शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
7
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
8
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
9
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
10
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
11
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
12
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
13
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
14
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
15
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
16
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
17
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
18
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
19
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
20
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान

ब्रिटिशकालीन त्रुटीपुर्ण पीक आणेवारी बदला

By admin | Updated: July 18, 2016 04:03 IST

पीक आणेवारीच्या सर्वेक्षणाची जुनी पद्धत बदलणे गरजेचे असून ब्रिटिशकालीन पीक आणेवारी निश्चितीची पद्धत आजच्या काळात कालबाह्य ठरली आहे़ शेतीत क्रांतिकारक बदल झालेले आहेत़.

विक्रमगड : पीक आणेवारीच्या सर्वेक्षणाची जुनी पद्धत बदलणे गरजेचे असून ब्रिटिशकालीन पीक आणेवारी निश्चितीची पद्धत आजच्या काळात कालबाह्य ठरली आहे़ शेतीत क्रांतिकारक बदल झालेले आहेत़. शेतीमालाचा उत्पादन खर्च वाढला आहे़ मात्र त्या तुलनेत शेतीच्या उत्पादनांना योग्य दर मिळत नाही. किंबहुना उत्पादन खर्च भरून निघेलच इतकाही मोबदला मिळत नाही़ पीककापणीचे प्रयोग झाल्याशिवाय आणेवारी जाहीर करता येत नाही. ़प्रत्येक गावात पीककापणीचे बारा प्रयोग होणे बंधनकारक आहे़ प्रत्यक्षात पीक आणेवारी मोजणी समिती कोणत्याही गावाच्या शिवारात जात नाही. नजरअंदाजाने पिकांची आणेवारी ठरवली जाते़ त्यातही दहा वर्षांतील उत्पादनापैकी सर्वाधिक उत्पन्न मिळालेल्या तीन वर्षांचे उत्पादन प्रमाण मानले जाते़ बँकांचे कर्ज आणि सरकारी मदत ही चुकीच्या पद्धतीने काढलेल्या आणेवारीवर दिली जाते़ साहजिकच याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यालाच बसतो़ अलीकडच्या काळात पिकांचे हंगाम बदललेले आहेत़ पूर्वी ७ जूनला होणारी पेरणी दोनचार वर्षांपासून जुलैशिवाय होतच नसल्याचा बहुतांश शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मग पीककापणीचे प्रयोग सरकारी परिपत्रकानुसार कसे होणार, असा नवीन प्रश्न समोर आला आहे. शेतकरी जगवायचा असेल तर पीक आणेवारी व्यवहारी व शास्त्रशुद्ध पद्धतीने मोजणी करणे आज काळाची गरज बनली आहे़ पीक आणेवारी पद्धत काढणारी यंत्रणा काटेकोर वस्तुनिष्ठ हवी़ हंगामानुसार पेरणी होताच पीककापणीचे प्रयोग प्रत्येक गावात राबविले जाणे आवश्यक आहे़ पण तसे होत नाही़ उत्पन्न आणि उत्पादन खर्चातील तफावत आणि आणेवारीची चुकीची पद्धतच शेतकऱ्यांच्या आत्महत्येला एक प्रमुख कारण बनले आहे़. शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे़ (वार्ताहर)>सध्याच्या पद्धतीत सरकारने नेमलेल्या समितीकडून विभागीय स्तर व गावपातळीवर १२ प्रयोग करण्यात येतात़ मात्र या समित्या काहीच करत नसल्याचे प्रत्येक गावातील ग्रामस्थांची तक्रार आहे़ या तक्रारींचा विचार करूनच ही जुनी ब्रिटिशकालीन आणेवारीची पद्धत बदलण्याची एकमुखी मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे़