शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

खुर्चीसाठी अधिकाऱ्यांच्या भूमिकेत बदल

By admin | Updated: July 7, 2015 03:15 IST

प्रशासनामुळे व्यवस्थेबाबत नाराजी वाढू लागली आहे, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नोकरशाहीवर टीका केली.

मुंबई : राजकारणी पदांना चिकटून राहतात अशी टीका सतत होते. मात्र अधिकारीही खुर्चीला चिकटून राहण्याकरिता भूमिका बदलतात. अधिकाऱ्यांच्या उत्तरदायित्वाचा एकदा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. कारण प्रशासनामुळे व्यवस्थेबाबत नाराजी वाढू लागली आहे, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नोकरशाहीवर टीका केली.विरोधी पक्षनेत्यांचे टष्ट्वीटर हँडल आणि फेसबुक पेजचे सोमवारी रिलाँचिंग करण्यात आले. त्यावेळी विखे-पाटील बोलत होते. ते म्हणाले की, नोकरशाहीच्या उत्तरदायित्वाबाबत काहीच बोलले जात नाही. आम्ही राजकीय नेते सत्तेवर येतो व जातो. परंतु खरे सरकार नोकरशाहीच चालवते. काँग्रेसच्या सत्तेच्या काळात आपल्याकडे असलेल्या खात्याशी संबंधित धोरणाला विरोध करणाऱ्या अधिकाऱ्याने सत्ताबदल होताच तेच धोरण योग्य असल्याचा अभिप्राय देऊन मंजूर केले. आपण त्या अधिकाऱ्याला याबाबत विचारले असता सत्ताबदलानंतर परिस्थिती बदलल्याने आपण असे केल्याचे सांगितले. मंत्री, खासदार व आमदार खुर्चीला चिकटून राहतात असे आरोप केले जातात. मात्र येथे अधिकारी खुर्चीला चिकटून राहण्याकरिता भूमिका बदलताना दिसत आहेत.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वसाहतीला अलीकडे भेट दिली तर तेथे काही गुंडांनी घुसखोरी केल्याचे निदर्शनास आले. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता आपण कधीही त्या वसाहतीला भेट दिलेली नाही, अशी निलाजरी कबुली त्यांनी दिली. मालवणी दारुकांडातील ६५ जण मृत्यूमुखी पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामात फार व्यस्त असल्याने ते शताब्दी रुग्णालयाकडे फिरकले नाहीत. (विशेष प्रतिनिधी)-------भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे पानितप होणे हा राज्यातील सरकारविरोधी कौल असून यापुढे भाजपाची घसरण सुरूच राहील, असा दावा विखे-पाटील यांनी केला. येत्या पावसाळी अधिवेशनात आक्रमक विरोधी पक्ष व विरोधी पक्षनेता पाहायला मिळेल, असे ते म्हणाले.