शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

कोरडवाहू शेती वाचविण्यासाठी परिवर्तन मोहीम राबवा

By admin | Updated: January 20, 2015 02:00 IST

पावसाने ओढ दिल्यास कोरडवाहू शेतीतील पिके वाचविण्यासाठी संरक्षित सिंचन (प्रोटेक्टिव्ह इरिगेशन) हाच चांगला पर्याय आहे.

प्रतिभाताई पाटील : ‘लोकमत’च्या ‘आयकॉन्स आॅफ खान्देश’ कॉफीटेबल बुकचे थाटात प्रकाशनजळगाव : पावसाने ओढ दिल्यास कोरडवाहू शेतीतील पिके वाचविण्यासाठी संरक्षित सिंचन (प्रोटेक्टिव्ह इरिगेशन) हाच चांगला पर्याय आहे. त्यासाठी उत्तरेतील नद्यांमधील वाया जाणारे पाणीदेखील वाहून आणण्याची गरज आहे. कोरडवाहू शेतकऱ्याला वाचविण्यासाठी परिवर्तनाची मोहीम हाती घ्यावी, असे आवाहन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले.‘लोकमत’ निर्मित ‘आयकॉन्स आॅफ खान्देश’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी खान्देशातील ३७ आयकॉन्सचा सत्कार केला. प्रतिभाताई म्हणाल्या, की कोरडवाहू शेतकरीच प्रामुख्याने आत्महत्या करीत आहेत. त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याची गरज आहे. राष्ट्रपतीपदी असताना मी त्यासाठी राज्यपालांची समिती नेमली होती. शिवराज पाटील समितीचे अध्यक्ष होते. समितीने कोरडवाहू शेतीच्या समस्या व शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्यासाठी शिफारशी मागविल्या. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी समितीचा अहवाल अंमलबजावणीसाठी नियोजन आयोगाकडे पाठविला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अहवालातील शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत पाठपुरावा करावा, असेही त्यांनी सुचविले. (प्रतिनिधी)सिंचनाचा अनुशेष भरावा -खा. दर्डाविदर्भ व खान्देशचा सिंचनाचा अनुशेष जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे भरून काढतील. महाजन यांचे सर्वच पक्षांत मित्र आहेत. त्यांना मंत्रिपद मिळावे, यासाठी इतर पक्षांतील त्यांचे मित्र प्रार्थना करीत होते, असे लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन तथा खासदार विजय दर्डा यांनी सांगताच सभागृहात खसखस पिकली. ‘आयकॉन्स’च्या माध्यमातून प्रेरणादायी काम करणाऱ्या मंडळींचे कार्य जगासमोर येत आहे. ‘आयकॉन्स’ची सुरुवात मुंबईपासून झाली. औरंगाबाद, पुणे, नागपुरात कार्यक्रम झाले आहेत. देशभरातील उद्योजक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदींची उपस्थिती त्यासाठी लाभली, असेही ते म्हणाले. ‘लोकमत’चे कौतुक‘लोकमत’च्या उपक्रमाचे प्रतिभातार्इंनी कौतुक केले. त्या म्हणाल्या, की ‘लोकमत’च्या प्रगतीचा आलेख सातत्याने चढता आहे. टीव्ही, मनोरंजन क्षेत्रातील या समूहाचे पाऊलही यशस्वी झाले आहे.