शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

चव्हाणांचा बोलविता धनी वेगळाच

By admin | Updated: January 21, 2017 01:33 IST

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सरचिटणीस भारती चव्हाण यांनी विकृत मनोवृत्तीतून आरोप केले आहेत

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सरचिटणीस भारती चव्हाण यांनी विकृत मनोवृत्तीतून आरोप केले आहेत. पक्षात एवढा अन्याय झाला, तर २५ वर्षे काय करीत होतात. निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे, अशी टीका महापौर शकुंतला धराडे यांनी भाजपाच्या नेत्यांचे नाव न घेता केली.भारती चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी दादागिरी थांबवावी, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आवाहन केले होते. या टीकेचा समाचार महापौर धराडे यांनी घेतला. त्या म्हणाल्या, ‘‘अनेक वर्षे पक्षात राहून मोठे होऊन आणि स्वकर्माने विजनवासात गेलेल्या चव्हाण यांचे आरोप हास्यास्पद आणि बिनबुडाचे आहेत. स्वार्थासाठी इतर पक्षाची वाट धरताना आरोप करण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे. जनमाणसात काहीही स्थान नसताना पक्षाची कार्यकर्ती म्हणून त्यांचा नेहमीच सन्मान ठेवण्यात आला. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा स्वार्थ उफाळून आला आहे. इतर पक्षांतील काही नेते त्यांचा आधार घेत आहेत. त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे. त्यांनी पक्षनेतृत्वावर केलेले आरोप हे विकृतपणाचे लक्षण आहे. पक्षात जर एवढाच अन्याय होत होता, तर आजपर्यंत का पक्षात राहिल्या. दादागिरी आजच दिसली का, ज्या पक्षाने महिलांना जास्त न्याय दिला त्याच नेत्यांवर महिलांना संधी मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे. (प्रतिनिधी)पक्षामध्ये गुंड, चोर, खुनी, मटकेवाले होते; तर आपण २५ वर्षे आवाज का उठविला नाही. नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करण्याचा आपणास अधिकार आहे का? आणि ज्यांच्या इशाऱ्यावर आपण बोलता त्यांची नैतिकता काय, हे जनता जाणून आहे. बगलबच्च्यांच्या संस्कारावर बोलण्यापेक्षा संस्काराची व्याख्या शिकून घ्या, अशी टीका धराडे यांनी केली.