शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या सलग पेपरमध्ये बदल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 05:51 IST

शिक्षक संघटना, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली असताना आता हे वेळापत्रक बदलले जाण्याची शक्यता आहे.

मुंबई : इयत्ता दहावीच्या परीक्षेचे तीन पेपर सलग तीन दिवशी आल्याने शिक्षक संघटना, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली असताना आता हे वेळापत्रक बदलले जाण्याची शक्यता आहे. २० मार्च रोजी विज्ञान, २१ मार्च रोजी सामाजिक शास्रे-१ आणि २२ मार्च रोजी सामाजिक शास्रे-२ असे सलग तीन दिवस पेपर असल्याचे सध्याच्या वेळापत्रकात नमूद केले आहे. त्यामुळे या पेपरसाठी तयारी करण्याकरता फारच कमी वेळ मिळेल, असे पालकांचे म्हणणे आहे. मुंबईतील अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी सलग तीन दिवस पेपर घेण्यास विरोध दर्शविला असून त्यात बदल किमान दोन दिवसांची गॅप द्यावी, अशी मागणी शिक्षण विभागाकडे आज केली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेच्या वेळापत्रकावर शिक्षक परिषदेने हरकत घेतली आहे. २०, २१ आणि २२ मार्च रोजी सलग तीन पेपर होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर दडपण येण्याची भीती व्यक्त करत शिक्षक परिषद आणि शिक्षक भारतीने वेळापत्रकात बदल करण्याची मागणी शिक्षण मंडळाकडे केली आहे. (विशेष प्रतिनिधी) >हे अंतिम वेळापत्रक नाहीराज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सांगितले की, प्रथेनुसार दहावीचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर केलेले आहे. त्याबाबत कोणालाही हरकत किंवा सूचना करण्यास १५ दिवसांचा कालावधी दिलेला आहे. तरी सलग तीन पेपरला हरकत घेत एक दिवसाआड पेपर घेण्याची सूचना पालक व शिक्षकांमधून होत आहे. त्यांच्या सूचनांचे स्वागत करून नक्कीच त्यावर विचार केला जाईल. विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर (हॉलतिकीट) छापलेले वेळापत्रक अंतिम वेळापत्रक असेल.>शिक्षक आमदारांचे मंत्र्यांना पत्रसलग तीन पेपर घेण्यास हरकत घेत शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी वेळापत्रकात बदल करण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र लिहिले आहे. पालकांकडून या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी होत असून याप्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन पाटील यांनी शिक्षणमंत्र्यांना केले आहे.>तिन्ही पेपर हे प्रत्येकी ४० गुणांचे असल्याने त्यात गॅप ठेवलेली नव्हती. तरीही पालक, विद्यार्थी, शिक्षकांची मागणी आली तर शासन योग्य तो निर्णय घेईल.- विनोद तावडे, शिक्षणमंत्री.