शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वरूप बदलल्याने आखाडे उरले यात्रांपुरते

By admin | Updated: May 5, 2017 02:08 IST

गावोगावच्या यात्रांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कुस्तीमध्ये काळानरूप मोठे बदल झाले. घरंदाज पाटलांचा खेळ मानल्या जाणाऱ्या

निलेश काण्णव / घोडेगावगावोगावच्या यात्रांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कुस्तीमध्ये काळानरूप मोठे बदल झाले. घरंदाज पाटलांचा खेळ मानल्या जाणाऱ्या कुस्तीमधील पैलवान राजकीय क्षेत्र व गुंडगिरीकडे वळू लागल्याने ‘पै’ संस्कृती वाढली. पूर्वी गावागावांत असलेल्या तालमी, हौद बंद झाले व गावाचा कु स्ती हा खेळ फक्त यात्रेतील आखाड्यापुरताच उरला आहे.पूर्वी कुस्तीला मान होता, घरंदाज पाटलांची मुले कु स्ती खेळायची. ज्या घराण्यात पैलवानकी असायची त्या घराला समाजात मोठा मान होता. जो चांगला पैलवान असायचा त्याला लोक लगेच मुली द्यायला पुढे येत होते. हाच पैलवान पुढे पाटील, सरपंच व्हायचा. पूर्वी गावोगावी कुस्त्यांच्या स्पर्धा होत असायच्या. कुस्तीसाठी गावातील तरुण मोठी तयारी करत असायचे. सदृढ शरीर, काटक व बलवान करून कुस्ती मोठ्या आत्मविश्वासाने खेळली जायची. हळूहळू कुस्तीला खेळाचे स्वरूप प्राप्त झाले व कालांतराने मिश्रण असलेले कुस्ती प्रकार खेळले जाऊ आले. हे सुद्धा काही विशिष्ट ठिकाणी खेळले जातात. मात्र गावोगावी असणाऱ्या तालमी बंदच झाल्या. पैलवान म्हणजे बिनकामाचा माणूस, गुडघ्यात मेंदू असे लोक म्हणू लागले. तसेच शहराला जोडून असणाऱ्या ग्रामीण भागात कुस्तीपट्टू राजकारणातबरोबरच गुंडगिरीमध्ये आले, त्यामुळे हा खेळ पूर्णच बदलला. कुस्तीमध्ये येऊन पैलवानकीत नाव कमविण्याऐवजी शरीर कमवून त्याचा गैरवापर करत पैसे कमविण्याकडे तरुण वळाले. त्यात कुस्तीपट्टूंच्या नावापुढे ‘पै’ हा शब्द जोडला गेला, त्यामुळे कुस्तीपट्टूंचे जास्तच वजन वाढले. भोर, मावळ, मुळशीपासून साताऱ्यापर्यंत प्रत्येक घरातील मुलगा तालमीसाठी कोल्हापूरला जायचा. आताचे तेथील पैलवान मारामारी, गुंडगिरीमध्ये सर्वांत पुढे आहेत. घोडेगावमधील ज्येष्ठ पैलवान व पंच सूर्यकांत झोगडे म्हणाले, की आखाड्यात गावातील पंच व सरपंच कुस्ती चालू असताना देखरेख ठेवतात, शेवटी कुस्ती निकाली न झाल्यास चांगल्या कुस्तीगिरास त्याचा डावपेच, पकडी यांवर गुण देऊन विजयी ठरवतात. पण आता गावाकडे पंचही राहिले नाहीत आणि पूर्वीसारखे पैलवानदेखील राहिले नाहीत. आताचे तरुण टारगट झाले आहेत. घोडेगावमधील हरिश्चंद्र काळे, मारुती पानसरे, पांडुरंग झोडगे, बाळशीराम काळे हे जुने पैलवान होते पण आता गावात एकही पैहलवान तयार होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. विजय आढारी यांनी सांगितले, की पूर्वी ज्या घरात पैलवान असे त्यांना खूप मोठा मान होता. मात्र हळूहळू नोकरशाही आली आणि ज्या घरातील मुलगा अधिकारी झाला त्या घराला किंमत आली. पूर्वी अवसरी, घोडेगावपासून आदिवासी मावळ पट्ट्यात कुस्त्यांचे आखाडे लागत होते. गदा, ढाली, सायकली, सोन्याच्या अंगठ्या अशी बक्षिसे दिली जात. कुस्तीमधील फेट्याला खूप मोठा मान होता. पण आता गावातले फडही राहिले नाहीत की जुन्या पैलवानांना मानसन्मानही राहिला नाही. गावोगावी यात्रांमध्ये होणाऱ्या आखाड्यात पैलवानांना पूर्वीसारखे चांगले पैसे मिळत नाहीत त्यामुळे चांगले पैलवान येत नाहीत. आता नगर, सोलापूर, नाशिककडील पैलवान येतानाच आपआपसांत ठरवून येतात व कुस्तीचा निकाल काहीही जरी लागला तरी पैसे वाटून घेतात. गावात एकही कुस्तीपट्टू राहिला नाही. तालमी होत्या, हौद होते, आता सगळे गाडले गेले. चार-चार लिटर दूध पिणारे पण राहिले नाहीत आणि तसा आहार पण राहिला नाही. पूर्वी कुस्तीसाठी गावातील नेते मंडळीही प्रोत्साहन द्यायचे पण आता तशी परिस्थिती राहिली नाही.