शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात बदल

By admin | Updated: November 6, 2014 03:23 IST

समुद्रात निर्माण झालेल्या नौनक, हुडहुड आणि निलोफर अशा चक्रीवादळांमुळे वातावरणात बदल होत असतानाच आता पुन्हा बंगालच्या उपसागरात निर्माण

मुंबई : समुद्रात निर्माण झालेल्या नौनक, हुडहुड आणि निलोफर अशा चक्रीवादळांमुळे वातावरणात बदल होत असतानाच आता पुन्हा बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात बदल होतील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्याने अद्याप वेग धरला नसल्याने राज्याला हुडहुडी भरलेली नाही. तरीही वातावरणात झालेल्या काहीशा बदलामुळे राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान सरासरी १६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. आणि मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीचा फरक नोंदविण्यात येत असून, बुधवारच्या सकाळच्या साडेआठच्या नोंदीनुसार मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६.२, २०.८ अंश नोंदविण्यात आले आहे. मुंबईतील कमाल आणि किमान तापमानाचा सी-सॉ वरखालीच होत असून, मुंबईकरांना बदलत्या तापमानाचा फटका बसत आहे. आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या भागावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. आता त्याची तीव्रता वाढली असून, त्याचे रूपांतर ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. दरम्यान, गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. (प्रतिनिधी)