शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

चव्हाणांचा बोलविता धनी वेगळाच

By admin | Updated: January 21, 2017 01:33 IST

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सरचिटणीस भारती चव्हाण यांनी विकृत मनोवृत्तीतून आरोप केले आहेत

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सरचिटणीस भारती चव्हाण यांनी विकृत मनोवृत्तीतून आरोप केले आहेत. पक्षात एवढा अन्याय झाला, तर २५ वर्षे काय करीत होतात. निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे, अशी टीका महापौर शकुंतला धराडे यांनी भाजपाच्या नेत्यांचे नाव न घेता केली.भारती चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी दादागिरी थांबवावी, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आवाहन केले होते. या टीकेचा समाचार महापौर धराडे यांनी घेतला. त्या म्हणाल्या, ‘‘अनेक वर्षे पक्षात राहून मोठे होऊन आणि स्वकर्माने विजनवासात गेलेल्या चव्हाण यांचे आरोप हास्यास्पद आणि बिनबुडाचे आहेत. स्वार्थासाठी इतर पक्षाची वाट धरताना आरोप करण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे. जनमाणसात काहीही स्थान नसताना पक्षाची कार्यकर्ती म्हणून त्यांचा नेहमीच सन्मान ठेवण्यात आला. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा स्वार्थ उफाळून आला आहे. इतर पक्षांतील काही नेते त्यांचा आधार घेत आहेत. त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे. त्यांनी पक्षनेतृत्वावर केलेले आरोप हे विकृतपणाचे लक्षण आहे. पक्षात जर एवढाच अन्याय होत होता, तर आजपर्यंत का पक्षात राहिल्या. दादागिरी आजच दिसली का, ज्या पक्षाने महिलांना जास्त न्याय दिला त्याच नेत्यांवर महिलांना संधी मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे. (प्रतिनिधी)पक्षामध्ये गुंड, चोर, खुनी, मटकेवाले होते; तर आपण २५ वर्षे आवाज का उठविला नाही. नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करण्याचा आपणास अधिकार आहे का? आणि ज्यांच्या इशाऱ्यावर आपण बोलता त्यांची नैतिकता काय, हे जनता जाणून आहे. बगलबच्च्यांच्या संस्कारावर बोलण्यापेक्षा संस्काराची व्याख्या शिकून घ्या, अशी टीका धराडे यांनी केली.