शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

दहावीच्या सलग पेपरमध्ये बदल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 05:51 IST

शिक्षक संघटना, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली असताना आता हे वेळापत्रक बदलले जाण्याची शक्यता आहे.

मुंबई : इयत्ता दहावीच्या परीक्षेचे तीन पेपर सलग तीन दिवशी आल्याने शिक्षक संघटना, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली असताना आता हे वेळापत्रक बदलले जाण्याची शक्यता आहे. २० मार्च रोजी विज्ञान, २१ मार्च रोजी सामाजिक शास्रे-१ आणि २२ मार्च रोजी सामाजिक शास्रे-२ असे सलग तीन दिवस पेपर असल्याचे सध्याच्या वेळापत्रकात नमूद केले आहे. त्यामुळे या पेपरसाठी तयारी करण्याकरता फारच कमी वेळ मिळेल, असे पालकांचे म्हणणे आहे. मुंबईतील अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी सलग तीन दिवस पेपर घेण्यास विरोध दर्शविला असून त्यात बदल किमान दोन दिवसांची गॅप द्यावी, अशी मागणी शिक्षण विभागाकडे आज केली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेच्या वेळापत्रकावर शिक्षक परिषदेने हरकत घेतली आहे. २०, २१ आणि २२ मार्च रोजी सलग तीन पेपर होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर दडपण येण्याची भीती व्यक्त करत शिक्षक परिषद आणि शिक्षक भारतीने वेळापत्रकात बदल करण्याची मागणी शिक्षण मंडळाकडे केली आहे. (विशेष प्रतिनिधी) >हे अंतिम वेळापत्रक नाहीराज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सांगितले की, प्रथेनुसार दहावीचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर केलेले आहे. त्याबाबत कोणालाही हरकत किंवा सूचना करण्यास १५ दिवसांचा कालावधी दिलेला आहे. तरी सलग तीन पेपरला हरकत घेत एक दिवसाआड पेपर घेण्याची सूचना पालक व शिक्षकांमधून होत आहे. त्यांच्या सूचनांचे स्वागत करून नक्कीच त्यावर विचार केला जाईल. विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर (हॉलतिकीट) छापलेले वेळापत्रक अंतिम वेळापत्रक असेल.>शिक्षक आमदारांचे मंत्र्यांना पत्रसलग तीन पेपर घेण्यास हरकत घेत शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी वेळापत्रकात बदल करण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र लिहिले आहे. पालकांकडून या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी होत असून याप्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन पाटील यांनी शिक्षणमंत्र्यांना केले आहे.>तिन्ही पेपर हे प्रत्येकी ४० गुणांचे असल्याने त्यात गॅप ठेवलेली नव्हती. तरीही पालक, विद्यार्थी, शिक्षकांची मागणी आली तर शासन योग्य तो निर्णय घेईल.- विनोद तावडे, शिक्षणमंत्री.