शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

मुंबई विद्यापीठाचा अनागोंदी कारभार, फार्मसीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती

By admin | Updated: July 10, 2017 12:37 IST

निकाल वेळेवर मिळत नसल्याने फार्मसीच्या जवळपास 40 विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - मुंबई विद्यापीठाचे निकाल उशीरा लागत असल्याचा फटका फार्मसीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. निकाल वेळेवर मिळत नसल्याने फार्मसीच्या जवळपास 40 विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. हे सर्व विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या बाहेर जमा झाले असून आपला निकाल लवकराच लवकर हाती देण्याची मागणी करत आहेत. अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांसमोर आपलं एक महत्वाचं शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची, सोबतच ‘नायपर’सारख्या प्रतिष्ठीत संस्थेत एमफार्म अभ्यासक्रमाचा प्रवेश हुकण्याची भीती निर्माण झाली आहे.
 
आणखी वाचा
पुणे विद्यापीठाची मुंबई विद्यापीठाला मदत
मुंबई विद्यापीठाचा मनोरा ढासळला - उद्धव ठाकरे
 
मुंबई विद्यापीठातील बी. फार्मच्या 2017 बॅचमधील विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांसहित सर्वात कठीण मानली जाणारी  ‘नायपर’ (राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन संचालनालय) या संस्थेची प्रवेश परिक्षा उत्तीर्ण केली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार 17 जुलै रोजी चंदिगड येथे विद्यार्थ्यांचं समुपदेशन होणार आहे. मात्र ‘नायपर’ने समुपदेशनादरम्यान आठव्या सेमिस्टरचा निकाल दाखल करणं बंधनकारक केलं आहे. दुसरीकडे मुंबई विद्यापीठाचे निकाल उशीरा लागत असून समुदेशनाच्या आधी तो हाती येण्याची शक्यता फार कमी आहे. 
 
निकालाची मागणी करण्यासाठी कलिनाबाहेर जमलेले विद्यार्थी
 
 
विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठासमोर आपली समस्या मांडली असता निकाल उशीरा लागत असल्याचं एक पत्र त्यांनी दिलं. यानंतर विद्यार्थ्यीनी ‘नायपर’मधील संबंधित अधिका-यांशी संवाद साधला असता त्यांनी पत्र ग्राह्य धरण्यास नकार देत, निकालाची प्रत देणं बंधनकारक असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे त्याआधी तरी निकाल मिळावा यासाठी विद्यार्थी प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांनी यासंबंधी शैक्षणिक मंत्री विनोद तावडे यांनाही पत्र लिहिलं आहे.