शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मिरज परिसरात चंदन तस्कर टोळ्या पुन्हा सक्रिय

By admin | Updated: October 25, 2015 23:55 IST

पोलिसांना आव्हान : कर्नाटकातील चंदन मिरजमार्गे उत्तर भारतात; बोगस परवान्यांचा वापर

मिरज : मिरजेत बंद झालेला छुपा चंदन तस्करीचा व्यवसाय पुन्हा एकदा ग्रामीण भागात सुरू झाला आहे. कर्नाटकातील जंगलातून चोरून आणण्यात येणारे चंदन उत्तर भारतात पाठविणाऱ्या टोळ्या मिरज पूर्व भागातील गावात सक्रिय आहेत. चंदनाचे तेल काढणारे कारखाने बंद करण्याच्या शासनाच्या धोरणामुळे व पोलीस यंत्रणेच्या प्रतिबंधामुळे मिरजेतील चंदन तस्करीला आळा बसला होता. मिरजेतील नगरसेवकांसह अनेक बडी धेंडे चंदन तस्करीमध्ये असल्याने, दोन दशकांपूर्वी मिरज हे चंदन तस्करीचे प्रमुख केंद्र होते. चंदन तस्करी व चंदनाच्या झाडांच्या चोऱ्यांमुळे वन विभागाने चंदनाचे तेल काढण्याच्या उद्योगासह, चंदनाचे झाड कापण्यासाठी, तसेच चंदनाच्या वाहतुकीसाठी देण्यात येणारा परवाना बंद केला आहे. मिरजेतील वड्डीसह जतमधील कोंत्यावबोबलाद, मुचंडी, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल व गडहिंग्लज येथील चंदनाचे तेल काढणारे उद्योग बंद झाले आहेत. मिरजेसह सांगोला, लातूर, घोडनदी, शिरूर, गडहिंग्लज परिसरात चंदन तस्करांचे जाळे आहे. कर्नाटकातील हुबळी, धारवाड, अळणावर येथील जंगलातून चोरून आणण्यात येणाऱ्या चंदनाचा मिरज पूर्व भागातील गावांत साठा करण्यात येत आहे. तेथून इंदोर, कन्नोज, कानपूर, दिल्ली येथील चंदनाचे तेल काढणाऱ्या कारखान्यांना हे चंदन पाठविण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतूक यंत्रणेद्वारे वन विभागाच्या बोगस परवान्याच्या आधारे चंदनाची तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाली. मिरजेत यापूर्वी चंदन तस्करांच्या व्यावसायिक स्पर्धेतून खून, मारामाऱ्यांचे प्रकार घडले आहेत. रेल्वेने चोरून जाणारे चंदन पकडल्याने पोलीस फौजदाराला चंदन तस्करांच्या दबावाने निलंबित करण्यात आले होते. तसेच एका फौजदाराचा अपघातात गूढ मृत्यू झाला होता. चंदनाची अवैध विक्री करणाऱ्या टोळ्यांमुळे मिरज परिसरातील शांतता धोक्यात येण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)३ ते ४ हजार रुपये किलोसौंदर्यप्रसाधने निर्मितीसाठी उत्तर भारतात चंदन व चंदनाच्या तेलाला मोठी मागणी आहे. ३ ते ४ हजार रूपये प्रति किलो दराने चंदनाची विक्री होते. मिरजेतील चंदन तस्करांचा राज्यात दबदबा आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोठेही चंदनचोरी झाल्यास तेथील पोलीस तपासासाठी मिरजेत येतात. रात्रीच्या अंधारात चंदनाचे झाड कोणत्याही आवाजाशिवाय कापून नेण्याची मिरजेतील तस्करांची खासीयत आहे.