शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठाचा अनागोंदी कारभार, फार्मसीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती

By admin | Updated: July 10, 2017 12:37 IST

निकाल वेळेवर मिळत नसल्याने फार्मसीच्या जवळपास 40 विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - मुंबई विद्यापीठाचे निकाल उशीरा लागत असल्याचा फटका फार्मसीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. निकाल वेळेवर मिळत नसल्याने फार्मसीच्या जवळपास 40 विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. हे सर्व विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या बाहेर जमा झाले असून आपला निकाल लवकराच लवकर हाती देण्याची मागणी करत आहेत. अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांसमोर आपलं एक महत्वाचं शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची, सोबतच ‘नायपर’सारख्या प्रतिष्ठीत संस्थेत एमफार्म अभ्यासक्रमाचा प्रवेश हुकण्याची भीती निर्माण झाली आहे.
 
आणखी वाचा
पुणे विद्यापीठाची मुंबई विद्यापीठाला मदत
मुंबई विद्यापीठाचा मनोरा ढासळला - उद्धव ठाकरे
 
मुंबई विद्यापीठातील बी. फार्मच्या 2017 बॅचमधील विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांसहित सर्वात कठीण मानली जाणारी  ‘नायपर’ (राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन संचालनालय) या संस्थेची प्रवेश परिक्षा उत्तीर्ण केली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार 17 जुलै रोजी चंदिगड येथे विद्यार्थ्यांचं समुपदेशन होणार आहे. मात्र ‘नायपर’ने समुपदेशनादरम्यान आठव्या सेमिस्टरचा निकाल दाखल करणं बंधनकारक केलं आहे. दुसरीकडे मुंबई विद्यापीठाचे निकाल उशीरा लागत असून समुदेशनाच्या आधी तो हाती येण्याची शक्यता फार कमी आहे. 
 
निकालाची मागणी करण्यासाठी कलिनाबाहेर जमलेले विद्यार्थी
 
 
विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठासमोर आपली समस्या मांडली असता निकाल उशीरा लागत असल्याचं एक पत्र त्यांनी दिलं. यानंतर विद्यार्थ्यीनी ‘नायपर’मधील संबंधित अधिका-यांशी संवाद साधला असता त्यांनी पत्र ग्राह्य धरण्यास नकार देत, निकालाची प्रत देणं बंधनकारक असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे त्याआधी तरी निकाल मिळावा यासाठी विद्यार्थी प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांनी यासंबंधी शैक्षणिक मंत्री विनोद तावडे यांनाही पत्र लिहिलं आहे.