शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

चव्हाणांचा बोलविता धनी वेगळाच

By admin | Updated: January 21, 2017 01:33 IST

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सरचिटणीस भारती चव्हाण यांनी विकृत मनोवृत्तीतून आरोप केले आहेत

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सरचिटणीस भारती चव्हाण यांनी विकृत मनोवृत्तीतून आरोप केले आहेत. पक्षात एवढा अन्याय झाला, तर २५ वर्षे काय करीत होतात. निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे, अशी टीका महापौर शकुंतला धराडे यांनी भाजपाच्या नेत्यांचे नाव न घेता केली.भारती चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी दादागिरी थांबवावी, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आवाहन केले होते. या टीकेचा समाचार महापौर धराडे यांनी घेतला. त्या म्हणाल्या, ‘‘अनेक वर्षे पक्षात राहून मोठे होऊन आणि स्वकर्माने विजनवासात गेलेल्या चव्हाण यांचे आरोप हास्यास्पद आणि बिनबुडाचे आहेत. स्वार्थासाठी इतर पक्षाची वाट धरताना आरोप करण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे. जनमाणसात काहीही स्थान नसताना पक्षाची कार्यकर्ती म्हणून त्यांचा नेहमीच सन्मान ठेवण्यात आला. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा स्वार्थ उफाळून आला आहे. इतर पक्षांतील काही नेते त्यांचा आधार घेत आहेत. त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे. त्यांनी पक्षनेतृत्वावर केलेले आरोप हे विकृतपणाचे लक्षण आहे. पक्षात जर एवढाच अन्याय होत होता, तर आजपर्यंत का पक्षात राहिल्या. दादागिरी आजच दिसली का, ज्या पक्षाने महिलांना जास्त न्याय दिला त्याच नेत्यांवर महिलांना संधी मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे. (प्रतिनिधी)पक्षामध्ये गुंड, चोर, खुनी, मटकेवाले होते; तर आपण २५ वर्षे आवाज का उठविला नाही. नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करण्याचा आपणास अधिकार आहे का? आणि ज्यांच्या इशाऱ्यावर आपण बोलता त्यांची नैतिकता काय, हे जनता जाणून आहे. बगलबच्च्यांच्या संस्कारावर बोलण्यापेक्षा संस्काराची व्याख्या शिकून घ्या, अशी टीका धराडे यांनी केली.