शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

कुलगुरूंचा तडकाफडकी राजीनामा

By admin | Updated: August 10, 2016 04:38 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी मंगळवारी तडकाफडकी राजीनामा दिला.

मुंबई /नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी मंगळवारी तडकाफडकी राजीनामा दिला. कुलपती व राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मंगळवारी तो स्वीकारला. विद्यापीठातील कामकाज आणि विशेषत: कंत्राटी कर्मचारी भरतीवरून शासकीय पातळीवरून उडालेले खटके या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीमाना दिल्याचे येत आहे. कुलगुरूंनी मात्र व्यक्तिगत कारणामुळे राजीनामा दिल्याचे नमूद केले आहे.मुक्त विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश शासनाने देऊनही डॉ. साळुंके यांनी ते मानले नव्हते. उलट ही भरती बेकायदेशीर असल्याचे कुलगुरूंचे म्हणणे होते. मध्यंतरी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत याच मुद्यावरून खटके उडल्याची चर्चा आहे. त्यातून कुलगुरूंना राजीनामा देण्यासाठी राज्यपालांनी सूचित केल्याची चर्चा गेल्या आठ दिवसांपासून सुरू होती. डॉ. साळुंखे यांचा १८ आॅगस्टला कुलगुरूपदावरील शेवटचा दिवस असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, मंगळवारी सायंकाळी त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना एकत्रित बोलवून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे जाहीर केले. आॅडिट स्पष्ट असल्याचे सांगताना त्यांनी विद्यापीठात अनेक गोंधळ सुरू असल्याचे सांगितल्याचे समजते. विशेषत: काही अधिकाऱ्यांच्या नातेवाइकांची विद्यापीठात यापूर्वी झालेली भरती आणि अन्य प्रश्नांवर त्यांनी हात ठेवल्याचे कळते. याबाबत कुलगुरूंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र होऊ शकला नाही. डॉ. साळुंखेयांनी चौदावे कुलगुरू म्हणून १९ आॅगस्ट २०१४ रोजी कार्यभार स्वीकारला होता. (प्रतिनिधी)