शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

चंदू चव्हाणला मृत्यूच्या दाढेतून काढले बाहेर

By admin | Updated: March 26, 2017 03:01 IST

पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय जवान खान्देशचा सुपूत्र चंदू चव्हाण यास भारतात परत आणण्याचे मोठे आव्हान होते.

जळगाव : पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय जवान खान्देशचा सुपूत्र चंदू चव्हाण यास भारतात परत आणण्याचे मोठे आव्हान होते. चंदूला मायदेशी आणण्याचा शब्द मी खान्देशवासीयांना दिला होता. पाकिस्तानकडे सतत पाठपुरावा केला व आंतरराष्ट्रीय दबाव आणला आणि चंदूला मृत्यूच्या दाढेतून भारतात आणण्यात यशस्वी ठरलो, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.‘लोकमत’ शहर कार्यालयास त्यांनी शनिवारी दुपारी सदिच्छा भेट दिली. चंदू आमच्या ताब्यात नाही, असे सुरुवातीला सांगणाऱ्या पाकिस्तानने नंतर तो तो ताब्यात असल्याची कबुली दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या सहकार्याने तसेच आंतरराष्ट्रीय दबाव आणून चंदूला अखेर मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यशस्वी झालो. पंतप्रधानांच्या नेतृत्त्वाखालील कार्यकाळात संरक्षण विभागासह अन्य कोणत्याही खात्यात गैरव्यवहार, भ्रष्टाचार झाला नाही. मंत्र्यांवर गैरव्यवहाराचे आरोप झाले नाही. आॅगस्टा वेस्टलँडसह अन्य एक घोटाळा बाहेर आला मात्र तो मागील सरकारच्या काळातील होता. मोदी सरकारच्या काळाशी त्याचा अजिबात संबंध नाही. केंद्र सरकारची हीच मोठी उपलब्धी आहे, असे त्यांनी सांगितले.निर्यातदार बनायचे आहेसंरक्षण विभाग आतापर्यंत अनेक साहित्य हे अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आदी देशांकडून आयात करीत होता. आता मेक इन इंडिया अंतर्गत भारतातील कारखान्यांत युद्ध साहित्य बनविण्यावर भर दिला जात आहे. आपल्याला निर्यातदार देश बनायचे आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)चंदू चव्हाणचे जन्मभूमीत जोरदार स्वागतजवान चंदू चव्हाण हा सुटकेनंतर प्रथमच शनिवारी सामनेर (ता. पाचोरा) या जन्मगावी आला. त्याचा व संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा सत्कार ग्रामस्थांतर्फे करण्यात आला. चंदू चव्हाणचे जोरदार स्वागत करण्यात आले.अनपेक्षित जबाबदारीमी व्यवसायाने डॉक्टर असल्याने माझ्यावर आरोग्य खात्याची जबाबदारी सोपविण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र संरक्षण खाते मिळाले. संसदेत ३९ डॉक्टर असून त्यापैकी एकाकडेही आरोग्य विभागाची जबाबदारी नाही तसेच संसदेत सैन्यदलाची पार्श्वभूमी असलेले चार खासदार आहेत. त्यांच्याकडे संरक्षण खात्याची जबाबदारी न सोपविता ती माझ्याकडे आहे. संरक्षण विभागात खूप शिकायला मिळाले. देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. पक्ष जो आदेश देईल, ती जबाबदारी मी पार पाडत आहे व भविष्यातही ती पार पाडणार असल्याचे ते म्हणाले.