शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

वातावरणातील बदल ठरताहेत घातक

By admin | Updated: July 12, 2017 01:40 IST

वातावरणात अचानक होत असलेल्या बदलांमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनिगडी : वातावरणात अचानक होत असलेल्या बदलांमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवत आहे. सध्या शहरात पहाटे गारवा, दुपारी कडक उन्हाचे तापमान व सायंकाळी खेळणारी थंड हवा़ त्यामुळे अनेक रुग्णालय, दवाखान्यांत रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.४३ डिग्री सेल्सिअसवर तापमान पोहोचले की ढगाळ वातावरण, गारपीटसदृश स्थिती निर्माण होऊन वातावरणात अचानक बदल घडत आहेत. त्यामुळे कधी प्रखर ऊन तर कधी गारवा असाच सध्याच्या वातावरणाचा अनुभव येत आहे. याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून उपनगर भागासह शहरातदेखील दवाखान्यांत रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे.झालेल्या बदलामुळे काय काळजी घ्यावी?पाणी स्वच्छ असण्याची काळजी घ्या, पाणी उकळून थंड करून प्यावे, हात वारंवार धुवा, डासांपासून बचाव करा, स्वच्छता पाळा, सर्दी व खोकल्याच्या रुग्णांनी रुमाल बांधावा. बाहेरून आल्यावर अचानक कूलर, एसीची हवा घेण्याचे टाळावे. बर्फ गोळा खाण्यापूर्वी त्याची शहानिशा करा. त्यावर टाकण्यात येणारे पदार्थयुक्त कलर कसे बनतात, त्यात साखरेचे प्रमाण किती असते, याची माहिती घ्या. पण शक्यतो असे पदार्थ खाण्याचे टाळणेच योग्य.उघड्यावरील खाद्य पदार्थ ठरताहेत धोकादायकजाधववाडी : जाधववाडी व कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर उघड्यावर खाद्यपदार्थ विकले जातात. या खाद्यपदार्थांवर आजूबाजूला घाणीचे साम्राज्य असल्याने मोठ्या प्रमाणात माशा उघड्या खाद्यपदार्थांवर बसतात. उघडे खाद्यपदार्थ हातगाडी व हॉटेलमध्ये विकले जातात. हे पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक व पोटाकरिता अपायकारक असून, नागरिक उघड्यावरील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना पाहायला मिळतात.वातावरणात बदल झाल्याने ताप आजारांचे रुग्ण वाढले आहेत. अकाली पावसामुळे तापमान कमी झाले. मात्र, पुन्हा कडाक्याचे ऊन तापायला सुरुवात झाल्याने शरीर संतुलन बिघडून आजाराला तोंड द्यावे लागत आहे. अशा पावसात भिजल्यास सर्दी, खोकला, ताप येऊ शकतो. तसेच उन्हात अधिक वेळ फिरल्यास शरीराला थकवा जाणवतो.-डॉॅ़ शैलजा भावसार, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी पिंं. चि. मनपाया दिवसामध्ये लहान मुलांना संसर्गजन्य आजार बळावतात. ताप व डायरिया सारखे आजार वाढतात. लहान मुलांना या दिवसांमध्ये सर्दी, ताप, डोकेदुखी, उलट्या, हगवण यासारखे आजार बळावतात. त्यामुळे डासांपासून बचाव करणे व दूषित पाण्यापासून सावध राहण्याची गरज आहे.- डॉॅ़ बबन ठोंंबरे, जनरल फिजिशिएशन.माशांपासून मुक्तता मिळण्याकरिता कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना विक्रेत्यांनी केलेल्या दिसत नाहीत. पावसाळ्यात शक्यतो उघड्यावरील खाद्यपदार्थ खाण्याचे टाळावे, घाणीवरील माशा उघड्या पदार्थांवर बसल्याने विषाणूंचा प्रवेश सहजरीत्या होतो, तसेच अतिप्रमाणात हे पदार्थ खाण्यात आल्यावर इन्फेक्शन होऊन जुलाब ,उलट्या होऊ शकतात परिणामी तापही येतो - डॉ. जयसिंग जाधव, जाधववाडी