शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

अकार्यक्षम सरकार बदला

By admin | Updated: September 23, 2014 01:10 IST

राज्यातील भ्रष्ट आघाडी सरकारमुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. ही अकार्यक्षम व भ्रष्ट राजवट उलथवून टाकून राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले शिवशाहीचे राज्य

शिवशाहीचे राज्य आणा : गडकरी, फडणवीस यांचे आवाहन नागपूर : राज्यातील भ्रष्ट आघाडी सरकारमुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. ही अकार्यक्षम व भ्रष्ट राजवट उलथवून टाकून राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले शिवशाहीचे राज्य आणण्यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले. दक्षिण-पश्चिम आणि पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्तांचा मेळावा सोमवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार बनवारीलाल पुरोहित होते. व्यासपीठावर खा. अजय संचेती, माजी खा. दत्ता मेघे, महापौर प्रवीण दटके, शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, अनिल सोले, सुधाकर देशमुख, नाना श्यामकुळे , माजी महापौर माया इवनाते आदी उपस्थित होते. याप्रसंगी आ. देवेंद्र फडणवीस आणि सुधाकर देशमुख यांच्या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.फडणवीस यांचे गडकरींकडून कौतुकदेवेंद्र फडणवीस यांच्या संसदीय कामाची नितीन गडकरी यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. ते म्हणाले, फडणवीस यांनी विविध घोटाळे बाहेर काढत सरकार हलविले. देवेंद्र आता फक्त नागपूरचे नव्हे तर राज्याचे नेतृत्व करीत असून त्यांच्यावर पुढच्या काळात मोठी जबाबदारी येणार आहे. त्यांना ‘डबल इंजिन’ ओढावे लागणार आहे. त्यांच्याशी कुठलेही मतभेद नाहीत, ते लहान भावासारखे आहेत, असेही गडकरी म्हणाले. देशमुखांना मेघेंचा टोलामाजी खा. दत्ता मेघे यांनी आपल्याला पक्षाकडून काहीच अपेक्षा नसून कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे सांगितले. आ. फडणवीस यांच्या कामाची प्रशंशा करतानाच सुधाकरराव देशमुख यांना आपण आपली विधान परिषदेची जागा देऊन आमदार केले होते, असा टोला मेघेंनी लगावला. या वेळी सभागृहही काहीकाळ स्तब्ध झाले होते. मेघे यांनी सुधाकरराव देशमुख यांना गतकाळात केलेल्या उपकाराची अप्रत्यक्षपणे जाणीव करून दिली, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये कार्यक्रमानंतर रंगली होती.युतीचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाकडे गडकरी यांनी त्यांच्या भाषणात राज्य सरकारवर टीका केली. सर्वच बाबतीत संपन्न असलेला विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्राचे सरकारने वाटोळे केले. आघाडीच्या नेत्यांमध्ये विकास करण्याची इच्छाशक्ती नाही. जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत अशीच परिस्थिती राहील. सत्ता परिवर्तनाशिवाय विकास शक्य नाही. केंद्रात सत्ताबदल झाला तर हजारो कोटी रुपयांची कामे नागपूर आणि विदर्भासाठी मंजूर झाली. आता राज्यात सत्ता बदल करण्याची सुवर्ण संधी आली आहे. युतीबाबत केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल. पण कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न करून राज्यात शिवशाहीची सत्ता आणावी, असे आवाहन गडकरी यांनी केले.फडणवीस म्हणाले, राज्यात सत्ता परिवर्तन घडवून आणण्यासाठी माझी महाराष्ट्राला गरज आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे या निवडणुकीत मला माझ्या मतदारसंघात अडकून पडता येणार नाही. कार्यकर्त्यांनी मला महाराष्ट्रासाठी मुक्त करावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. भारनियमनमुक्त नागपूर, झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काचे पट्टे, ओबीसींसाठी क्रिमिलेअरची मर्यादा आणि शिष्यवृत्तीचा प्रश्न आणि मनीषनगरमधील नागरिकांसाठी महत्त्वाचा असणारा उड्डाण पुलाचा प्रश्न सोडवण्यात यश आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनीषनगरसाठी केंद्राच्या निधीतून उड्डाण पूल होणार असून त्यासाठी गडकरी यांनी मदत केली, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. भाजपची सत्ता आल्यास गतिमान प्रशासनासाठी ई-प्रशासन आणि माहिती अधिकाराच्या धर्तीवर सेवा हमी विधेयक, भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी लोकायुक्त कायद्यात दुरुस्ती करू, असे फडणवीस म्हणाले. सुरुवातीला सुधाकर देशमुख यांनीही विकास कामांचा आलेख मांडला.अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे, माजी खा. बनवारीलाल पुरोहित, दत्ता मेघे यांची भाषणे झाली. संचालन संजय बंगाले यांनी केले. मुख्यमंत्री अकार्यक्षम - गडकरीगडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा उल्लेख लखवामार मुख्यमंत्री असा केला. त्यांच्या तुलनेत दिवंगत विलासराव देशमुख बरे होते. ते विदर्भाच्या बाबतीत काही तरी निर्णय घेत होते. पण पृथ्वीराज चव्हाण तर काहीच निर्णय घेत नाही. ते अकार्यक्षम आहेत. काँग्रेस नेत्यांचेही मुख्यमंत्र्यांबाबत हेच मत आहे.मिहानमध्ये वीज नसल्याने कंपन्या अडचणीत आल्या आहेत. मिहानबाबत मुंबईत बैठक घ्यावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पाच पत्रे पाठविली. पण एकाही पत्राची त्यांनी दखल घेतली नाही.हे चित्र विदारक आहे. त्यासाठी सत्ता परिरवर्तन आवश्यक आहे, असे गडकरी म्हणाले.