शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात बदल

By admin | Updated: November 6, 2014 03:23 IST

समुद्रात निर्माण झालेल्या नौनक, हुडहुड आणि निलोफर अशा चक्रीवादळांमुळे वातावरणात बदल होत असतानाच आता पुन्हा बंगालच्या उपसागरात निर्माण

मुंबई : समुद्रात निर्माण झालेल्या नौनक, हुडहुड आणि निलोफर अशा चक्रीवादळांमुळे वातावरणात बदल होत असतानाच आता पुन्हा बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात बदल होतील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्याने अद्याप वेग धरला नसल्याने राज्याला हुडहुडी भरलेली नाही. तरीही वातावरणात झालेल्या काहीशा बदलामुळे राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान सरासरी १६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. आणि मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीचा फरक नोंदविण्यात येत असून, बुधवारच्या सकाळच्या साडेआठच्या नोंदीनुसार मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६.२, २०.८ अंश नोंदविण्यात आले आहे. मुंबईतील कमाल आणि किमान तापमानाचा सी-सॉ वरखालीच होत असून, मुंबईकरांना बदलत्या तापमानाचा फटका बसत आहे. आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या भागावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. आता त्याची तीव्रता वाढली असून, त्याचे रूपांतर ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. दरम्यान, गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. (प्रतिनिधी)