शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

चव्हाणांचा बोलविता धनी वेगळाच

By admin | Updated: January 21, 2017 01:33 IST

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सरचिटणीस भारती चव्हाण यांनी विकृत मनोवृत्तीतून आरोप केले आहेत

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सरचिटणीस भारती चव्हाण यांनी विकृत मनोवृत्तीतून आरोप केले आहेत. पक्षात एवढा अन्याय झाला, तर २५ वर्षे काय करीत होतात. निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे, अशी टीका महापौर शकुंतला धराडे यांनी भाजपाच्या नेत्यांचे नाव न घेता केली.भारती चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी दादागिरी थांबवावी, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आवाहन केले होते. या टीकेचा समाचार महापौर धराडे यांनी घेतला. त्या म्हणाल्या, ‘‘अनेक वर्षे पक्षात राहून मोठे होऊन आणि स्वकर्माने विजनवासात गेलेल्या चव्हाण यांचे आरोप हास्यास्पद आणि बिनबुडाचे आहेत. स्वार्थासाठी इतर पक्षाची वाट धरताना आरोप करण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे. जनमाणसात काहीही स्थान नसताना पक्षाची कार्यकर्ती म्हणून त्यांचा नेहमीच सन्मान ठेवण्यात आला. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा स्वार्थ उफाळून आला आहे. इतर पक्षांतील काही नेते त्यांचा आधार घेत आहेत. त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे. त्यांनी पक्षनेतृत्वावर केलेले आरोप हे विकृतपणाचे लक्षण आहे. पक्षात जर एवढाच अन्याय होत होता, तर आजपर्यंत का पक्षात राहिल्या. दादागिरी आजच दिसली का, ज्या पक्षाने महिलांना जास्त न्याय दिला त्याच नेत्यांवर महिलांना संधी मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे. (प्रतिनिधी)पक्षामध्ये गुंड, चोर, खुनी, मटकेवाले होते; तर आपण २५ वर्षे आवाज का उठविला नाही. नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करण्याचा आपणास अधिकार आहे का? आणि ज्यांच्या इशाऱ्यावर आपण बोलता त्यांची नैतिकता काय, हे जनता जाणून आहे. बगलबच्च्यांच्या संस्कारावर बोलण्यापेक्षा संस्काराची व्याख्या शिकून घ्या, अशी टीका धराडे यांनी केली.