शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
5
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
7
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
8
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
9
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
10
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
11
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
12
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
13
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
14
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
15
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
16
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
17
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
18
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
19
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती

‘धोरण बदलल्याने जलप्रदूषण वाढणार’

By admin | Updated: February 25, 2015 02:36 IST

नदी धोरणानुसार नद्यांपासून ३ किलोमीटरपर्यंत औद्योगिक विकास करू नये, अशी अट शिथिल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने नदी

मुंबई : नदी धोरणानुसार नद्यांपासून ३ किलोमीटरपर्यंत औद्योगिक विकास करू नये, अशी अट शिथिल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने नदी परिसरात उद्योग सुरू होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ठाणे, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणारी धरणेही धोक्यात येतील, अशी भीती विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. ते म्हणाले, नदी धोरणात बदल केल्यामुळे कालपर्यंत ज्या मुळशी धरणाकडे हिल स्टेशन उभारण्यास परवानगी मिळत नव्हती ती आता सहज मिळेल. कोणत्या उद्योगपतींना फायदा होण्यास या धोरणात बदल केला, असा प्रश्न उपस्थित करतानाच हा बदल तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली. अरबी समुद्रात शिवस्मारकाचे भूमिपूजन १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी करण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. मात्र प्रत्यक्षात भूमिपूजन झाले नाही. अशा प्रकारे शिवरायांच्या नावाने सत्ता मिळवून या शासनाने शिवरायांचा अवमान केला आहे. रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मदर तेरेसा यांच्याबद्दल अनुद्गार काढल्यामुळे त्यांचा निषेध करावा तितका थोडा आहे, असेही विखे-पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)