शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

चेंबूरचे सहा जण बुडाले

By admin | Updated: July 7, 2014 04:13 IST

मुरूडच्या समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या नऊ पर्यटकांपैकी सहा जणांचा खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी दुपारी घडली.वृत्त कळताच चेंबूरच्या घाटला गावावर शोककळा पसरली.

मुरूड/मुंबई : मुरूडच्या समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या नऊ पर्यटकांपैकी सहा जणांचा खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी दुपारी घडली. हे वृत्त कळताच चेंबूरच्या घाटला गावावर शोककळा पसरली.मुरूड येथील पार्वती लॉजमध्ये चेंबूर, घाटला वॉर्ड नं. १४७ येथे राहणारे १७ छोटे बांधकाम व्यावसायिक पर्यटनासाठी आले होते. आज सकाळी ११ च्या सुमारास काही जण समुद्रात उतरले होते. पोहण्यास अयोग्य जागी ते नेमके पोहण्यास गेले. पोहता पोहता ते खोलगट भागात गेले. तिथे पाण्याचा अंदाज न आल्याने आठ जण बुडाले. इतरांनी आरडाओरडा केल्याने स्थानिक मच्छीमार त्यांच्या मदतीसाठी धावले. त्यांनी प्रयत्नांची शर्थ करून डोळस, अनिल बानट व देवीदास पांचाळ यांना वाचविले. मात्र इतर सहा जण खोल पाण्यात बुडाले. मृतांमध्ये विनोद देवनारायण आजाई (४०), दिनेश सखाराम पवार (४५), दिलीप रामचंद्र घोले (४५), संजय नारायण पांचाळ (४३), शंकर चव्हाण (४०) व रोहित छगनभाई झाला (५५) यांचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह विच्छेदनासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात पाठविल्याचे सहायक पोलीस निरीक्षक शेख यांनी सांगितले.