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : कारवाईची मागणी

अण्णा खोत- मालगाव  मिरजपूर्व भागात दूध संकलन करणाऱ्या टोळ्यांनी भेसळीसाठी विषारी घातक रसायनाची (कृत्रिम दूध) भेसळ सुरु केली आहे. मिरजपूर्व भागात दूध व्यवसाय तेजीत आहे. जनावरांच्याच्या खाद्याचे वाढते दर, त्या तुलनेत दुधाला न मिळणारा दर शेतकऱ्यांना पडवणारा नाही. मात्र दूध संकलन करणाऱ्यांचे उखळ पांढरे होत आहे. शेतकऱ्यांकडून कमी दराने केलेल्या दूध खरेदीत अधिक नफा मिळत असतानाही, त्यांनी दुधात भेसळ सुरु केली आहे. दुधाची वाढ व फॅट लागण्यासाठी आरोग्याला घातक असणाऱ्या लॅक्टो, नवसागर या रसायनाबरोबरच स्टार्च पावडर, युरियापासून तयार केलेले दूधसदृश द्रावण थेट दुधात भेसळ केले जात आहे. लॅक्टो हे रसायन फॅट वाढीसाठी वापरले जात असले तरी, यामुळे हृदयावर परिणाम होतो, वंध्यत्व व अंगफुगीवर परिणाम होतो. दूध टिकण्यासाठी युरियाचा वापर केला जातो. युरियाच्या मिश्रणाने किडनी निकामी होणे, अंधत्व येणे व विषबाधा होते, तर द्रव्याला पांढरा रंग येण्यासाठी वापरली जाणारी स्टार्च पावडर शरीरावर गंभीर परिणामकारक असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे. मिरज पूर्व भागात संकलन होणारे दूध शहरी भागातील खासगी दूध केंद्रांना वितरित केले जाते. यामध्ये भेसळीचे प्रमाण वाढले असून, कारवाईची मागणी आहे. कारवाई थंडावली ! -अन्न सुरक्षा कायद्याच्या निर्मितीनंतर दुधातील भेसळ शोधण्याची व कारवाईची जबाबदारी दुग्ध विकास विभागाकडून अन्न व औषध प्रशासनाकडे सोपविण्यात आली आहे. दुग्धविकास विभागाला दुधातील भेसळ करणारे व भेसळ कशी होते याबाबत माहिती व अनुभव आहे. मात्र कारवाईचे अधिकार काढून घेतल्याने दुधातील भेसळीविरुध्दची कारवाई वर्षभर थंडावली आहे. यामुळेच दूध भेसळ करणाऱ्यांचे फावले आहे.