शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सरकारनं वैधमापन शास्त्र नियमांमध्ये केले बदल

By admin | Updated: July 6, 2017 21:21 IST

एकाच प्रकारच्या पॅकबंद वस्तूंवर दोन (दुहेरी) कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) छापण्यास आळा घालण्यात यावा

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 6 - एकाच प्रकारच्या पॅकबंद वस्तूंवर दोन (दुहेरी) कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) छापण्यास आळा घालण्यात यावा, या राज्य सरकारनं केलेल्या मागणीचा विचार करून केंद्राच्या ग्राहक उपभोक्ता मंत्रालयाने वैधमापन शास्त्र (आवेष्टित वस्तू) नियमांमध्ये बदल केले आहेत. नियमात बदल होण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट आणि अप्पर पोलीस महानिरीक्षक तथा वैधमापन शास्त्र यंत्रणेचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी विशेष पाठपुरावा केला होता. यामुळे आता कोणत्याही पॅकबंद वस्तूंवर दोन एमआरपी छापण्याच्या प्रथेस आळा बसणार असून, ग्राहकांची फसवणूक टळणार आहे.एकाच प्रकारच्या पॅकबंद (आवेष्टित) वस्तूवर दोन (दुहेरी) एमआरपी छापण्याच्या प्रथेविरुद्ध राज्य शासनाच्या वैधमापन शास्त्र यंत्रणेने मागील वर्षी राज्यभरात विशेष मोहीम उघडली होती. त्यामध्ये दोन एमआरपी छापणाऱ्या मोठमोठ्या कंपन्यांविरुद्ध खटले नोंदविण्यात आले होते. या यंत्रणेच्या कारवाईस संबंधित कंपन्यांनी वेगवेगळ्या स्तरावर तसेच न्यायालयात आव्हान दिले होते. ही प्रथा बंद व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या वैधमापन शास्त्र यंत्रणेमार्फत मंत्री बापट व नियंत्रक गुप्ता यांनी केंद्राच्या ग्राहक उपभोक्ता मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. आणखी वाचा(मुंबईतल्या "त्या" शेतकऱ्यांची नावं लवकरच जाहीर करू - मुख्यमंत्री)(आभाळच फाटलेय, पण शिवून दाखवू - मुख्यमंत्री)राज्याची मागणी लक्षात घेऊन ग्राहक उपभोक्ता मंत्रालयाने वैधमापन शास्त्र (आवेष्टित वस्तू) नियमांमध्ये 23 जून 2017 रोजीच्या राजपत्राद्वारे आवश्यक ते बदल केले आहे. यानुसार आता एकाच प्रकारच्या पॅकबंद वस्तूवर दोन एमआरपी छापण्यास बंदी घालण्यात आली आहे. या नियमातील बदल हे 1 जानेवारी 2018 पासून अंमलात येणार आहेत.