शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दहावीच्या सलग पेपरमध्ये बदल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 05:51 IST

शिक्षक संघटना, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली असताना आता हे वेळापत्रक बदलले जाण्याची शक्यता आहे.

मुंबई : इयत्ता दहावीच्या परीक्षेचे तीन पेपर सलग तीन दिवशी आल्याने शिक्षक संघटना, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली असताना आता हे वेळापत्रक बदलले जाण्याची शक्यता आहे. २० मार्च रोजी विज्ञान, २१ मार्च रोजी सामाजिक शास्रे-१ आणि २२ मार्च रोजी सामाजिक शास्रे-२ असे सलग तीन दिवस पेपर असल्याचे सध्याच्या वेळापत्रकात नमूद केले आहे. त्यामुळे या पेपरसाठी तयारी करण्याकरता फारच कमी वेळ मिळेल, असे पालकांचे म्हणणे आहे. मुंबईतील अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी सलग तीन दिवस पेपर घेण्यास विरोध दर्शविला असून त्यात बदल किमान दोन दिवसांची गॅप द्यावी, अशी मागणी शिक्षण विभागाकडे आज केली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेच्या वेळापत्रकावर शिक्षक परिषदेने हरकत घेतली आहे. २०, २१ आणि २२ मार्च रोजी सलग तीन पेपर होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर दडपण येण्याची भीती व्यक्त करत शिक्षक परिषद आणि शिक्षक भारतीने वेळापत्रकात बदल करण्याची मागणी शिक्षण मंडळाकडे केली आहे. (विशेष प्रतिनिधी) >हे अंतिम वेळापत्रक नाहीराज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सांगितले की, प्रथेनुसार दहावीचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर केलेले आहे. त्याबाबत कोणालाही हरकत किंवा सूचना करण्यास १५ दिवसांचा कालावधी दिलेला आहे. तरी सलग तीन पेपरला हरकत घेत एक दिवसाआड पेपर घेण्याची सूचना पालक व शिक्षकांमधून होत आहे. त्यांच्या सूचनांचे स्वागत करून नक्कीच त्यावर विचार केला जाईल. विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर (हॉलतिकीट) छापलेले वेळापत्रक अंतिम वेळापत्रक असेल.>शिक्षक आमदारांचे मंत्र्यांना पत्रसलग तीन पेपर घेण्यास हरकत घेत शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी वेळापत्रकात बदल करण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र लिहिले आहे. पालकांकडून या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी होत असून याप्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन पाटील यांनी शिक्षणमंत्र्यांना केले आहे.>तिन्ही पेपर हे प्रत्येकी ४० गुणांचे असल्याने त्यात गॅप ठेवलेली नव्हती. तरीही पालक, विद्यार्थी, शिक्षकांची मागणी आली तर शासन योग्य तो निर्णय घेईल.- विनोद तावडे, शिक्षणमंत्री.