शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

गृह खात्याचा कारभारी बदला

By admin | Updated: August 8, 2016 06:02 IST

गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी स्वतंत्र गृहमंत्री नियुक्त करण्याची आवश्यकता आहे का? या प्रश्नावर मी बोलणे योग्य नाही, कारण मी मुख्यमंत्री असतानाही माझ्याकडेच गृहविभाग होता

उस्मानाबाद : गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी स्वतंत्र गृहमंत्री नियुक्त करण्याची आवश्यकता आहे का? या प्रश्नावर मी बोलणे योग्य नाही, कारण मी मुख्यमंत्री असतानाही माझ्याकडेच गृहविभाग होता. मात्र, राज्यातील वाढती गुन्हेगारी पहाता गृह खात्याचा कारभार अधिक निगराणीने पाहणाऱ्या व्यक्तीची आज गरज आहे, असे सांगत एकप्रकारे गृह खात्याचा कारभारी बदलण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

उस्मानाबाद येथे एका पोलिस उपनिरीक्षकाने रिव्हॉल्वरचा धाक दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली. यासंदर्भात पवारांनी रविवारी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन या गुन्ह्यातील दोषींविरुध्द फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्याची मागणी केली. पीडिताची ओळख जाहीर होऊ नये म्हणून त्यांनी तिची व तिच्या कुटुंबीयांची भेट टाळली, असे पवार यांनी सांगितले.

विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पोलीस फौजदाराने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची उस्मानाबाद येथील घटना संतापजनकआहे. आरोपी पोलीस खात्यातील असला तरी त्याला कसलीही सहानभुती मिळता कामा नये. शासनाने चांगला सरकारी वकील नियुक्त करून ही केस जलदगती न्यायालयात चालवून आरोपीवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न करावेत. राज्यात अलिकडील काळात वाढलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांमुळे ग्रामीण भागातील मुलींमध्ये अस्वस्थता आहे. नगर जिल्ह्यात झालेल्या घटनेवेळीच याची नोंद घेतली होती. नव्या पिढीला अस्वस्थ करणारा हा प्रश्न आहे. त्यामुळेच आम्ही सर्वांनी तातडीने उस्मानाबादला येण्याचा निर्णय घेतला.