शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

चंद्रकांत पाटील यांना सत्तेची मस्ती - अजित पवार

By admin | Updated: February 16, 2016 20:20 IST

दुष्काळी परस्थितीत बेताल वक्तव्य करणारे कोल्हापूर-सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सत्तेची मस्ती आली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित

- अधिवेशनात विरोधी पक्ष मिळून सरकारला जाब विचारू
 
तासगाव : दुष्काळी परस्थितीत बेताल वक्तव्य करणारे कोल्हापूर-सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सत्तेची मस्ती आली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी तोफ डागली.
हे सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीका करुन नऊ मार्चपासून सुरू होणा:या अधिवेशनात विरोधी पक्षातील सर्व सहकारी मिळून दुष्काळासह विविध प्रश्नांना वाचा फोडू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथीसाठी अजित पवार अंजनी (ता. तासगाव) येथे आले होते. पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी राज्य सरकारवर टीकची झोड उठवली. 
सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजना पाच कोटींच्या निधीसाठी ठप्प आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निधीची मागणी केल्यानंतर, त्यांनी सरकारकडे नोटा छापायचे मशीन नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याबाबत विचारले असता, पवार म्हणाले की,  सत्तेची मस्ती आल्यामुळेच ते बेताल वक्तव्य करत आहेत. जनता अशी मस्ती कधीही उतरवू शकते. जनतेला पाणी द्यायला हवे. शासनाने अडवणुकीचे धोरण राबवून चालणार नाही.
अडचणीत असणा:या जनतेला सावरण्याकरता सरकारने धाडसाचे निर्णय घ्यायचे असतात. परंतु हे सरकार शेतकरीविरोधी असल्याने निर्णय घेत नाही. विदर्भ, मराठवाडय़ात भीषण दुष्काळ आहे. जनावरांच्या चा:याचा यक्षप्रश्न आहे, तरीदेखील छावण्या सुरू नाहीत. त्यामुळे हे सरकार कोणाचा आणि कसा विचार करत आहे, याचे तारतम्य राहिलेले नाही. लोकहिताच्या योजना बंद करण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जात आहे. मात्र अशा योजना प्रभावीपणो राबविणो आवश्यक आहे, हे शासनाकडून होत नाही, असेही पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी) 
 
आगीच्या घटनेची चौकशी व्हावी... 
मंत्रलयात आग लागली तेव्हा ही आग आम्हीच लावली, असा आरोप भाजपच्या नेत्यांकडून होत होता. आता भाजप सरकारच्या मुंबईत झालेल्या कार्यक्रमात स्टेजला आग लागली. मात्र ही आग त्यांनीच लावली, असा आरोप आम्ही करणार नाही. अशा घटना काही त्रुटींमुळे होत असतात. त्याची चौकशी व्हायला हवी.
- अजित पवार