शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

‘धोरण बदलल्याने जलप्रदूषण वाढणार’

By admin | Updated: February 25, 2015 02:36 IST

नदी धोरणानुसार नद्यांपासून ३ किलोमीटरपर्यंत औद्योगिक विकास करू नये, अशी अट शिथिल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने नदी

मुंबई : नदी धोरणानुसार नद्यांपासून ३ किलोमीटरपर्यंत औद्योगिक विकास करू नये, अशी अट शिथिल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने नदी परिसरात उद्योग सुरू होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ठाणे, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणारी धरणेही धोक्यात येतील, अशी भीती विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. ते म्हणाले, नदी धोरणात बदल केल्यामुळे कालपर्यंत ज्या मुळशी धरणाकडे हिल स्टेशन उभारण्यास परवानगी मिळत नव्हती ती आता सहज मिळेल. कोणत्या उद्योगपतींना फायदा होण्यास या धोरणात बदल केला, असा प्रश्न उपस्थित करतानाच हा बदल तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली. अरबी समुद्रात शिवस्मारकाचे भूमिपूजन १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी करण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. मात्र प्रत्यक्षात भूमिपूजन झाले नाही. अशा प्रकारे शिवरायांच्या नावाने सत्ता मिळवून या शासनाने शिवरायांचा अवमान केला आहे. रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मदर तेरेसा यांच्याबद्दल अनुद्गार काढल्यामुळे त्यांचा निषेध करावा तितका थोडा आहे, असेही विखे-पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)