शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

चंद्रकांत पाटील, आदित्य यांची 'सेफ मुव्ह', तर रोहित पवारांची लढाई आव्हानात्मक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 17:29 IST

शिवसेनेच्या दृष्टीने वरळी मतदार संघ शिवसेनेचा सर्वात सुरक्षीत मतदार संघ समजला जातो. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच पराभव मिळू नये म्हणून आदित्य यांच्या बाबतीत काळजी घेण्यात येत आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सुरक्षीत मतदार संघाचा शोध संपला आहे. तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी सुरक्षीत असा वरळी मतदार संघ निवडला आहे. याउलट रोहित पवार यांनी राष्ट्रवादीने कधीही न जिंकलेल्या कर्जत-जामखेड मतदार संघातून आपली विधानसभेची कारकिर्द सुरू करण्याचं ठरवल आहे.

चंद्रकांत पाटील आतापर्यंत विधान परिषदेवर निवडून येत आहेत. जनतेतून निवडून न येणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये, अशी टीका विरोधकांकडून नेहमीच पाटील यांच्यावर होते. त्याला उत्तर देण्यासाठी पाटील यांनी चाचपणी केली होती. त्यातच आता भाजपकडून पाटील यांना निवडणूक लढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे पाटील यांच्याकडून सुरुवातीला पुण्यातील कसबा मतदार संघाची चाचपणी करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पाटील यांना कोथरूडचा पर्याय सुचविण्यात आला. परंतु, तेथूनही त्यांना विरोध झाला असला तरी उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना सुरक्षीत मतदार संघ का हवा, असा प्रश्न उपस्थित कऱण्यात येत आहे.

दरम्यान शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यांनी वरळी हा मतदार संघ आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करण्यासाठी निवडला आहे. शिवसेनेच्या दृष्टीने वरळी मतदार संघ शिवसेनेचा सर्वात सुरक्षीत मतदार संघ समजला जातो. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच पराभव मिळू नये म्हणून आदित्य यांच्या बाबतीत काळजी घेण्यात येत आहे. आदित्य ठाकरे युवासेनेचे प्रमुख आहेत.

दुसरीकडे शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सुरक्षीत मतदार संघाच्या भानगडीत न पडता, राजकीय कारकिर्द खऱ्या अर्थाने सुरू करण्यासाठी खडतर मतदारसंघ निवडला आहे. तसेच मागील 2 ते 3 वर्षांपासून कर्जत जामखेड मतदार काम सुरू केले आहे. या निमित्ताने रोहित यांनी नवा पायंडा पाडला असून आधी काम मग उमेदवारी यावर भर दिला आहे.