शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

बेकायदा बांधकामे नियमित करण्याच्या धोरणाला आव्हान

By admin | Updated: July 8, 2017 04:25 IST

राज्यभरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्याच्या सरकारच्या नव्या धोरणाला उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यभरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्याच्या सरकारच्या नव्या धोरणाला उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह सिडको व नवी मुंबई महापालिकेला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.उच्च न्यायालयाने मुंबई, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबईतील दिघा, वसई-विरार व अन्य काही ठिकाणांवरील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचा आदेश देण्याचा सपाटा लावल्यानंतर राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०१५पर्यंतची सर्व बांधकामे नियमित करण्याचे धोरण आखले. ते अंतिम होण्यापूर्वी उच्च न्यायालयाने दोनदा रद्द केले. तरीही सरकारने महाराष्ट्र प्रादेशिक शहर नियोजन कायद्याच्या (एमआरटीपी) कलम ५मध्ये सुधारणा करत सर्व बेकायदा बांधकामांना अभय दिले. सरकारच्या या नव्या धोरणाला नवी मुंबईचे रहिवासी राजीव मिश्रा यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. नवे धोरण विकासकांच्या व भूमाफियांच्या पथ्यावर पडणारे आहे. ज्यांनी सरकार, महापालिका, विशेष प्राधिकरणांच्या जागा हडपल्या आहेत त्यांना एक प्रकारे पाठीशी घातले आहे, असे याचिकेत म्हटले आहे.भलीमोठी रक्कम आकारून बेकायदा बांधकामे नियमित करण्याची जबाबदारी संबंधित महापालिका व जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. मात्र त्याचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता आहे. नव्या धोरणामुळे आतापर्यंत ज्या विकासकांवर नियमे उल्लंघनप्रकरणी गुन्हा किंवा दोषारोपपत्र नोंदविण्यात आले त्या विकासकांची कारवाईमधून सुटका केली आहे. याशिवाय राज्य सरकारने एमआरटीपीमध्ये सुधारणा करण्यापूर्वी नागरिकांकडून हरकती व सूचना मागवायला हव्या होत्या. परंतु, सरकारने ही प्रक्रिया डावलून एमआरटीपी कलम ५मध्ये सुधारणा केली. त्यांचा निर्णय न्यायालयाच्या आदेशाशी व घटनेशी विसंगत आहे, असे याचिकेत म्हटले आहे.शुक्रवारच्या सुनावणीत न्या. अभय ओक व न्या. विभा कंकणवाडी यांनी सरकारसह सर्व प्रतिवाद्यांना या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश देत सुनावणी ८ आॅगस्ट रोजी ठेवली आहे. दरम्यान, महाअधिवक्त्यांनाही सुनावणीत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.