शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

वातावरणातील बदल ठरताहेत घातक

By admin | Updated: July 12, 2017 01:40 IST

वातावरणात अचानक होत असलेल्या बदलांमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनिगडी : वातावरणात अचानक होत असलेल्या बदलांमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवत आहे. सध्या शहरात पहाटे गारवा, दुपारी कडक उन्हाचे तापमान व सायंकाळी खेळणारी थंड हवा़ त्यामुळे अनेक रुग्णालय, दवाखान्यांत रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.४३ डिग्री सेल्सिअसवर तापमान पोहोचले की ढगाळ वातावरण, गारपीटसदृश स्थिती निर्माण होऊन वातावरणात अचानक बदल घडत आहेत. त्यामुळे कधी प्रखर ऊन तर कधी गारवा असाच सध्याच्या वातावरणाचा अनुभव येत आहे. याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून उपनगर भागासह शहरातदेखील दवाखान्यांत रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे.झालेल्या बदलामुळे काय काळजी घ्यावी?पाणी स्वच्छ असण्याची काळजी घ्या, पाणी उकळून थंड करून प्यावे, हात वारंवार धुवा, डासांपासून बचाव करा, स्वच्छता पाळा, सर्दी व खोकल्याच्या रुग्णांनी रुमाल बांधावा. बाहेरून आल्यावर अचानक कूलर, एसीची हवा घेण्याचे टाळावे. बर्फ गोळा खाण्यापूर्वी त्याची शहानिशा करा. त्यावर टाकण्यात येणारे पदार्थयुक्त कलर कसे बनतात, त्यात साखरेचे प्रमाण किती असते, याची माहिती घ्या. पण शक्यतो असे पदार्थ खाण्याचे टाळणेच योग्य.उघड्यावरील खाद्य पदार्थ ठरताहेत धोकादायकजाधववाडी : जाधववाडी व कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर उघड्यावर खाद्यपदार्थ विकले जातात. या खाद्यपदार्थांवर आजूबाजूला घाणीचे साम्राज्य असल्याने मोठ्या प्रमाणात माशा उघड्या खाद्यपदार्थांवर बसतात. उघडे खाद्यपदार्थ हातगाडी व हॉटेलमध्ये विकले जातात. हे पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक व पोटाकरिता अपायकारक असून, नागरिक उघड्यावरील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना पाहायला मिळतात.वातावरणात बदल झाल्याने ताप आजारांचे रुग्ण वाढले आहेत. अकाली पावसामुळे तापमान कमी झाले. मात्र, पुन्हा कडाक्याचे ऊन तापायला सुरुवात झाल्याने शरीर संतुलन बिघडून आजाराला तोंड द्यावे लागत आहे. अशा पावसात भिजल्यास सर्दी, खोकला, ताप येऊ शकतो. तसेच उन्हात अधिक वेळ फिरल्यास शरीराला थकवा जाणवतो.-डॉॅ़ शैलजा भावसार, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी पिंं. चि. मनपाया दिवसामध्ये लहान मुलांना संसर्गजन्य आजार बळावतात. ताप व डायरिया सारखे आजार वाढतात. लहान मुलांना या दिवसांमध्ये सर्दी, ताप, डोकेदुखी, उलट्या, हगवण यासारखे आजार बळावतात. त्यामुळे डासांपासून बचाव करणे व दूषित पाण्यापासून सावध राहण्याची गरज आहे.- डॉॅ़ बबन ठोंंबरे, जनरल फिजिशिएशन.माशांपासून मुक्तता मिळण्याकरिता कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना विक्रेत्यांनी केलेल्या दिसत नाहीत. पावसाळ्यात शक्यतो उघड्यावरील खाद्यपदार्थ खाण्याचे टाळावे, घाणीवरील माशा उघड्या पदार्थांवर बसल्याने विषाणूंचा प्रवेश सहजरीत्या होतो, तसेच अतिप्रमाणात हे पदार्थ खाण्यात आल्यावर इन्फेक्शन होऊन जुलाब ,उलट्या होऊ शकतात परिणामी तापही येतो - डॉ. जयसिंग जाधव, जाधववाडी